वॉशिंग्टन:
संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या गटांविरोधात फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) सुचविलेल्या उपाययोजना पाकिस्तानने अजूनही अमलात आणलेल्या नाहीत, असा आरोप अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. दहशतवादी संघटना उभारणे आणि त्यांना आर्थिक रसद बंद करण्याबाबतच्या या उपाययोजना आहेत.
'एफएटीएफ'ने पाकिस्तानला दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडण्यात अपयशी ठरल्याबद्दल दोनच दिवसांपूर्वी 'ग्रे लिस्ट'मध्ये समाविष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्याने केलेले हे विधान महत्त्वाचे आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात निश्चित केलेल्या कारवाईचा २६ कलमी कृतीआराखडा सादर केल्यानंतरही अमेरिकेने हे विधान करणे याला महत्त्व आहे.
'एफएटीएफने दहशतवाद्यांविरोधात सुचविलेले उपाय प्रलंबित ठेवण्याची पाकिस्तानची यादी मोठी आहे. दहशतवादी संघटना उभारण्यास आणि त्यांच्यासाठी पैसा गोळा करण्यास प्रतिबंध करण्यासह बरेच उपाय पाकला करावे लागणार आहेत,' असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. एफएटीएफ ही जगभरातील देशांनी एकत्रित येऊन स्थापन केलेली संस्था असून, ती मनी लाँडरिंग, दहशतवाद्यांना पैशाचा पुरवठा आदींना प्रतिबंध करण्यासाठी काम करते. पाकिस्तानने सादर केलेल्या दहशतवादविरोधी उपायांच्या कृती आराखड्याबाबत समाधान व्यक्त करून परराष्ट्र मंत्रालयाचा प्रवक्ता म्हणाला, 'पाकिस्तानने त्यांच्या दहशतवादविरोधी उपाययोजनांतील त्रुटींसंदर्भात एफएटीएफबरोर काम करण्याची तयारी दाखविली, हे स्वागतार्हच आहे. त्यासाठ आम्ही त्यांना प्रोत्साहनच देतो. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या ठराव क्र. १२६७ अन्वये दहशतवादी घोषित करण्यात आलेल्या संघटनांना पायबंद घातला पाहिजे.' पुढील वर्षी जानेवारीपासून पाकिस्तान दहशतवादविरोधी कायदा आणि संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या संघटना व व्यक्ती यांची सुधारित यादी जाहीर करणार आहे.
भारताकडून स्वागत
नवी दिल्ली : पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट करण्याच्या फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) निर्णयाचे भारताने स्वागत केले आहे. आपल्या भूमीवरून दहशतवाद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पाकिस्तान आता तरी विश्वासार्ह पावले उचलेल, अशी आशा भारताने व्यक्त केली आहे. 'एफएटीएफच्या कृती आराखड्याची पाकिस्तान कालबद्ध रीतीने अंमलबजावणी करेल आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विश्वासार्ह पावले उचलेल, अशी आशा आम्ही करतो,' असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त रवीश कुमार यांनी म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या गटांविरोधात फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) सुचविलेल्या उपाययोजना पाकिस्तानने अजूनही अमलात आणलेल्या नाहीत, असा आरोप अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. दहशतवादी संघटना उभारणे आणि त्यांना आर्थिक रसद बंद करण्याबाबतच्या या उपाययोजना आहेत.
'एफएटीएफ'ने पाकिस्तानला दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडण्यात अपयशी ठरल्याबद्दल दोनच दिवसांपूर्वी 'ग्रे लिस्ट'मध्ये समाविष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्याने केलेले हे विधान महत्त्वाचे आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात निश्चित केलेल्या कारवाईचा २६ कलमी कृतीआराखडा सादर केल्यानंतरही अमेरिकेने हे विधान करणे याला महत्त्व आहे.
'एफएटीएफने दहशतवाद्यांविरोधात सुचविलेले उपाय प्रलंबित ठेवण्याची पाकिस्तानची यादी मोठी आहे. दहशतवादी संघटना उभारण्यास आणि त्यांच्यासाठी पैसा गोळा करण्यास प्रतिबंध करण्यासह बरेच उपाय पाकला करावे लागणार आहेत,' असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. एफएटीएफ ही जगभरातील देशांनी एकत्रित येऊन स्थापन केलेली संस्था असून, ती मनी लाँडरिंग, दहशतवाद्यांना पैशाचा पुरवठा आदींना प्रतिबंध करण्यासाठी काम करते. पाकिस्तानने सादर केलेल्या दहशतवादविरोधी उपायांच्या कृती आराखड्याबाबत समाधान व्यक्त करून परराष्ट्र मंत्रालयाचा प्रवक्ता म्हणाला, 'पाकिस्तानने त्यांच्या दहशतवादविरोधी उपाययोजनांतील त्रुटींसंदर्भात एफएटीएफबरोर काम करण्याची तयारी दाखविली, हे स्वागतार्हच आहे. त्यासाठ आम्ही त्यांना प्रोत्साहनच देतो. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या ठराव क्र. १२६७ अन्वये दहशतवादी घोषित करण्यात आलेल्या संघटनांना पायबंद घातला पाहिजे.' पुढील वर्षी जानेवारीपासून पाकिस्तान दहशतवादविरोधी कायदा आणि संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या संघटना व व्यक्ती यांची सुधारित यादी जाहीर करणार आहे.
भारताकडून स्वागत
नवी दिल्ली : पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट करण्याच्या फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) निर्णयाचे भारताने स्वागत केले आहे. आपल्या भूमीवरून दहशतवाद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पाकिस्तान आता तरी विश्वासार्ह पावले उचलेल, अशी आशा भारताने व्यक्त केली आहे. 'एफएटीएफच्या कृती आराखड्याची पाकिस्तान कालबद्ध रीतीने अंमलबजावणी करेल आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विश्वासार्ह पावले उचलेल, अशी आशा आम्ही करतो,' असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त रवीश कुमार यांनी म्हटले आहे.