अ‍ॅपशहर

भारताचा गोळीबार; पाकचे ४ सैनिक नदीत बुडाले

पाकव्याप्त काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारामुळे आमच्या चार जवानांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तान लष्कराने केला आहे.

Maharashtra Times 17 Jul 2017, 12:02 pm
मटा ऑनलाइन वृत्त । इस्लामाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pakistan again did ceasefire violation 4 pak soldiers drowned in river during firing
भारताचा गोळीबार; पाकचे ४ सैनिक नदीत बुडाले


पाकव्याप्त काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारामुळे आमच्या चार जवानांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तान लष्कराने केला आहे.

पाकिस्तान लष्करचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी हा दावा केला आहे. मुजफ्फराबादहून ७३ किलोमीटर दूरवर असलेल्या आठमुकाममधील नीलम नदीजवळ असलेल्या पाकिस्तानच्या वाहनावर भारतीय जवानाने गोळीबार केला, असे गफूर यांनी सांगितले. गोळीबारामुळे हे वाहन नदीत बुडाले असून त्यात पाकिस्तानचे चार जवान होते. यातील एकाचा मृतदेह मिळाला आहे. तर अन्य तीन जणांचा शोध सुरू आहे, असेही गफूर यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज