हिरोशिमा:
मुसळधार पावसामुळं जपानमधील अनेक गावं पाण्याखाली गेली असून, १०० जणांचा मृत्यू झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेतलं आहे. आतापर्यंत २० लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
पुरात आतापर्यंत ८७ लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर १३ जण बेपत्ता झाले आहेत. पुरात अनेक वाहनं वाहून गेली आहेत. ४० हेलिकॉप्टरच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे. पश्चिम जपानमध्ये महापूर आला आहे. अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. पुरापासून बचाव करण्यासाठी काही गावांतील लोकांनी घरांवरील छताचा आसरा घेतला आहे, अशी माहिती मुख्य कॅबिनेट सचिव योशिदी सुगा यांनी दिली.
मुसळधार पावसामुळं आलेल्या पुरामुळं भूस्खलन झालं. त्यामुळं परिसरातील गावांतील सुमारे २० लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. क्युशू आणि शिकोकू बेटावर अलर्ट जारी करण्यात आला आहे. लोकांचा जीव वाचवणं आणि त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं काम म्हणजे वेळेसोबतची एक लढाई आहे, असं पंतप्रधान शिंजो आबे यांनी म्हटलं आहे.
मुसळधार पावसामुळं जपानमधील अनेक गावं पाण्याखाली गेली असून, १०० जणांचा मृत्यू झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेतलं आहे. आतापर्यंत २० लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
पुरात आतापर्यंत ८७ लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर १३ जण बेपत्ता झाले आहेत. पुरात अनेक वाहनं वाहून गेली आहेत. ४० हेलिकॉप्टरच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे. पश्चिम जपानमध्ये महापूर आला आहे. अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. पुरापासून बचाव करण्यासाठी काही गावांतील लोकांनी घरांवरील छताचा आसरा घेतला आहे, अशी माहिती मुख्य कॅबिनेट सचिव योशिदी सुगा यांनी दिली.
मुसळधार पावसामुळं आलेल्या पुरामुळं भूस्खलन झालं. त्यामुळं परिसरातील गावांतील सुमारे २० लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. क्युशू आणि शिकोकू बेटावर अलर्ट जारी करण्यात आला आहे. लोकांचा जीव वाचवणं आणि त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं काम म्हणजे वेळेसोबतची एक लढाई आहे, असं पंतप्रधान शिंजो आबे यांनी म्हटलं आहे.