कराची: पाकिस्तान निर्मितीचे जनक म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद अली जिन्ना यांच्याकडे पाकिस्तानबाबतचे व्हिजन नव्हते. त्यांचा द्विराष्ट्राचा सिद्धांत हा मूर्खपणाचा होता अशी खरमरीत टीका पाकिस्तानचे भौतिक शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते परवेझ हुदभोय यांनी केली आहे.
कराचीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'आदाब फेस्टिवल'मधील एका परिसंवादात बोलताना परवेझ हुदभोय यांनी ही टीका केली. मोहम्मद अली जिन्ना हे चांगले नेते होते, यात शंका नाही. मात्र, पाकिस्तानला काय हवयं, पाकिस्तान कसा देश असेल याबाबत त्यांनी काहीही मांडणी केली नाही. अनेकदा त्यांनी भाषणे केली. मात्र, त्यातही एक वाक्यता राहीली नसल्याचेही परवेझ हुदभोय यांनी सांगितले.
परवेझ हुदभोय यांनी मोहम्मद अली जिन्ना यांनी कराची बार कौन्सिलमध्ये १९४८ मध्ये केलेल्या भाषणाचाही संदर्भ दिला. पाकिस्तान हा इस्लामिक कायद्याचे पालन करणारा देश असेल असे म्हटले होते. मात्र, १९४५ मध्ये पाकिस्तान कसा देश असेल असे विचारले असता त्यांनी वेळ आल्यावर सांगू असे म्हणत वेळ मारून नेली होती, याचीही आठवण त्यांनी करून दिली. पाकिस्तान हे संघराज्य असेल की आणखी कसे राष्ट्र असेल याबाबतही जिन्नांची स्पष्टता ठेवली नव्हती. विज्ञान तंत्रज्ञानाबाबतही उपेक्षा झाली असल्याचे हुदभोय यांनी सांगितले. विज्ञान तंत्रज्ञानामुळे देश मजबूत झाला असता. मात्र, त्यादृष्टीने कोणतेही नियोजन जिन्ना यांनी केले नसल्याचेही टीकास्त्र हुजभोय यांनी सोडले.
पाकिस्तानचे बुरे दिन! महागाईने गाठला उच्चांक
काबूल: मिलिटरी अॅकेडमीजवळ आत्मघातकी हल्ला; ६ ठार
मोहम्मद अली जिन्ना यांचा द्विराष्ट्राचा सिद्धांत हा मुर्खपणा होता आणि बंगाली मुस्लिमांवर अत्याचार झाला असल्याचे सांगत त्यांनी पाकिस्तानी सरकारला घरचा आहेर दिला. मागील ७३ वर्षांपासून पाकिस्तानी नागरिकांची दिशाभूल सुरू आहे. पाकिस्तान सध्या गोंधळलेला देश आहे. याची निर्मितीच मूळात गोंधळलेल्या आणि व्हिजन नसताना झाली असल्याचे टीकास्त्र सोडले. शास्त्रज्ञ असलेल्या परवेझ हुदभोय यांनी २०१७ मध्येही पाकिस्तान फॅसिस्ट धार्मिक राष्ट्र बनत असल्याची टीका केली होती.
कराचीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'आदाब फेस्टिवल'मधील एका परिसंवादात बोलताना परवेझ हुदभोय यांनी ही टीका केली. मोहम्मद अली जिन्ना हे चांगले नेते होते, यात शंका नाही. मात्र, पाकिस्तानला काय हवयं, पाकिस्तान कसा देश असेल याबाबत त्यांनी काहीही मांडणी केली नाही. अनेकदा त्यांनी भाषणे केली. मात्र, त्यातही एक वाक्यता राहीली नसल्याचेही परवेझ हुदभोय यांनी सांगितले.
परवेझ हुदभोय यांनी मोहम्मद अली जिन्ना यांनी कराची बार कौन्सिलमध्ये १९४८ मध्ये केलेल्या भाषणाचाही संदर्भ दिला. पाकिस्तान हा इस्लामिक कायद्याचे पालन करणारा देश असेल असे म्हटले होते. मात्र, १९४५ मध्ये पाकिस्तान कसा देश असेल असे विचारले असता त्यांनी वेळ आल्यावर सांगू असे म्हणत वेळ मारून नेली होती, याचीही आठवण त्यांनी करून दिली. पाकिस्तान हे संघराज्य असेल की आणखी कसे राष्ट्र असेल याबाबतही जिन्नांची स्पष्टता ठेवली नव्हती. विज्ञान तंत्रज्ञानाबाबतही उपेक्षा झाली असल्याचे हुदभोय यांनी सांगितले. विज्ञान तंत्रज्ञानामुळे देश मजबूत झाला असता. मात्र, त्यादृष्टीने कोणतेही नियोजन जिन्ना यांनी केले नसल्याचेही टीकास्त्र हुजभोय यांनी सोडले.
पाकिस्तानचे बुरे दिन! महागाईने गाठला उच्चांक
काबूल: मिलिटरी अॅकेडमीजवळ आत्मघातकी हल्ला; ६ ठार
मोहम्मद अली जिन्ना यांचा द्विराष्ट्राचा सिद्धांत हा मुर्खपणा होता आणि बंगाली मुस्लिमांवर अत्याचार झाला असल्याचे सांगत त्यांनी पाकिस्तानी सरकारला घरचा आहेर दिला. मागील ७३ वर्षांपासून पाकिस्तानी नागरिकांची दिशाभूल सुरू आहे. पाकिस्तान सध्या गोंधळलेला देश आहे. याची निर्मितीच मूळात गोंधळलेल्या आणि व्हिजन नसताना झाली असल्याचे टीकास्त्र सोडले. शास्त्रज्ञ असलेल्या परवेझ हुदभोय यांनी २०१७ मध्येही पाकिस्तान फॅसिस्ट धार्मिक राष्ट्र बनत असल्याची टीका केली होती.