अ‍ॅपशहर

Coronavirus crisis नेपाळमध्येही करोनाचे थैमान; भारतापेक्षाही वाईट परिस्थिती होण्याची भीती

Nepal Coronavirus Crisis: भारताचा शेजारी देश नेपाळमध्येही करोनाचे थैमान सुरू झाले आहे. नेपाळमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 May 2021, 12:15 pm
काठमांडू: भारत करोनाच्या संकटाशी दोन हात करत असताना शेजारचा देश नेपाळमध्येही परिस्थिती चिंताजनक होत आहे. नेपामध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत असून प्रशासनाची चिंता वाढली आहे. करोनाच्या संसर्गावर वेळीच नियंत्रण न आणल्यास नेपाळची परिस्थिती भारतापेक्षाही अधिक वाईट होणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Kathamandu Coronavirus
काठमांडू: करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचे कुटुंबीय शोक व्यक्त करताना


नेपाळच्या रुग्णालयांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढली आहे. नेपाळ सरकारने इतर देशांना मदतीचे आवाहन केले आहे. नेपाळमध्ये सध्या दर एक लाख लोकांमागे २० जणांना करोनाची लागण होत आहे. हीच स्थिती भारतात दोन आठवड्यांपूर्वी होती. नेपाळ सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात नेपाळमध्ये करण्यात आलेल्या करोना चाचणीत ४४ टक्के करोनाबाधित आढळले आहेत. नेपाळ रेडक्रॉसचे अध्यक्ष डॉक्टर नेत्रा प्रसाद तिमसिना यांनी सांगितले की, करोनाच्या या लाटेला थोपवणे आवश्यक आहे. करोनाचा संसर्ग वाढल्यास नेपाळमद्ये भारतापेक्षाही वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते.

वाचा: फ्रान्सचा इशारा, करोना लशीचे लस उत्पादन वाढवा अन्यथा...

नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते डॉक्टर समीर अधिकारी यांनी सांगितले की, नेपाळमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. करोनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जवळपास तीन कोटी लोकसंख्या असलेल्या नेपाळमध्ये एक महिन्यांपूर्वी दररोज १०० च्या आसपास करोनाबाधित आढळत होते. दोन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये एकाच दिवशी ८६०० हून अधिक बाधित आढळले. नेपाळमध्ये वाढत असणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Coronavirus Crisis करोनाचा हाहा:कार: भारत-नेपाळ सीमेवरील २२ ठिकाणी एन्ट्री पॉईंट बंद

वाचा: भारतात करोनाची दुसरी लाट; आता 'या' देशाची भारतीयांना प्रवेश बंदी

भारतामुळे संसर्ग वाढल्याचा आरोप


भारतामुळे नेपाळमध्ये करोनाचा संसर्ग फैलावत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दोन्ही देशांमधील सीमा सुरू आहेत. अनेक भारतीय हवापालट करण्यासाठी आणि चांगले उपचार घेण्यासाठी नेपाळमध्ये दाखल झाले होते, असा दावा एका अधिकाऱ्याने केला. नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

महत्वाचे लेख