वृत्तसंस्था, लाहोर
पाकिस्तानातील पंजाब पोलिसांनी साहिवालमध्ये केलेल्या चकमकीत एक दांपत्य आणि त्यांची तरुण मुलगी ठार झाले आहेत. पोलिसांनी या चकमकीला दहशतवाद्यांविरोधातील कारवाई म्हटले आहे. मात्र, या चकमकीचा नागरिकांनी निषेध सुरू केला आहे. ही चकमक पूर्वनियोजित असल्याचा आरोप करून मृतांच्या कुटुंबीयांनीही आंदोलन केले आहे. दरम्यान, ठार झालेल्या चौघांपैकी तिघे निष्पाप असल्याचे दहशतवादविरोधी पथकाने रविवारी सायंकाळी मान्य केले.
दहशतवादविरोधी पथकाने ही चकमक केली, त्या वेळी हे कुटुंब कारमध्ये होते. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचा दावा पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे. साहिवालमधील महामार्गावर शनिवारी ही चकमक झाली. या चकमकीत किराणा दुकान व्यावसायिक महंमद खलील (वय ४२), त्याची पत्नी नबीला (वय ३८), त्यांची तेरा वर्षांची मुलगी अरीबा, तसेच या कुटुंबीयांचा मित्र झीशान जावेद यांचा मृत्यू झाला. जावेद हा कार चालवत होता. तो दहशतवादी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या चकमकीत महंमद खलील यांच्या लहान मुलालाही गोळ्या लागल्या आहेत, तर इतर दोन मुली सुरक्षित आहेत.
दरम्यान, या चकमकीनंतर मृतांचे कुटुंबीय, तसेच हे कुटुंब राहत असलेल्या भागातील रहिवाशांनी निदर्शन केली, तसेच लाहोरमध्ये रास्ता रोको आंदोलन केले. या प्रकाराबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांनी पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांच्याकडून अहवाल मागवला आहे. या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या चकमकीत सहभागी असलेल्या दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश मुख्यमंत्री बुझदार यांनी दिले आहेत. या प्रकरणी पंजाब प्रांताच्या पोलिस महानिरीक्षकांनी चौकशी पथकाची स्थापना केली आहे.
दरम्यान, या चकमकीत ठार झालेले तिघे निरपराध असून या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकातील १६ जवानांना अटक करण्यात आल्याची माहिती पंजाबचे कायदामंत्री बशरत राजा यांनी दिली. तसेच या कारवाईचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबितही करण्यात आले आहे. ठार झालेले चौघेही 'आयएस'चे दहशतवादी असल्याचा दावा दहशतवादविरोधी पथकाने केला होता. तसेच झिशान हा आयएसचा सक्रिय दहशतवादी होता आणि झिशानला ठार केल्यानंतर अफगाणिस्तानातून आयएसच्या कमांडरने अन्य दहशतवाद्यांना लपण्याचे आदेश दिले होते, असाही दावा दहशतवादविरोधी पथकाने केला होता. दहशतवादविरोधी पथकाने रविवारी निवेदन प्रसिद्ध करून खलील आणि त्यांचे कुटुंबिय निष्पाप असल्याचे जाहीर केले. झिशान हा दहशतवादी असल्याचे त्यांना ठाऊक नव्हते. दारुगोळा आणि स्फोटके नेण्यासाठीच झिशानने खलील यांना लिफ्ट दिली होती, असेही निवेदनात म्हटले आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून, चौकशीनंतर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
पाकिस्तानातील पंजाब पोलिसांनी साहिवालमध्ये केलेल्या चकमकीत एक दांपत्य आणि त्यांची तरुण मुलगी ठार झाले आहेत. पोलिसांनी या चकमकीला दहशतवाद्यांविरोधातील कारवाई म्हटले आहे. मात्र, या चकमकीचा नागरिकांनी निषेध सुरू केला आहे. ही चकमक पूर्वनियोजित असल्याचा आरोप करून मृतांच्या कुटुंबीयांनीही आंदोलन केले आहे. दरम्यान, ठार झालेल्या चौघांपैकी तिघे निष्पाप असल्याचे दहशतवादविरोधी पथकाने रविवारी सायंकाळी मान्य केले.
दहशतवादविरोधी पथकाने ही चकमक केली, त्या वेळी हे कुटुंब कारमध्ये होते. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचा दावा पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे. साहिवालमधील महामार्गावर शनिवारी ही चकमक झाली. या चकमकीत किराणा दुकान व्यावसायिक महंमद खलील (वय ४२), त्याची पत्नी नबीला (वय ३८), त्यांची तेरा वर्षांची मुलगी अरीबा, तसेच या कुटुंबीयांचा मित्र झीशान जावेद यांचा मृत्यू झाला. जावेद हा कार चालवत होता. तो दहशतवादी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या चकमकीत महंमद खलील यांच्या लहान मुलालाही गोळ्या लागल्या आहेत, तर इतर दोन मुली सुरक्षित आहेत.
दरम्यान, या चकमकीनंतर मृतांचे कुटुंबीय, तसेच हे कुटुंब राहत असलेल्या भागातील रहिवाशांनी निदर्शन केली, तसेच लाहोरमध्ये रास्ता रोको आंदोलन केले. या प्रकाराबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांनी पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांच्याकडून अहवाल मागवला आहे. या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या चकमकीत सहभागी असलेल्या दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश मुख्यमंत्री बुझदार यांनी दिले आहेत. या प्रकरणी पंजाब प्रांताच्या पोलिस महानिरीक्षकांनी चौकशी पथकाची स्थापना केली आहे.
दरम्यान, या चकमकीत ठार झालेले तिघे निरपराध असून या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकातील १६ जवानांना अटक करण्यात आल्याची माहिती पंजाबचे कायदामंत्री बशरत राजा यांनी दिली. तसेच या कारवाईचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबितही करण्यात आले आहे. ठार झालेले चौघेही 'आयएस'चे दहशतवादी असल्याचा दावा दहशतवादविरोधी पथकाने केला होता. तसेच झिशान हा आयएसचा सक्रिय दहशतवादी होता आणि झिशानला ठार केल्यानंतर अफगाणिस्तानातून आयएसच्या कमांडरने अन्य दहशतवाद्यांना लपण्याचे आदेश दिले होते, असाही दावा दहशतवादविरोधी पथकाने केला होता. दहशतवादविरोधी पथकाने रविवारी निवेदन प्रसिद्ध करून खलील आणि त्यांचे कुटुंबिय निष्पाप असल्याचे जाहीर केले. झिशान हा दहशतवादी असल्याचे त्यांना ठाऊक नव्हते. दारुगोळा आणि स्फोटके नेण्यासाठीच झिशानने खलील यांना लिफ्ट दिली होती, असेही निवेदनात म्हटले आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून, चौकशीनंतर कारवाईचे आश्वासन दिले आहे.