मटा ऑनलाइन वृत्त। इस्लामाबाद
हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर बुरहान वानी ठार झाल्यानंतर काश्मीरमध्ये भडकलेल्या हिंसक आंदोलनावरून पाकिस्तान भारताला सतत घेरण्याचा प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाकिस्तानने बुरहान आणि अन्य दहशतवाद्यांचे वर्णन 'स्वातंत्र्याची लढाई लढणारे लोक' असे केले असून भारतीय सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये ‘राज्य-दहशतवाद’ पसरवला असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.
पाकिस्तानी परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता नफीस जकारिया यांनी या प्रकरणावर भाष्य करताना म्हटले, ' भारतीय सुरक्षा दल काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याचे काम करत असून आंतरराष्ट्रीय पातळीवर याची दखल घेतली गेली पाहिजे.'
जकारिया यांना जेव्हा बुरहान वानीबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी हिजबुलचा हा कमांडर आणि इतर दहशतवादी म्हणजे ' स्वातंत्र्याची लढाई लढणारे लोक आहेत' असे उत्तर दिले. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य असेलेले देश आणि युरोपीय युनियनसमोर काश्मीरचा मुद्दा मांडला आहे, अशी माहितीही जकारिया यांनी दिली.
काश्मीर मुद्द्यावर आपल्या प्रस्तावाची अंमलबजावणी करावी असे आवाहनही जकारिया यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला केल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीरसह जगातील सर्व वादांवर तोडगा काढण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्रसंघाची आहे, असेही जकारिया पुढे म्हणाले.
'आम्हाला संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रस्तावांप्रमाणे काश्मीर मुद्द्यावर प्रस्ताव हवा आहे', असे म्हणत, 'जर तुम्ही ( संयुक्त राष्ट्रसंघ) काश्मीरसंबंधीत प्रस्तावात मदत करू इच्छित असाल तर ही तुमची जबाबदारी आहे', अशी आठवण जकारिया यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला करून दिली आहे.
काश्मीरसह इतर अनेक प्रलंबित मुद्द्यांवर पाकिस्तान भारतासोबत चर्चा करूनच मार्ग काढू इच्छितो याचा पुनरूच्चार जकारिया यांनी केला. युद्ध कोणतीही समस्या सोडवण्याचा उपाय नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले. काश्मीर प्रकरणी आम्ही युद्धही केले आणि चर्चाही, मात्र ही समस्या अद्याप सुटू शकलेली नाही. यामुळे काश्मीरप्रकरणी भारताने पाकिस्तानशी चर्चा करावी यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने भारतावर दबाव आणावा अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर बुरहान वानी ठार झाल्यानंतर काश्मीरमध्ये भडकलेल्या हिंसक आंदोलनावरून पाकिस्तान भारताला सतत घेरण्याचा प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाकिस्तानने बुरहान आणि अन्य दहशतवाद्यांचे वर्णन 'स्वातंत्र्याची लढाई लढणारे लोक' असे केले असून भारतीय सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये ‘राज्य-दहशतवाद’ पसरवला असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.
पाकिस्तानी परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता नफीस जकारिया यांनी या प्रकरणावर भाष्य करताना म्हटले, ' भारतीय सुरक्षा दल काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याचे काम करत असून आंतरराष्ट्रीय पातळीवर याची दखल घेतली गेली पाहिजे.'
जकारिया यांना जेव्हा बुरहान वानीबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी हिजबुलचा हा कमांडर आणि इतर दहशतवादी म्हणजे ' स्वातंत्र्याची लढाई लढणारे लोक आहेत' असे उत्तर दिले. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य असेलेले देश आणि युरोपीय युनियनसमोर काश्मीरचा मुद्दा मांडला आहे, अशी माहितीही जकारिया यांनी दिली.
काश्मीर मुद्द्यावर आपल्या प्रस्तावाची अंमलबजावणी करावी असे आवाहनही जकारिया यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला केल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीरसह जगातील सर्व वादांवर तोडगा काढण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्रसंघाची आहे, असेही जकारिया पुढे म्हणाले.
'आम्हाला संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रस्तावांप्रमाणे काश्मीर मुद्द्यावर प्रस्ताव हवा आहे', असे म्हणत, 'जर तुम्ही ( संयुक्त राष्ट्रसंघ) काश्मीरसंबंधीत प्रस्तावात मदत करू इच्छित असाल तर ही तुमची जबाबदारी आहे', अशी आठवण जकारिया यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला करून दिली आहे.
काश्मीरसह इतर अनेक प्रलंबित मुद्द्यांवर पाकिस्तान भारतासोबत चर्चा करूनच मार्ग काढू इच्छितो याचा पुनरूच्चार जकारिया यांनी केला. युद्ध कोणतीही समस्या सोडवण्याचा उपाय नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले. काश्मीर प्रकरणी आम्ही युद्धही केले आणि चर्चाही, मात्र ही समस्या अद्याप सुटू शकलेली नाही. यामुळे काश्मीरप्रकरणी भारताने पाकिस्तानशी चर्चा करावी यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने भारतावर दबाव आणावा अशी भूमिकाही त्यांनी मांडली.