अ‍ॅपशहर

India Pakistan पाकिस्तानकडून १७ भारतीय मच्छिमारांना अटक; तीन बोटी जप्त

पाकिस्तानच्या हद्दीत घुसखोरी केल्याच्या आरोपातून १७ भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय त्यांच्या तीन बोटीही जप्त करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Mar 2021, 6:52 pm
कराची: पाकिस्तानने १७ भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. त्याशिवाय त्यांच्या तीन बोटींही जप्त केल्या आहेत. पाकिस्तानी समु्द्र हद्दीत प्रवेश केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या मच्छिमारांना शनिवारी मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले आणि पोलिसांकडे त्यांना सुपूर्द करण्यात आले असल्याची माहिती पाकिस्तान समु्द्र सुरक्षा संस्थेच्या (पीएमएसए) प्रवक्त्यांनी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Pakistan arrest Indian fisherman
संग्रहित छायाचित्र


पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय मच्छिमारांना आधी इशारा देण्यात आला होता. मच्छिमारांनी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला असून त्यांनी पुन्हा माघारी जावे, असा इशाराही देण्यात आला. मात्र, त्यांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मच्छिमारांना अटक करण्यासाठी स्पीड बोटचा वापर करण्यात आला. भारतीय मच्छिमारांनी पाकिस्तानच्या हद्दीत १० ते १५ समु्द्री मैलपर्यंत प्रवेश केला होता.

वाचा: चीनचे भारतात ४० हजार सायबर हल्ले; वीज पुरवठा खंडित करण्याचा डाव?

एक वर्षानंतर अटकेची कारवाई


अटक करण्यात आलेल्या भारतीय मच्छिमारांना मलिर किंवा लांधी या तुरुंगात डांबले जाते. अटकेची कारवाई एक वर्षानंतर करण्यात आली आहे. याआधी वर्षभरापूर्वी २३ मच्छिमारांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह मासेमारीसाठी वापरण्यात आलेल्या चार बोटीही जप्त करण्यात आल्या होत्या.

वाचा: भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी; नागरीक संघटनांकडून स्वागत

वाचा: भारत-पाक शस्त्रसंधीचे इम्रान खान यांच्याकडून स्वागत, पण हेका कायम!

समुद्रातील हद्द ओलांडली कशी जाते?


पाकिस्तान आणि भारत दोन्ही देश एकमेकांच्या मच्छिमारांना अटक करतात. अरबी समुद्रात समुद्री सीमेबाबत कोणतेही स्पष्ट सीमांकन नाही. त्याशिवाय मच्छिमारांकडे योग्य स्थान दाखवणारे तंत्रज्ञान असणाऱ्या बोटीही नसतात. त्यामुळे अनेकदा दोन्ही देशातील मच्छिमार समुद्री सीमा ओलांडून दुसऱ्या देशात प्रवेश करतात. अनेक दिवस चालणारी कायदेशीर प्रक्रिया आणि इतर कारणांमुळे अनेक मच्छिमारांना अनेक महिने तुरुंगात राहावे लागते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज