अ‍ॅपशहर

ताजिकिस्तानला शस्त्र विक्री करणार पाकिस्तान; भारताला घेरण्याची तयारी?

पाकिस्तानने आशियाई देश ताजिकिस्तानसोबत स्वेदशी बनावटीची शस्त्रे विक्रीचा करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून पाकिस्तान एकाच वेळी अनेक हित साधण्यासाठी धडपड करत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jun 2021, 3:23 pm
इस्लामाबाद: ताजिकिस्तानचे राष्ट्रपती इमाम अली रहमान सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. भारतासह इतर देशांचेही या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे. काश्मीर आणि सियाचीनमध्ये भारताची कोंडी करण्यासाठी पाकिस्तान आता मध्य आशियाई देश ताजिकिस्तानची मदत घेण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pakistan-tajikistan
पाकिस्तान-ताजिकिस्तानमध्ये करार


इस्लामाबादमध्ये इम्रान खान आणि इमाम अली रहमान यांच्यात झालेल्या बैठकीत शस्त्र खरेदीवर मोठा करार झाला आहे. पाकिस्तान ताजिकिस्तानला शस्त्रे विक्री करणार आहे. त्यामुळे ताजिकिस्तानच्या सैन्याची ताकद वाढणार आहे. या करारात बहुतांशी लहान शस्त्रांचा समावेश असल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले.

ताजिकिस्तानला शस्त्रांची गरज का?

ताजिकिस्तान आणि शेजारचा देश किर्गिस्तानमध्ये सीमा प्रश्नी वाद सुरू आहे. एक महिन्यापूर्वीच दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही बाजूने झालेल्या संघर्षात काही नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. या भागात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर आहे. सीमा आणि पाणीच्या मुद्यावरून दोन्ही देशांमध्ये सातत्याने वाद होत असतात. त्यामुळेच ताजिकिस्तानला शस्त्रांची गरज आहे.

इस्रायलमध्ये नेतन्याहू बाजी पलटणार?; सत्ता वाचवण्यासाठी खेळणार 'हा' डाव!

पाकिस्तानकडूनच शस्त्रे खरेदी का?

दोन्ही देश आर्थिक आणि इतर संकटाचा सामना करत आहेत. त्यामुळे दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहेत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या खिळखिळी झाली आहे. त्यामुळे या शस्त्र करारामुळे काही प्रमाणात लाभ होईल असे पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांना वाटत आहे. तर, ताजिकिस्तानदेखील श्रीमंत देश नाही. त्यामुळे अमेरिका, रशिया, फ्रान्सकडून अत्याधुनिक शस्त्रे खरेदी करू शकतो. त्याशिवाय या देशांकडून शस्त्र खरेदी केल्यास त्यांना त्वरीत पैसे द्यावे लागले असते.

इस्रायलबाबत मवाळ भूमिका; भारतावर पॅलेस्टाइन नाराज

भारताच्या एकमेव सैन्य तळावर पाकिस्तानची नजर?


ताजिकिस्तानला पाकिस्तान आपला चांगला मित्र बनवू इच्छित आहे. फर्करोय हवाई तळ हे त्यामागील कारण आहे. हा हवाई तळ १९९६-९७ पासून भारतीय हवाई दल संचलित करत आहे. या दरम्यान भारतीय गुप्तचर संस्था रॉ या हवाई तळाचा वापर करत होती. अफगाणिस्तानमध्ये तालिबानविरोधात लढणाऱ्या नॉदर्न अलायन्सची मदत करण्यासाठी हा तळ वापरला जात होता. भारताने या ठिकाणी छोटेसं लष्करी रुग्णालयही सुरू केले असून त्याला मैत्री हॉस्पिटलही म्हटले जाते. या ठिकाणी तालिबानसोबतच्या लढाईत जखमी झालेल्या नॉदर्न अलायन्सच्या जवानांवर उपचार केले जात होते.


धक्कादायक! पाण्याच्या वादावरून दोन देशांमध्ये गोळीबार; तीन जण ठार


भारतासाठी ताजिकिस्तान का महत्त्वाचा?


ताजिकिस्तानची सीमा चीन, अफगाणिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरला लागून आहे. या भागातून जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनवरही नजर ठेवली जाऊ शकते. भारताकडूनही फर्कहोर हवाई तळाचा वापर यासाठी करण्यात येतो. भारत या ठिकाणांहून पाकिस्तान आणि चीनच्या हवाई हालचालींवरही लक्ष ठेऊ शकतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज