अ‍ॅपशहर

महागाईने जनता त्रस्त; मंत्री म्हणतात, लोकांनी कमी खावं!

विरोधी पक्षात असल्यावर अनेक राजकीय नेते महागाईच्या मुद्यावर आक्रमक होत सत्ताधाऱ्यांना जाब विचारतात. मात्र, हेच विरोधी बाकावरील नेते सत्ताधारी झाल्यावर महागाईबाबत लोकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना कमी खाण्याचा सल्ला देण्यासही मागे पुढे पाहत नाहीत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Oct 2021, 11:24 am
इस्लामाबाद: मागील काही महिन्यांपासून पाकिस्तानी जनतेला महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईमुळे अनेक कुटुंबाचे बजेट कोलमडले आहे. महागाईच्या आगीत जनता होरपळत असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य पाकिस्तानच्या मंत्र्याने केले आहे. महागाईपासून दूर राहण्यासाठी लोकांनी कमी खाण्याचा सल्ला या मंत्र्याने दिला आहे. पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानच्या प्रकरणाचे मंत्री अली अमीन गंडापूर यांनी केलेले हे वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ali-Aman-Gandapur
महागाईने जनता त्रस्त; पाकिस्तानी मंत्री म्हणतात, लोकांनी कमी खावं!


एका सभेला संबोधित करताना अली अमीन यांनी, महागाईच्या वादावर बोलताना राष्ट्रवादाची आसरा घेत लोकांना म्हटले की, चहामध्ये मी दोनशे दाणे टाकतो. त्यापैकी काही दाणे कमी टाकले तर चहातला गोडवा कमी होणार नाही. देशासाठी स्वत:च्या आत्मनिर्भरतेसाठी एवढेही बलिदान देऊ शकत नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना विचारला.

पाकिस्तानचे वादग्रस्त अणुशास्त्रज्ञ ए. क्यू खान यांचे निधन
मागील काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी गव्हाचे पीठ आणि इतर खाद्यान्नांची टंचाई निर्माण झाली होती.

पाकिस्तानच्या नागरिकांना कमी खाण्याचा सल्ला याआधीही देण्यात आला होता. तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी १९९८ मध्ये अण्वस्त्र चाचणी केली होती. त्यावेळी पाश्चिमात्य देशांकडून पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध लावण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यावेळी नवाझ शरिफ यांनी रेडिओवरून पाकिस्तानला संबोधित करताना एक वेळच जेवण्याची तयारी ठेवावी असे आवाहन केले होते.

बलात्कार, हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात काढली ३७ वर्षे; डीएनए चाचणीमुळे ठरला निर्दोष!
आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानची परिस्थिती चिंताजनक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेनेदेखील पाकिस्तानमधील स्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती. या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कौतुक केले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज