अ‍ॅपशहर

भारताच्या हल्ल्यानं पाकिस्तान घायाळ

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं ठणकावताच भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रसंघात बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केल्यामुळं पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. 'बलुचिस्तान हा पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न असून भारतानं तो जगासमोर आणून आंतरराष्ट्रीय नियमांचं स्पष्ट उल्लंघन केलं आहे,' असा कांगावा पाकिस्ताननं केला आहे.

Maharashtra Times 27 Sep 2016, 11:19 am
मटा ऑनलाइन वृत्त । न्यूयॉर्क
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pakistan a dysfunctional state must clarify on thriving terror havens india
भारताच्या हल्ल्यानं पाकिस्तान घायाळ


काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं ठणकावताच भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रसंघात बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केल्यामुळं पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. 'बलुचिस्तान हा पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न असून भारतानं तो जगासमोर आणून आंतरराष्ट्रीय नियमांचं स्पष्ट उल्लंघन केलं आहे,' असा कांगावा पाकिस्ताननं केला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेला संबोधित करताना सुषमा स्वराज यांनी सोमवारी पाकिस्तानवर थेट हल्ला चढवला होता. पाकिस्तान हा दहशतवाद पोसत असून जगानं बंदी घातलेले दहशतवादी पाकिस्तानात उजळ माथ्यानं फिरत आहेत, असं स्वराज यांनी म्हटलं होतं. काश्मीरमध्ये तोंड खुपसणाऱ्या पाकिस्ताननं बलुचिस्तानमधील अत्याचारांकडं लक्ष द्यावं, असंही स्वराज यांनी सुनावलं होतं. स्वराज यांच्या जोरदार हल्ल्यानं पाकिस्तानच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. स्वराज यांच्या भाषणानंतर बोलताना पाकिस्तानच्या प्रतिनिधी मलिहा लोधी यांनी भारतावर खोटारडेपणाचा आरोप केला. 'स्वराज यांचे पाकवरील आरोप निराधार आहेत. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा नाही. हा आंतरराष्ट्रीय वादाचा मुद्दा आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पत्रिकेवरील जुना विषय आहे,' असं लोधी म्हणाल्या. 'बलुचिस्तानचा मुद्दा उकरून भारतानं संयुक्त राष्ट्र चार्टर व आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केलं आहे,' असं ट्विटही लोधी यांनी केलं आहे.

लोधी यांचे सर्व मुद्दे भारतानं पुन्हा एकदा खोडून काढले आहेत. 'काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील. भारताची ही भूमिका ठाम आणि स्पष्ट आहे. पाकिस्ताननं हे पक्क ध्यानात घ्यावं,' असा सणसणीत टोला भारताच्या प्रतिनिधी ऐनम गंभीर यांनी हाणला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज