कोलंबो : श्रीलंकेमध्ये आज (१६ नोव्हेंबर) अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. आज श्रीलंकेचा आठवा राष्ट्राध्यक्ष निवडला जाईल. १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून तीन रक्तरंजित नागरी युद्धे आणि त्सुनामीसह इतर नैसर्गिक आपत्तींना या देशाने तोंड दिले आहे. सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक आघाड्यांवर आजही देशापुढे आव्हाने आहेत. येत्या काळात ती पूर्ण करण्याचे प्रयत्न लोकप्रतिनिधींना करावे लागणार आहेत.
कोण होणार अध्यक्ष?
- अध्यक्षपदासाठी ३५ उमेदवार रिंगणात असले, तरी प्रमुख लढत सिंहलीज-बुद्धिस्ट नॅशनलिस्ट पार्टीचे (एसएसएलपी) गोताबाय राजपक्षे आणि सत्ताधारी युनायटेड नॅशनल पार्टीचे (यूएनपी) सजिथ प्रेमदास यांच्यामध्ये आहे.
- राजपक्षे आणि प्रेमदास हे दोघेही भक्कम राजकीय कुटुंबांमधून आहेत. मात्र, दोघांचेही राजकारण आणि व्यक्तिमत्त्वे भिन्न आहेत. अनेक दशकांपासून श्रीलंकेच्या राजकारणात प्रबळ ठरलेल्या सात भावंडांपैकी राजपक्षे हे एक आहेत. त्यांचे बंधू महिंदा राजपक्षे हे १० वर्षे अध्यक्ष होते. त्यांच्या कारकिर्दीत गोताबाय राजपक्षे यांच्यावर संरक्षण खात्याची धुरा होती.
- सजिथ प्रेमदास हे रणसिंघे प्रेमदास यांचे पुत्र. रणसिंघे प्रेमदास यांनी पंतप्रधानपद भूषविले आहे, त्यानंतर १९८९ पासून १९९३ पर्यंत ते राष्ट्राध्यक्ष होते. तमिळ फुटिरतावाद्यांनी १९९३ मध्ये त्यांची हत्या केली. वंचित जातींमधील पहिले राजकीय नेते म्हणून ते ओळखले जातात. त्यांचा वारसा सजिथ यांनी सक्षमपणे पुढे नेला असून, राजकीय प्रस्थांऐवजी 'जनतेचा माणूस' म्हणून आपली प्रतिमा त्यांनी तयार केली आहे.
कोणाचे पारडे जड?
- अध्यक्षपदासाठी राजपक्षे यांचे नाव आघाडीवर घेतले जाते. मात्र, अमेरिकेचे नागरिकत्व न सोडणे आणि गैरव्यवहारांचे, भ्रष्टाचारांचे आरोप यांमुळे प्रचारात ते काहीसे बॅकफूटवर गेले आहेत. मात्र, तरीही जाणकार त्यांच्या नावाला पसंती देत आहेत.
- अल्पसंख्य तमिळ आणि मुस्लिम समाजाकडून प्रेमदास यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. भ्रष्टाचार, गैरव्यवहारांच्या आरोपांपासून दूर असलेल्या मोजक्या नेत्यांपैकी ते आहेत.
- देशातील ७५ टक्के लोकसंख्या सिंहली, बौद्ध आहेत. त्यांच्यासोबतच अल्पसंख्यांकांची मते मिळवणे राजपक्षे यांना जिंकण्यासाठी गरजेचे आहे.
- ईस्टर संडेला झालेले हल्ल्यांमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सत्ताधारी 'यूएनपी' सरकारच्या विरोधात जाणारी ही बाब आहे.
ही आहेत आव्हाने
- १९५६ मध्ये सिंहली भाषेला श्रीलंकेच्या एकमेव अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला. तेव्हापासून तमिळ समाजामध्ये भेदभाव केल्याची भावना रुजली. त्यांनी निदर्शनेही केली. या धार्मिक तेढीचे रूपांतर स्वातंत्र्योत्तर पहिल्याच वांशिक दंगलींमध्ये झाले. १९५८ मध्येही दंगली घडल्या. १९७२ मध्ये देशाला प्रजासत्ताक घोषित करून नवी राज्यघटना निर्माण केली. त्यातही आपले हित आणि कल्याण डावलल्याचे तमिळ समाजाचे म्हणणे आहे. सिंहली (बौद्ध) लोकसंख्या सुमारे ७५ टक्के आहे, तर तमिळ आणि मुस्लिम अल्पसंख्याक आहेत. आतापर्यंत सामाजिक एकसंधता साधण्यात नेते कमी पडल्याचे दिसते. सर्वसमावेशक प्रगतीचे उद्दिष्ट ठेवण्याची राजकीय पक्षांकडून अपेक्षा आहे.
- एप्रिल २०१९ मध्ये ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधून देश अद्याप सावरलेला नाही. या प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी सुरक्षितता मजबूत करण्याची गरज.
- गेल्या सुमारे १८ महिन्यांपासून राजकीय देशात अस्थिरता.
- नागरी युद्धांदरम्यान मानवी हक्कांचे मोठ्या प्रमाणावर कथित उल्लंघन झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीलंकेची मोठी नाचक्की झाली. ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी आणि मानवी हक्कांचा संयुक्त राष्ट्रांचा अजेंडा राबविण्यासाठी श्रीलंकेला प्रयत्न करावे लागणार आहेत.
कोण होणार अध्यक्ष?
- अध्यक्षपदासाठी ३५ उमेदवार रिंगणात असले, तरी प्रमुख लढत सिंहलीज-बुद्धिस्ट नॅशनलिस्ट पार्टीचे (एसएसएलपी) गोताबाय राजपक्षे आणि सत्ताधारी युनायटेड नॅशनल पार्टीचे (यूएनपी) सजिथ प्रेमदास यांच्यामध्ये आहे.
- राजपक्षे आणि प्रेमदास हे दोघेही भक्कम राजकीय कुटुंबांमधून आहेत. मात्र, दोघांचेही राजकारण आणि व्यक्तिमत्त्वे भिन्न आहेत. अनेक दशकांपासून श्रीलंकेच्या राजकारणात प्रबळ ठरलेल्या सात भावंडांपैकी राजपक्षे हे एक आहेत. त्यांचे बंधू महिंदा राजपक्षे हे १० वर्षे अध्यक्ष होते. त्यांच्या कारकिर्दीत गोताबाय राजपक्षे यांच्यावर संरक्षण खात्याची धुरा होती.
- सजिथ प्रेमदास हे रणसिंघे प्रेमदास यांचे पुत्र. रणसिंघे प्रेमदास यांनी पंतप्रधानपद भूषविले आहे, त्यानंतर १९८९ पासून १९९३ पर्यंत ते राष्ट्राध्यक्ष होते. तमिळ फुटिरतावाद्यांनी १९९३ मध्ये त्यांची हत्या केली. वंचित जातींमधील पहिले राजकीय नेते म्हणून ते ओळखले जातात. त्यांचा वारसा सजिथ यांनी सक्षमपणे पुढे नेला असून, राजकीय प्रस्थांऐवजी 'जनतेचा माणूस' म्हणून आपली प्रतिमा त्यांनी तयार केली आहे.
कोणाचे पारडे जड?
- अध्यक्षपदासाठी राजपक्षे यांचे नाव आघाडीवर घेतले जाते. मात्र, अमेरिकेचे नागरिकत्व न सोडणे आणि गैरव्यवहारांचे, भ्रष्टाचारांचे आरोप यांमुळे प्रचारात ते काहीसे बॅकफूटवर गेले आहेत. मात्र, तरीही जाणकार त्यांच्या नावाला पसंती देत आहेत.
- अल्पसंख्य तमिळ आणि मुस्लिम समाजाकडून प्रेमदास यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. भ्रष्टाचार, गैरव्यवहारांच्या आरोपांपासून दूर असलेल्या मोजक्या नेत्यांपैकी ते आहेत.
- देशातील ७५ टक्के लोकसंख्या सिंहली, बौद्ध आहेत. त्यांच्यासोबतच अल्पसंख्यांकांची मते मिळवणे राजपक्षे यांना जिंकण्यासाठी गरजेचे आहे.
- ईस्टर संडेला झालेले हल्ल्यांमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सत्ताधारी 'यूएनपी' सरकारच्या विरोधात जाणारी ही बाब आहे.
ही आहेत आव्हाने
- १९५६ मध्ये सिंहली भाषेला श्रीलंकेच्या एकमेव अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला. तेव्हापासून तमिळ समाजामध्ये भेदभाव केल्याची भावना रुजली. त्यांनी निदर्शनेही केली. या धार्मिक तेढीचे रूपांतर स्वातंत्र्योत्तर पहिल्याच वांशिक दंगलींमध्ये झाले. १९५८ मध्येही दंगली घडल्या. १९७२ मध्ये देशाला प्रजासत्ताक घोषित करून नवी राज्यघटना निर्माण केली. त्यातही आपले हित आणि कल्याण डावलल्याचे तमिळ समाजाचे म्हणणे आहे. सिंहली (बौद्ध) लोकसंख्या सुमारे ७५ टक्के आहे, तर तमिळ आणि मुस्लिम अल्पसंख्याक आहेत. आतापर्यंत सामाजिक एकसंधता साधण्यात नेते कमी पडल्याचे दिसते. सर्वसमावेशक प्रगतीचे उद्दिष्ट ठेवण्याची राजकीय पक्षांकडून अपेक्षा आहे.
- एप्रिल २०१९ मध्ये ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधून देश अद्याप सावरलेला नाही. या प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी सुरक्षितता मजबूत करण्याची गरज.
- गेल्या सुमारे १८ महिन्यांपासून राजकीय देशात अस्थिरता.
- नागरी युद्धांदरम्यान मानवी हक्कांचे मोठ्या प्रमाणावर कथित उल्लंघन झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीलंकेची मोठी नाचक्की झाली. ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी आणि मानवी हक्कांचा संयुक्त राष्ट्रांचा अजेंडा राबविण्यासाठी श्रीलंकेला प्रयत्न करावे लागणार आहेत.