अ‍ॅपशहर

Nepal Crisis नेपाळमध्ये राजकीय पेच कायम; ओलींना 'प्रचंड' धक्का बसणार?

नेपाळमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षातील मतभेद पुन्हा एकदा तीव्र झाले आहेत. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांच्यात मतभेद कायम आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Nov 2020, 12:33 pm
काठमांडू: भारताच्या भूभागावर दावा ठोकल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्यासमोरील राजकीय अडचणी अद्यापही संपुष्टात आल्या नाहीत. भारताविरोधात निर्णय घेतल्यानंतर सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षात सुरू झालेला वाद अद्यापही शमला नाही. सत्तारूढ नेपाळ कम्युनिस्ट पक्षाची बैठक कोणत्याही निर्णयाविना बुधवारी संपली. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी स्वतंत्र राजकीय भूमिका सादर करण्यासाठी १० दिवसांची मुदत मागितल्याने बैठकीत कोणताच निर्णय होऊ शकला नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Nepal Crisis
नेपाळमध्ये राजकीय पेच कायम; ओलींना 'प्रचंड' धक्का बसणार?



ओली हे पक्षाशी सल्लामसलत न करता सरकार चालवित असल्याचा आरोप त्यांचे विरोधक पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी केला आहे. त्याला उत्तर देताना ओली यांनी १० दिवसांची मुदत मागितली, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते नारायणकाजी श्रेष्ठ यांनी दिली. त्यामुळे पुढील बैठक २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

वाचा: भारताने आमचा भूभाग बळकावला; चीनमध्ये नेपाळचे फुत्कार

वाचा: नेपाळची आगळीक; डेहराडून, नैनितालसह काही शहरांवर ठोकला दावा!


नेपाळ कम्युनिस्ट पक्षाला संसदेत दोन तृतीयांश बहुमत असून मतभेदांमुळे पक्षात फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बैठक सुरू होताच प्रचंड यांनी १९ पानी राजकीय अहवाल सादर केला. ओली हे पक्षाशी सल्लामसलत न करता सरकार चालवित नसल्याचा आणि पक्षाच्या भूमिकेशी बांधिल नसल्याचा आरोप प्रचंड यांनी या अहवालात केला आहे. प्रचंड यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे पक्षात फूट पडणार असल्याचे ओली यांनी ३१ ऑक्टोबर रोजी सूचित केले होते. पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक बोलविण्याची प्रचंड यांची मागणीही त्यांनी फेटाळली होती.

वाचा; भारतात बहुसंख्य हिंदू आहेत म्हणून संबंध चांगले होणार नाहीत: नेपाळ

वाचा: बायडन यांचे भारत-अमेरिका संबंधात सुरक्षेच्या मुद्याला प्राधान्य!
वाचा: देशाच्या राजकारणात चीनची लुडबुड; नेपाळने 'असा' लावला चाप

ओली यांनी भारताच्या 'रॉ' या गुप्तचर खात्याचे प्रमुख सामंतकुमार गोयल यांच्याशी केलेल्या सल्लामसलतीची माहिती पक्षाच्या मुख्यालयाला दिली नाही,असा आरोपही प्रचंड यांनी आपल्या अहवालात केला आहे. हा अहवाल फेटाळतानाच तो मागे घेण्याची सूचना ओली यांनी केली होती. गोयल आणि ओली यांच्यात २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या चर्चेनंतर प्रचंड आणि ओली यांच्यातील मतभेद तीव्र झाले आहेत. या बैठकीद्वारे ओली यांनी राजनैतिक नियमांचा भंग केल्याचा आरोप पक्षाच्या अनेक नेत्यांनी केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज