ढाका : बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांच्या पक्षाने मोठा विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून हसीना चौथ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान होतील, हे आता निश्चित झाल्याचे वृत्त स्थानिक टीव्हीने दिले आहे.
३०० सदस्यसंख्या असलेल्या बांगलादेशच्या संसदेत बहुमताचा १५१ हा जादुई आकडा हसीना यांचा अवामी लीग पक्ष सहजपणे पार करेल, असे सध्याचे चित्र असल्याचे चॅनेलने म्हटले आहे. दरम्यान, मतदानावेळी दिवसभरात विविध ठिकाणी सत्ताधारी अवामी लीग व प्रमुख विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उसळलेल्या हिंसाचारात १७ जणांचा मृत्यू झाला.
मतमोजणी सुरू झालेल्या बहुतांश जागांवर शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. काही जागांवर अवामी लीगच्या उमेदवारांनी १० हजारांहून अधिक मताधिक्य घेतलं आहे. यावर खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाने जोरदार आक्षेप घेतला आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडल्याचा आरोप करत विरोधी आघाडीच्या चाळीसहून अधिक उमेदवारांनी बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी अवामी लीगनेही निवडणुकीत गैरप्रकार घडल्याचा आरोप केला असून या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
दरम्यान, संसदेच्या ३०० पैकी २९९ जागांसाठी आज सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान पार पडले असून २४ तासांत सर्व निकाल हाती येणार आहेत.
३०० सदस्यसंख्या असलेल्या बांगलादेशच्या संसदेत बहुमताचा १५१ हा जादुई आकडा हसीना यांचा अवामी लीग पक्ष सहजपणे पार करेल, असे सध्याचे चित्र असल्याचे चॅनेलने म्हटले आहे. दरम्यान, मतदानावेळी दिवसभरात विविध ठिकाणी सत्ताधारी अवामी लीग व प्रमुख विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उसळलेल्या हिंसाचारात १७ जणांचा मृत्यू झाला.
मतमोजणी सुरू झालेल्या बहुतांश जागांवर शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. काही जागांवर अवामी लीगच्या उमेदवारांनी १० हजारांहून अधिक मताधिक्य घेतलं आहे. यावर खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाने जोरदार आक्षेप घेतला आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडल्याचा आरोप करत विरोधी आघाडीच्या चाळीसहून अधिक उमेदवारांनी बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी अवामी लीगनेही निवडणुकीत गैरप्रकार घडल्याचा आरोप केला असून या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
दरम्यान, संसदेच्या ३०० पैकी २९९ जागांसाठी आज सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान पार पडले असून २४ तासांत सर्व निकाल हाती येणार आहेत.