वृत्तसंस्था, लंडन
भारताने काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरू असला तरी, हा प्रश्न दोन्ही देशांनी आपापसात चर्चेने सोडवावा, असेच मत आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त होत आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय प्रश्न असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर झालेल्या संभाषणात स्पष्ट केले आहे. फ्रान्समध्ये होऊ घातलेल्या जी ७ गटांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली. उभय नेत्यांनी काश्मीरमधील सद्यस्थितीवरही चर्चा केली.
ब्रिटनसह फ्रान्सनेही काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यानचा प्रश्न असल्याचे स्पष्ट केले आहे. दोन्ही देशांनी आक्रमकता टाळून राजकीय संवादामधून हा प्रश्न सोडवावा, असे फ्रान्सकडून स्पष्ट करण्यात आले. फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन व्येस ली द्रिअॅन यांच्याशी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी काश्मीरबाबत मंगळवारी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी फ्रान्सची भूमिका स्पष्ट केली. दोन्ही देशांनी हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवावा, अशी फ्रान्सची नेहमीच भूमिका राहिल्याचे ते म्हणाले.
बांगलादेशनेही या तणावाच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली असून काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले आहे. प्रादेशिक शांतता कायम ठेवणे आणि स्थैर्य राखणे, यालाच सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे, असे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतीच बांगलादेशला भेट दिली त्यावेळी झालेल्या चर्चेत ही भूमिका स्पष्ट करण्यात आली.
भारताने काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरू असला तरी, हा प्रश्न दोन्ही देशांनी आपापसात चर्चेने सोडवावा, असेच मत आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त होत आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय प्रश्न असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर झालेल्या संभाषणात स्पष्ट केले आहे. फ्रान्समध्ये होऊ घातलेल्या जी ७ गटांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली. उभय नेत्यांनी काश्मीरमधील सद्यस्थितीवरही चर्चा केली.
ब्रिटनसह फ्रान्सनेही काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यानचा प्रश्न असल्याचे स्पष्ट केले आहे. दोन्ही देशांनी आक्रमकता टाळून राजकीय संवादामधून हा प्रश्न सोडवावा, असे फ्रान्सकडून स्पष्ट करण्यात आले. फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन व्येस ली द्रिअॅन यांच्याशी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी काश्मीरबाबत मंगळवारी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी फ्रान्सची भूमिका स्पष्ट केली. दोन्ही देशांनी हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवावा, अशी फ्रान्सची नेहमीच भूमिका राहिल्याचे ते म्हणाले.
बांगलादेशनेही या तणावाच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली असून काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले आहे. प्रादेशिक शांतता कायम ठेवणे आणि स्थैर्य राखणे, यालाच सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे, असे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतीच बांगलादेशला भेट दिली त्यावेळी झालेल्या चर्चेत ही भूमिका स्पष्ट करण्यात आली.