इस्लामाबाद
भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये केलेली कारवाई ही भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेली ही कृती अत्यंत गंभीर आहे. भारताने नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले असून पाकिस्तानला भारताला जशास तसे उत्तर देण्याचा, तसेच आत्मसंरक्षणाचा हक्क आहे असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटले आहे.
भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये हवाई हल्ले केल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी परराष्ट्र मंत्रालयात तातडीची उच्च स्तरीय बैठक बौलावली. बैठकीनंतर त्यांनी या कारवाईवरून भारतावर टीकास्त्र सोडले. भारत अस्थिरतेकडे वाटचाल करत असून हे सगळे निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केले जात असल्याचे कुरेशी म्हणाले.
पाकिस्तानचे लष्कर भारताकडून होणाऱ्या कारवाईला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचेही कुरेशी म्हणाले. लवकरच आम्ही पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत विशेष बैठक घेणार असल्याचेही ते म्हणाले.
भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले असून आपण स्वत: विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधून त्यांना परिस्थितीची माहिती दिली असल्याचेही ते म्हणाले.
भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये केलेली कारवाई ही भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेली ही कृती अत्यंत गंभीर आहे. भारताने नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले असून पाकिस्तानला भारताला जशास तसे उत्तर देण्याचा, तसेच आत्मसंरक्षणाचा हक्क आहे असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटले आहे.
भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये हवाई हल्ले केल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी परराष्ट्र मंत्रालयात तातडीची उच्च स्तरीय बैठक बौलावली. बैठकीनंतर त्यांनी या कारवाईवरून भारतावर टीकास्त्र सोडले. भारत अस्थिरतेकडे वाटचाल करत असून हे सगळे निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केले जात असल्याचे कुरेशी म्हणाले.
पाकिस्तानचे लष्कर भारताकडून होणाऱ्या कारवाईला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचेही कुरेशी म्हणाले. लवकरच आम्ही पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत विशेष बैठक घेणार असल्याचेही ते म्हणाले.
भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले असून आपण स्वत: विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधून त्यांना परिस्थितीची माहिती दिली असल्याचेही ते म्हणाले.