'NSGसाठी भारतापेक्षा आम्ही अधिक योग्य'
'अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षऱ्या करण्यास नकार देणाऱ्या देशांना अणु पुरवठादार देशाच्या गटात (एनएसजी) स्थान देण्याचा निर्णय झाल्यास त्यासाठी भारतापेक्षा पाकिस्तान अधिक योग्य देश आहे,' असा दावा पाकिस्ताननं केला आहे.
Maharashtra Times 13 Jun 2016, 12:19 pm
मटा ऑनलाइन वृत्त । इस्लामाबाद
'अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षऱ्या करण्यास नकार देणाऱ्या देशांना अणु पुरवठादार देशाच्या गटात (एनएसजी) स्थान देण्याचा निर्णय झाल्यास त्यासाठी भारतापेक्षा पाकिस्तान अधिक योग्य देश आहे,' असा दावा पाकिस्ताननं केला आहे.
जागतिक राजकारणात वाढत असलेला भारताचा दबदबा आणि 'एनएसजी' प्रवेशासाठी दिवसेंदिवस प्रबळ होत असलेल्या दावेदारीमुळं पाकिस्तान बिथरला आहे. भारताच्या प्रयत्नात खोडा घालण्यासाठी चीनच्या मदतीनं पाकिस्ताननंही प्रयत्न सुरू केले आहेत. भारताला एनएसजीत प्रवेश दिला गेल्यास आम्हालाही द्यावा, अशी पाकची मागणी आहे. त्या दृष्टीनं पाकनं वातावरणनिर्मितीला सुरुवात केली आहे. पाकिस्तानी परराष्ट्र धोरणाचे सल्लागार सरताज अझीज यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नुकताच या संदर्भात एक वक्तव्य केलं. 'एनएसजीसाठी भारतानं अर्ज करताच आपणही अर्ज करायचा असं आम्ही ठरवलं होतं. गेल्या तीन महिन्यापासून तो अर्ज आम्ही तयार ठेवला आहे,' असं अझीज म्हणाले.
'१९७४ साली अणुबॉम्बची चाचणी घेऊन भारतानं आण्विक इंधनाचा गैरवापर केला होता. त्यातूनच अणु पुरवठादार देशांच्या गटाची स्थापना करावी लागली होती. शिवाय, त्यानंतर भारतातून आण्विक इंधनाची चोरीही झाली होती,' असा आरोपही अझीज यांनी केला. पाकिस्तानच्या बाबतीत असं कधीही घडलं नाही. अण्वस्त्रांच्या बाबतीत पाकिस्तान किती जबाबदार देश आहे हे संपूर्ण जग जाणून आहे. त्यामुळं भारताशी तुलना करता एनएसजीसाठी आमचा दावा अधिक मजबूत आहे,' असं ते म्हणाले.
'अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षऱ्या करण्यास नकार देणाऱ्या देशांना अणु पुरवठादार देशाच्या गटात (एनएसजी) स्थान देण्याचा निर्णय झाल्यास त्यासाठी भारतापेक्षा पाकिस्तान अधिक योग्य देश आहे,' असा दावा पाकिस्ताननं केला आहे.
जागतिक राजकारणात वाढत असलेला भारताचा दबदबा आणि 'एनएसजी' प्रवेशासाठी दिवसेंदिवस प्रबळ होत असलेल्या दावेदारीमुळं पाकिस्तान बिथरला आहे. भारताच्या प्रयत्नात खोडा घालण्यासाठी चीनच्या मदतीनं पाकिस्ताननंही प्रयत्न सुरू केले आहेत. भारताला एनएसजीत प्रवेश दिला गेल्यास आम्हालाही द्यावा, अशी पाकची मागणी आहे. त्या दृष्टीनं पाकनं वातावरणनिर्मितीला सुरुवात केली आहे. पाकिस्तानी परराष्ट्र धोरणाचे सल्लागार सरताज अझीज यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नुकताच या संदर्भात एक वक्तव्य केलं. 'एनएसजीसाठी भारतानं अर्ज करताच आपणही अर्ज करायचा असं आम्ही ठरवलं होतं. गेल्या तीन महिन्यापासून तो अर्ज आम्ही तयार ठेवला आहे,' असं अझीज म्हणाले.
'१९७४ साली अणुबॉम्बची चाचणी घेऊन भारतानं आण्विक इंधनाचा गैरवापर केला होता. त्यातूनच अणु पुरवठादार देशांच्या गटाची स्थापना करावी लागली होती. शिवाय, त्यानंतर भारतातून आण्विक इंधनाची चोरीही झाली होती,' असा आरोपही अझीज यांनी केला. पाकिस्तानच्या बाबतीत असं कधीही घडलं नाही. अण्वस्त्रांच्या बाबतीत पाकिस्तान किती जबाबदार देश आहे हे संपूर्ण जग जाणून आहे. त्यामुळं भारताशी तुलना करता एनएसजीसाठी आमचा दावा अधिक मजबूत आहे,' असं ते म्हणाले.