अ‍ॅपशहर

काश्मीर समस्येवर मध्यस्थी नाही: राष्ट्रसंघाने फटकारले

काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्रसंघाने मध्यस्थी करावी, असे तुणतुणे वारंवार वाजविणाऱ्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रसंघाने चांगलेच फटकारले आहे. काश्मीर समस्येमध्ये मध्यस्थीची शक्यता संयुक्त राष्ट्रसंघाने फेटाळली असून या समस्येशी संबंधित सर्व पक्षांची सहमती असेल, तरच मध्यस्थी करू, असे वक्तव्य संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी मंगळवारी केले.

PTI 24 Jan 2018, 8:40 am
वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्रसंघाने मध्यस्थी करावी, असे तुणतुणे वारंवार वाजविणाऱ्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रसंघाने चांगलेच फटकारले आहे. काश्मीर समस्येमध्ये मध्यस्थीची शक्यता संयुक्त राष्ट्रसंघाने फेटाळली असून या समस्येशी संबंधित सर्व पक्षांची सहमती असेल, तरच मध्यस्थी करू, असे वक्तव्य संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी मंगळवारी केले. तसेच, भारत आणि पाकिस्तानने चर्चेद्वारे सर्व समस्यांचे निराकरण करावे, असा सल्ला दिला.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक म्हणाले, 'संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थीची कायमच तयारी असते. पण, त्याकरिता संबंधित समस्येवर मध्यस्थीसाठी प्रत्येक पक्षाची तयारी हवी. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावासंबंधी आम्हाला कल्पना आहे. गेल्या दहा दिवसांत दोन्ही देशांत काय सुरू आहे, यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. कुठल्याही समस्येमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी करण्यासाठी समस्येशी संबंधित सर्व घटकांची मंजुरी हवी. कुठल्याही मध्यस्थीसाठी हे आवश्यक आहे. भारत आणि पाकिस्तानने त्यांच्यातील समस्या चर्चेद्वारे सोडव्याव्यात.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज