अ‍ॅपशहर

भारताला धक्का; शक्तिशाली देशांच्या यादीत घसरण; आशियात हा देश पॉवरफुल

Most Powerful Countries in World 2020: जगातील सर्वात सामर्थ्यवान देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या वर्षीदेखील अमेरिका अव्वल स्थानी असून भारत या यादीतून स्थान गमवावे लागले आहे,

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Oct 2020, 10:49 am
सिडनी: जगभरातील शक्तिशाली देशांची यादी जाहीर झाली असून भारताला धक्का बसला आहे. यंदाही यावर्षी अमेरिका जगातील सगळ्यात पॉवरफूल देश असून पहिल्या स्थानी आहे. भारताच्या स्थानात दोन अंकानी घसरण झाली आहे. मागील वर्षी भारताचा समावेश या यादीत होता. मात्र, करोना संसर्गाचा भारताला फटका बसला असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Most Powerful Countries in World 2020
भारताला धक्का; शक्तिशाली देशांच्या यादीत घसरण


सिडनी येथील लोवी इन्स्टिट्यूटच्या एशिया पॉवर इंडेक्स २०२० नुसार २०१९ मध्ये भारताचा पॉवर स्कोअर ४१.० होता. तर, यावर्षी या गुणात घट झाली असून ३९.७ टक्के इतके झाले आहे. या यादीत ज्या देशांचा पॉवर स्कोअर ४० हून अधिक आहे. त्या देशांचा समावेश सर्वाधिक शक्तिशाली देशांमध्ये होतो. त्यामुळे मागील वर्षी भारताचा समावेश या यादीत होता.

वाचा:'डोनाल्ड ट्रम्प आणि PM मोदी यांच्यात घनिष्ठ मैत्री, बायडन भारतविरोधी'

लोवी इन्स्टिट्यूटने सांगितले की, आशियातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दुसऱ्या क्रमांकाचा देश या यादीतून बाहेर गेला आहे. भारताचा समावेश आता मध्यम शक्तिशाली देशांच्या यादीत करण्यात आला आहे. येत्या काही वर्षात भारताचा या यादीत पुन्हा समावेश होऊ शकतो. इंडो-पॅसिफिक भागातील देशांमध्ये भारताने करोनाच्या संसर्गामुळे विकास करण्याची क्षमता गमावली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

वाचा:चिनी सैनिक भारताच्या ताब्यात; धमकी देणाऱ्या चिनी माध्यमांत नरमाईचा सूर!

अहवालानुसार, भारत आणि चीनची लोकसंख्या जवळपास एकसारखी आहे. काही वर्षानंतर लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकू शकतो. भारतात करोनाच्या संसर्गामुळे दोन्ही देशांदरम्यानची असमानता वाढली आहे. या दशकाच्या अखेरपर्यंत भारत चीनच्या एकूण आर्थिक उत्पादनाच्या केवळ ४० टक्केच पोहचू शकतो. तर, २०१९ आधी ही शक्यता ५० टक्के इतकी वर्तवण्यात आली होती.

वाचा:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मित्र कोण? पाकिस्तानमध्ये घमासान
या अहवालानुसार, भारताची कूटनीतिक प्रभाव वाढला आहे. या भागात मोठी भूमिका बजावण्याची भारताची महत्त्वकांक्षा स्पष्ट होत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. भारताने राजनयिक प्रभावात दक्षिण कोरिया आणि रशियाला मागे टाकले आहे.

गुणांकन 'या' आधारावर

ऑस्ट्रेलियाचे लोवी इन्स्टिट्यूट दर वर्षी जगातील प्रमुख देशांची आर्थिक क्षमता, सैन्य क्षमता, देशांतर्गत परिस्थिती, भविष्याचे नियोजन, जगातील इतर देशांसोबत असलेले संबंध, राजकीय व कूटनितीक प्रभाव आदी मुद्यांचा विचार करून शक्तिशाली देशाची यादी जाहीर करतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज