मटा ऑनलाइन वृत्त । वॉशिंग्टन
काही दिवसांपूर्वीच व्हॉट्स अॅपवर एक मेसेज व्हायरल झाला होता. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशात भाजपला 'सोनियाचे दिवस' आले', असा शब्दांचा खेळ त्यामध्ये केला होता. पण आता त्या मजेशीर मेसेजला वेगळंच महत्त्व आलंय, वलय प्राप्त झालंय. कारण, अमेरिकेच्या थिंक टँकनंही अगदी तसंच मत नोंदवलं आहे.
बिहारमध्ये जदयूसोबत सरकार स्थापन करून पंतप्रधान मोदी भाजपला सुवर्णयुगात घेऊन गेलेत. आता २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप जिंकेलच, पण इतर राज्यांमध्येही त्यांचा दबदबा पाहायला मिळेल, असं भाकित 'कारनेज एंडॉमेंट फॉर इंटरनॅशनल पीस' या वॉशिंग्टनमधील थिंक टँकमधील ज्येष्ठ अभ्यासक मिलन वैष्णव यांनी एका लेखात वर्तवलं आहे.
गेल्या ३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपसारख्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं. हे सगळं नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळेच साध्य झालं, असं नमूद करतानाच, देशाची सत्ता मोदी आणि अमित शहा यांच्या हाती केंद्रीत झाल्याची टिप्पणीही त्यांनी केली आहे.
* मिलन वैष्णव यांच्या लेखातील ठळक मुद्देः
>> भारतात नेहरू गांधी कुटुंब आणि त्यांच्या वंशानंतर भाजपचं युग अवतरलं आहे. भाजप हे सत्तेचं नवं केंद्र झालं आहे.
>> भाजपसाठीचं हे सुवर्णयुग आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सुवर्णयुगाचे शिल्पकार आहेत. येत्या काळात भाजपला यश द्विगुणित करण्याच्या नव्या संधी प्राप्त होणार आहेत.
>> २०१९च्या लोकसभा निवडणुकीतही जनमताचा कौल भाजपलाच मिळेल. भाजप क्रमांक १ चा पक्ष असेल आणि पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच बसतील.
>> इतर राज्यांमध्येही भाजपची एकहाती सत्ता येण्याची शक्यता आहे.
>> स्वच्छ भारत अभियान, व्यापाराभिमुख धोरण यामुळे, तसंच राष्ट्राला प्रेरित करणाऱ्या भाषणांमुळे नरेंद्र मोदी हे युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
>> भारताच्या राजकारणात भाजपची सत्ता आल्यानं खूप काही महत्त्वाचे बदल झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच व्हॉट्स अॅपवर एक मेसेज व्हायरल झाला होता. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशात भाजपला 'सोनियाचे दिवस' आले', असा शब्दांचा खेळ त्यामध्ये केला होता. पण आता त्या मजेशीर मेसेजला वेगळंच महत्त्व आलंय, वलय प्राप्त झालंय. कारण, अमेरिकेच्या थिंक टँकनंही अगदी तसंच मत नोंदवलं आहे.
बिहारमध्ये जदयूसोबत सरकार स्थापन करून पंतप्रधान मोदी भाजपला सुवर्णयुगात घेऊन गेलेत. आता २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप जिंकेलच, पण इतर राज्यांमध्येही त्यांचा दबदबा पाहायला मिळेल, असं भाकित 'कारनेज एंडॉमेंट फॉर इंटरनॅशनल पीस' या वॉशिंग्टनमधील थिंक टँकमधील ज्येष्ठ अभ्यासक मिलन वैष्णव यांनी एका लेखात वर्तवलं आहे.
गेल्या ३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपसारख्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं. हे सगळं नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळेच साध्य झालं, असं नमूद करतानाच, देशाची सत्ता मोदी आणि अमित शहा यांच्या हाती केंद्रीत झाल्याची टिप्पणीही त्यांनी केली आहे.
* मिलन वैष्णव यांच्या लेखातील ठळक मुद्देः
>> भारतात नेहरू गांधी कुटुंब आणि त्यांच्या वंशानंतर भाजपचं युग अवतरलं आहे. भाजप हे सत्तेचं नवं केंद्र झालं आहे.
>> भाजपसाठीचं हे सुवर्णयुग आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सुवर्णयुगाचे शिल्पकार आहेत. येत्या काळात भाजपला यश द्विगुणित करण्याच्या नव्या संधी प्राप्त होणार आहेत.
>> २०१९च्या लोकसभा निवडणुकीतही जनमताचा कौल भाजपलाच मिळेल. भाजप क्रमांक १ चा पक्ष असेल आणि पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच बसतील.
>> इतर राज्यांमध्येही भाजपची एकहाती सत्ता येण्याची शक्यता आहे.
>> स्वच्छ भारत अभियान, व्यापाराभिमुख धोरण यामुळे, तसंच राष्ट्राला प्रेरित करणाऱ्या भाषणांमुळे नरेंद्र मोदी हे युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
>> भारताच्या राजकारणात भाजपची सत्ता आल्यानं खूप काही महत्त्वाचे बदल झाले आहेत.