अ‍ॅपशहर

काश्मीरवरून अणुयुद्ध अशक्य!: झरदारी

पाकिस्तानातील काही बोलके नेते ऊठसूट भारताला अणुयुद्धाच्या धमक्या देत असताना पाकचे माजी अध्यक्ष व पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आसिफ अली झरदारी यांनी मात्र काहीशी वेगळी व समंजस भूमिका मांडली आहे. 'अण्वस्त्र म्हणजे काही चेष्टा नाही. मनात आलं म्हणून कुणी अण्वस्त्र वापरू शकत नाही आणि काश्मीर मुद्द्यावरून भारत-पाकिस्तानात अणुयुद्ध होणं अशक्य आहे,' असं मत झरदारी यांनी माडलं आहे.

Maharashtra Times 27 Jul 2016, 10:36 am
मटा ऑनलाइन वृत्त । इस्लामाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nuclear weapons are not joke says zardari
काश्मीरवरून अणुयुद्ध अशक्य!: झरदारी


पाकिस्तानातील काही बोलके नेते ऊठसूट भारताला अणुयुद्धाच्या धमक्या देत असताना पाकचे माजी अध्यक्ष व पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आसिफ अली झरदारी यांनी मात्र काहीशी वेगळी व समंजस भूमिका मांडली आहे. 'अण्वस्त्र म्हणजे काही चेष्टा नाही. मनात आलं म्हणून कुणी अण्वस्त्र वापरू शकत नाही आणि काश्मीर मुद्द्यावरून भारत-पाकिस्तानात अणुयुद्ध होणं अशक्य आहे,' असं मत झरदारी यांनी माडलं आहे.

'रशिया टुडे' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत झरदारी यांनी काश्मीरवरून भारत-पाकमध्ये सध्या निर्माण झालेल्या तणावाबद्दल प्रतिक्रिया दिली. 'काश्मीर मुद्द्यावरून अणुयुद्ध होण्याची शक्यता धूसर आहे. सगळं काही ठीक होईल', असं ते म्हणाले. 'एखादा देश अणुबॉम्ब बनवू शकतो. बनवलेले अणुबॉम्ब स्वत:च्या शस्त्रागारात ठेवू शकतो. त्याचं प्रदर्शनही मांडू शकतो. पण अणुबॉम्ब वापरणं ही काही चेष्टा नाही,' असंही ते म्हणाले.

अणुयुद्धाची शक्यता फेटाळणाऱ्या झरदारी यांनी काश्मीरविषयी मात्र पाकची बाजू उचलून धरली. 'जास्तीत जास्त काश्मिरी पाकिस्तानच्या बाजूनं आहेत. इतकंच नव्हे तर, आमचे सध्याचे पंतप्रधानही काश्मिरी आहेत. त्यामुळं जगानं एकमेकांकडं बोटं दाखवण्यापेक्षा एकत्र बसून या संकटातून मार्ग काढायला हवा,' असं ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज