पाच वर्षात २९८ भारतीयांना पाकचे नागरिकत्व
भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असली तरी पाकिस्तानने मागील पाच वर्षात २९८ स्थलांतरित भारतीयांना पाकिस्तानचे नागरिकत्व दिले असल्याची माहिती पाक सरकारने दिली आहे. पाकिस्तानच्या संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली.
Maharashtra Times 20 Aug 2017, 5:51 pm
मटा ऑनलाइन वृत्त । इस्लामाबाद
भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असली तरी पाकिस्तानने मागील पाच वर्षात २९८ स्थलांतरित भारतीयांना पाकिस्तानचे नागरिकत्व दिले असल्याची माहिती पाक सरकारने दिली आहे. पाकिस्तानच्या संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली.
पाकिस्तान सरकारच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसारे, वर्ष २०१२ साली ४८ भारतीयांना पाकिस्तानचे नागरिकत्व देण्यात आले होते. २०१३ साली ७५ आणि २०१४ साली ७६ नागरिकांना पाकिस्तानचे नागरिकत्व देण्यात आले होते. वर्ष २०१५ साली अवघ्या १५ भारतीयांना नागरिकत्व देण्यात आले होते. त्यानंतर २०१६ साली ६९ जणांना नागरिकत्व देण्यात आले. यावर्षी १४ एप्रिलपर्यंत १५ स्थलांतरित भारतीयांना पाकिस्तानने नागरिकत्व दिले. पाकिस्तानचे नागरिकत्व मिळवणे ही कठिण बाब असल्याचेही गृहमंत्रालयाने सांगितले. तरीदेखील भारत, अफगाणिस्तान, बांग्लादेश, म्यानमारसारख्या देशांतील अनेक नागरिकांना नागरिकत्व देण्यात आले असल्याचे गृहमंत्रालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले
भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असली तरी पाकिस्तानने मागील पाच वर्षात २९८ स्थलांतरित भारतीयांना पाकिस्तानचे नागरिकत्व दिले असल्याची माहिती पाक सरकारने दिली आहे. पाकिस्तानच्या संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली.
पाकिस्तान सरकारच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसारे, वर्ष २०१२ साली ४८ भारतीयांना पाकिस्तानचे नागरिकत्व देण्यात आले होते. २०१३ साली ७५ आणि २०१४ साली ७६ नागरिकांना पाकिस्तानचे नागरिकत्व देण्यात आले होते. वर्ष २०१५ साली अवघ्या १५ भारतीयांना नागरिकत्व देण्यात आले होते. त्यानंतर २०१६ साली ६९ जणांना नागरिकत्व देण्यात आले. यावर्षी १४ एप्रिलपर्यंत १५ स्थलांतरित भारतीयांना पाकिस्तानने नागरिकत्व दिले. पाकिस्तानचे नागरिकत्व मिळवणे ही कठिण बाब असल्याचेही गृहमंत्रालयाने सांगितले. तरीदेखील भारत, अफगाणिस्तान, बांग्लादेश, म्यानमारसारख्या देशांतील अनेक नागरिकांना नागरिकत्व देण्यात आले असल्याचे गृहमंत्रालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले