दिल्ली हिंसाचार: इराणची भारतावर टीका
दिल्ली हिंसाचाराचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर अजूनही उमटत आहेत. अमेरिकेतील राजकारणात या हिंसाचाराचे पडसाद उमटले होते. त्यानंतर आता इराणनेही यावर भाष्य केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Mar 2020, 2:02 pm
तेहरान: दिल्ली हिंसाचाराचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर अजूनही उमटत आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनेई यांनी भारत सरकार दिल्ली हिंसाचाराप्रकरणी टीका केली आहे. हिंसाचारामुळे भारतातील मुस्लिम धोक्यात असल्याचे प्रतिक्रिया अयातुल्ला यांनी व्यक्त केली आहे.
दिल्ली हिंसाचार प्रकरणी पाकिस्ताननेही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अमेरिकेच्या राजकारणात याचे पडसाद उमटले होते. आतंरराष्ट्रीय माध्यमांमध्येही दिल्ली हिंसाचाराची चर्चा झाली होती. त्यानंतर आता इराणनेही भारतावर टीका केली आहे. खमनेई यांनी म्हटले की, भारतात मुस्लिमांच्या नरसंहारमुळे जगातील मुस्लिम दु:खी आहे. भारत सरकारने कट्टरपंथीय हिंदू आणि त्यांच्या पक्ष, संघटनांना रोखले पाहिजे. जगातील इस्लामिक देशांपासून वेगळे न पडण्यासाठी भारताने मुस्लिमांविरोधातील हिंसाचार थांबवला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
वाचा: चीनबाहेर १७ पट वेगाने फैलावतोय करोनाचा संसर्ग
भारताकडून इराणचा निषेध
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनेई यांच्या वक्तव्याचा भारताने तीव्र निषेध नोंदवला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणच्या राजदूतांना तातडीने बोलावणं धाडत त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. इराणसारख्या देशांकडून अशी टिप्पण्यांची आवश्यकता नसल्याची प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी व्यक्त केली.
आणखी वाचा:
तालिबानवर अमेरिकेचा एअरस्ट्राइक
तालिबानचा अमेरिकेला झटका; शांतता करार मोडला
दिल्ली हिंसाचार प्रकरणी पाकिस्ताननेही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अमेरिकेच्या राजकारणात याचे पडसाद उमटले होते. आतंरराष्ट्रीय माध्यमांमध्येही दिल्ली हिंसाचाराची चर्चा झाली होती. त्यानंतर आता इराणनेही भारतावर टीका केली आहे. खमनेई यांनी म्हटले की, भारतात मुस्लिमांच्या नरसंहारमुळे जगातील मुस्लिम दु:खी आहे. भारत सरकारने कट्टरपंथीय हिंदू आणि त्यांच्या पक्ष, संघटनांना रोखले पाहिजे. जगातील इस्लामिक देशांपासून वेगळे न पडण्यासाठी भारताने मुस्लिमांविरोधातील हिंसाचार थांबवला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
वाचा: चीनबाहेर १७ पट वेगाने फैलावतोय करोनाचा संसर्ग
भारताकडून इराणचा निषेध
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनेई यांच्या वक्तव्याचा भारताने तीव्र निषेध नोंदवला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणच्या राजदूतांना तातडीने बोलावणं धाडत त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. इराणसारख्या देशांकडून अशी टिप्पण्यांची आवश्यकता नसल्याची प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी व्यक्त केली.
आणखी वाचा:
तालिबानवर अमेरिकेचा एअरस्ट्राइक
तालिबानचा अमेरिकेला झटका; शांतता करार मोडला