अ‍ॅपशहर

युनोच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य: भारताला 'या' देशाचा पाठिंबा

भारत आणि चीनमध्ये तणाव सुरू असताना भारताला संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीत कायम सदस्यत्व मिळावे यासाठी रशियाने समर्थन केले आहे. याआधी देखील रशियाने भारताला पाठिंबा व्यक्त केला होता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jun 2020, 5:45 pm
मॉस्को: भारत-चीनमध्ये तणाव असताना भारताला संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीत कायम सदस्यत्व मिळावे यासाठी रशियाने आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीतील स्थायी देशांची संख्या वाढवण्यात येण्याची चर्चा सुरू आहे. अशावेळेस रशियाने पुन्हा एकदा भारताला पाठिंबा व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम सुरक्षा समिती स्थायी सदस्यत्व: भारताला या देशाचा पाठिंबा


रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लवारोव यांनी भारताच्या उमेदवारी पाठिंबा दर्शवला आहे. भारत, रशिया आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरसद्नारे बैठक पार पडली. त्यानंतर परराष्ट्र मंत्री सर्गेई लवारोव यांनी माहिती दिली. या बैठकीत संयुक्त राष्ट्र संघात संभाव्य बदलाबाबतही चर्चा झाली. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीत स्थायी सदस्य म्हणून भारत एक प्रमुख दावेदार आहे. त्यामुळे आम्ही भारताच्या उमेदवारी समर्थन करत असल्याचे त्यांनी सांगितले. भारत पूर्ण सदस्य बनू शकतो, अशी माहितीही त्यांनी दिली. भारत-चीन तणावावरही त्यांनी भाष्य केले. भारत आणि चीनमध्ये शांततापूर्ण संबंध निर्माण होतील. भारत आणि चीन हे दोन्ही देश परस्परातील वाद सोडवण्यास सक्षम आहेत. त्यांना मध्यस्थांची आवश्यकता नसून त्यांना कोणत्याही मदतीची आवश्यकता नाही, असेही त्यांनी सांगितले.

वाचा: युनोच्या सुरक्षा परिषदेत भारताचा डंका; १८४ देशांचा पाठिंबा

वाचा: भारत-चीनमधील वाद; रशियाने घेतली 'ही' भूमिका!
संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थायी सदस्यत्वसाठी ऑस्ट्रेलियानेदेखील भारताला पाठिंबा दिला आहे. मागील आठवड्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले होते. सुरक्षा समितीत चीन, फ्रान्स, रशिया, ग्रेट ब्रिटन आणि अमेरिका हे देश कायम सदस्य आहेत. तर, १० अस्थायी सदस्यांची निवडणुकीच्या माध्यमातून दोन वर्षांनी निवड करण्यात येते.

वाचा: लडाख तणाव: भारतीय जवानांवर हल्ला पूर्वनियोजित; प्रतिकाराने चीन बिथरला!

दरम्यान, मागील आठवड्यात भारताची आठव्यांदा सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली. निवडणुकीत भारताला १९२ पैकी १८४ देशांचा पाठिंबा मिळाला. 'एशिया पॅसिफिक' जागेसाठी भारत हा एकमेव दावेदार असल्याने ही जागा भारताला मिळण्याचे निश्चत मानले जात होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर १९३ सदस्यांच्या महासभेने पूर्ण बैठकीऐवजी गुप्तमतदान प्रक्रियेद्वारे निवडणूक घेण्यासंबंधी निर्णय याआधीच घेतला होता. या निर्णयानुसार सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांची निवड, तसेच आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या सदस्यांची निवड पूर्ण बैठकीशिवाय करण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी सांगितले की, भारत एका चांगल्या बहुपक्षीय व्यवस्थेला दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहे. गुप्त मतदानात भारताला १९२ पैकी १८४ मते मिळाली. भारताला इतर देशांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांनी आभार व्यक्त केले. एका महत्त्वाच्या काळात भारताला सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्यत्व मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज