अ‍ॅपशहर

'त्या पत्रकारांना झालेली शिक्षा योग्यच'

म्यानमारमधील दोन पत्रकारांना झालेली शिक्षा योग्यच असल्याचं म्यानमारच्या नेत्या आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेता आंग सान सू ची यांनी म्हटलं आहे. रखाइन प्रांतात झालेल्या एका नरसंहाराच्या चौकशीप्रकरणी रॉयटरच्या दोन पत्रकारांना शिक्षा झाली आहे. 'ते पत्रकार होते म्हणून नव्हे तर त्यांनी कायदा मोडला म्हणून त्यांना शिक्षा झाली आहे,' असं त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Sep 2018, 3:52 pm
हनोई :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Aung-San-Suu-Kyi


म्यानमारमधील दोन पत्रकारांना झालेली शिक्षा योग्यच असल्याचं म्यानमारच्या नेत्या आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेता आंग सान सू ची यांनी म्हटलं आहे. रखाइन प्रांतात झालेल्या एका नरसंहाराच्या चौकशीप्रकरणी रॉयटरच्या दोन पत्रकारांना शिक्षा झाली आहे. 'ते पत्रकार होते म्हणून नव्हे तर त्यांनी कायदा मोडला म्हणून त्यांना शिक्षा झाली आहे,' असं त्या म्हणाल्या.

वा लोन (३२) आणि क्यॉ सोइ ओ (२८) अशी या पत्रकारांची नावे आहेत. मागील आठवड्यात या दोघांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रखाइनमध्ये रोहिंग्या समाजावरील सैन्याच्या कारवाईचं वृत्तांकरन करताना त्यांनी म्यानमार सरकारच्या गोपनीयतेच्या नियमांचा भंग केला असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यांना झालेल्या शिक्षेनंतर, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर असलेला हल्ला आहे, असं म्हणत जगभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

मानवाधिकार कार्यकर्त्या म्हणून या मुद्द्यावर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने आँग सान सू ची यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. अखेर व्हिएतनाममध्ये होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेवरील चर्चेदरम्यान त्यांनी मौन सोडले आणि या पत्रकारांना देण्यात आलेल्या शिक्षेच्या निर्णयाचे समर्थन केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज