अ‍ॅपशहर

इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींचं केलं अभिनंदन

लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचंड मोठा विजय मिळवत पुन्हा सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदन केलं आहे. दोन्ही देश लोकांच्या भल्यासाठी मिळून काम करतील, अशी अपेक्षा खान यांनी व्यक्त केली. 'दोन्ही देशांत शांतता आणि समृद्धीसाठी हिंसामुक्त, दहशतवादमुक्त वातावरणाची खूप आवश्यकता आहे,' असं उत्तर मोदींनी दिलं. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर झालेल्या बालाकोट एअरस्ट्राइकनंतर दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी पहिल्यांदाच फोनवर चर्चा केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 May 2019, 5:24 pm
इस्लामाबाद:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम modi-imran


लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचंड मोठा विजय मिळवत पुन्हा सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदन केलं आहे. दोन्ही देश लोकांच्या भल्यासाठी मिळून काम करतील, अशी अपेक्षा खान यांनी व्यक्त केली. 'दोन्ही देशांत शांतता आणि समृद्धीसाठी हिंसामुक्त, दहशतवादमुक्त वातावरणाची खूप आवश्यकता आहे,' असं उत्तर मोदींनी दिलं. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर झालेल्या बालाकोट एअरस्ट्राइकनंतर दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी पहिल्यांदाच फोनवर चर्चा केली.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांनी रविवारी ट्विट करून ही माहिती दिली. फैसल यांनी असेही लिहिलंय की, 'दक्षिण आशियात शांतता, विकास आणि समृद्धीसाठी इम्रान खान पंतप्रधान मोदींसोबत काम करण्यास इच्छुक आहेत.'


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज