अ‍ॅपशहर

पाकमध्ये 'आझादी मार्च'; इम्रान खान यांना राजीनाम्यासाठी अल्टिमेटम

बेरोजगारी, गरीबी आणि महागाईने पाकिस्तानात हाहाकार माजवल्याने संतप्त पाकिस्तानी नागरिकांनी त्याचा रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या निषेधार्थ पाकिस्तानात 'आझादी मार्च'चं आयोजन करण्यात आलं असून या मार्चमध्ये लाखो लोक सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Nov 2019, 11:03 pm
इस्लामाबाद: बेरोजगारी, गरीबी आणि महागाईने पाकिस्तानात हाहाकार माजवल्याने संतप्त पाकिस्तानी नागरिकांनी त्याचा रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या निषेधार्थ पाकिस्तानात 'आझादी मार्च'चं आयोजन करण्यात आलं असून या मार्चमध्ये लाखो लोक सहभागी झाले आहेत. जमियत उल इस्लाम पाकिस्तानचे प्रमुख फजलुर्रहमान यांच्या नेतृत्वाखाली या मार्च काढण्यात आला असून त्यांनी इम्रान यांना राजीनामा देण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानात सत्तापालट होण्याची चिन्हे वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pak


इम्रान खान यांनी सत्तेची सूत्रे हाती घेऊन अवघे १४ महिने होत नाही तोच विरोधी पक्षाच्या मदतीने पाकिस्तानातील जनता जमियत उल इस्लाम पाकिस्तान या धार्मिक संघटनेच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरली आहे. इम्रान खान हटावा नारा देत २७ ऑक्टोबर रोजी सुरू झालेला हा मार्च इस्लामाबादमध्ये धडकला आहे.

इस्लामाबाद येथील मेट्रो ग्राऊंडवर या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. या सभेला पाकिस्तानातील प्रमुख विरोधी पक्षाचे नेतही उपस्थित होते. राष्ट्रीय प्रतिष्ठानांशी आमचा वाद नाही, पण आम्हाला त्याचं स्थायित्व हवं आहे. सत्ताधाऱ्यांचा या राष्ट्रीय प्रतिष्ठानांना पाठिंबा आहे की नाही हे आम्हाला कळू द्या, असं मौलाना फजलुर्रहमान यांनी आवाहन केलं. पंतप्रधान इम्रान खान यांनी राजीनामा द्यावा. त्यांना घरी जाऊन अटक करू एवढी ताकद या विशाल जनसमुदायात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हा मोर्चा कोण्या एका पक्षाचा नाही. तर देशानं काढलेला हा मोर्चा आहे. झालेल्या निवडणुका हा एक फ्रॉड होता आणि पाकिस्तानी जनता या निवडणुकांना बळी पडलीय. या सरकारला आम्ही बरीच मुदत दिलीय. आता त्यांना मुदत देणं शक्य नाही. या इम्रान यांना सत्तेतून जावंच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

आश्वासनं पाळली नाही

पन्नास लाख घरं बनविण्याऐवजी पन्नास लाख घरं या सरकारने पाडली आहेत. एक कोटी नोकऱ्या देण्याऐवजी पंचवीस लाख लोकांना बेरोजगार केलं. त्यामुळे येथील जनतेला पात्रता नसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या मेहरबानीवर सोडता येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज