अ‍ॅपशहर

पाकिस्तानमधील राजकीय संकट टळलं; इम्रान खान यांनी जिंकला विश्वासमत ठराव

Pakistan Vote of Confidence: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील राजकीय संकट टळले आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वातील सरकारने संसदेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. विश्वासदर्शक ठरावावर विरोधी पक्षाने बहिष्कार घातला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Mar 2021, 4:57 pm
इस्लामाबाद: सिनेट निवडणुकीत अर्थ मंत्र्यांचा पराभव झाल्यानंतर इम्रान खान यांच्या नेतृत्वातील सरकारने आज संसदेत विश्वासमताचा ठराव जिंकला. या मतदानावर विरोधकांनी बहिष्कार घातला होता. सभागृहात झालेल्या मतदानात इम्रान खान यांनी बहुमत सिद्ध केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम imran khan
पाकिस्तानमधील राजकीय संकट टळलं; इम्रान खान यांनी जिंकला विश्वासमत ठराव


पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सरकारच्या बाजूने विश्वासदर्शक ठराव मांडला. सिनेट निवडणुकीत अर्थ मंत्री हाफीज शेख यांचा पराभव झाल्यानंतर इम्रान खान यांच्या नेतृत्वातील सरकारने पायउतार व्हावे अशी मागणी विरोधकांनी केली होती. त्यानंतर विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचा निर्णय सरकारने घेतला. आज दुपारी १२.१५ वाजता संसदेचे विशेष सत्र बोलावण्यात आले होते. मात्र, या सत्रावर विरोधकांनी बहिष्कार घातला.

वाचा: कधीकाळी होते पाकिस्तानचे हुकूमशहा; आज आहे 'अशी' अवस्था

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये एकूण ३४२ जागा आहेत. त्यापैकी एक जागा सध्या रिक्त आहे. बहुमतासाठी १७१ मतांची आवश्यकता होती. सरकारजवळ सध्या १७८ मते आहेत. तर, विरोधकांकडे १६० मते होती. इम्रान खान यांनी बोलावलेल्या पक्षाच्या आणि मित्रपक्षांच्या बैठकीत १७९ सदस्यांनी हजेरी लावली होती. मात्र, कोणताही दगाफटा होऊ नये यासाठी इम्रान खान यांनी व्हिप जारी केला होता.

वाचा: पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकार धोक्यात? शनिवारी विश्वासदर्शक ठराव

संसदेबाहेर राडा


सभागृहात विश्वासमतदर्शक ठरावावेळी चर्चा सुरू असताना विरोधी पक्षाच्या नेत्यांची पत्रकार परिषद सुरू होती. त्यावेळी सरकार समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. विरोधी पक्षाच्या नेत्यांना धक्काबुक्की करण्यात आली. माजी पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी यांना पळून जावे लागले.



पाकिस्तानच्या विरोधी पक्षांनी शुक्रवारीच संसदेच्या विशेष अधिवेशनात उपस्थित राहणार नसल्याचे म्हटले. सिनेट निवडणुकीत सरकारचा पराभव झाला आहे. त्यामुळे सरकारने विश्वास गमावला असल्याचे विरोधकांनी म्हटले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज