वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
रोजच्या जेवणात पालेभाज्यांच्या समावेश असावा, असे अन्नशास्त्रमध्ये कायम सांगितले जाते. मात्र बदलती जीवनशैली आणि जेवणाच्या सवयींमुळे ताटातल्या पालेभाज्यांची जागा कमी कमी होते आहे. पण आता हिरव्या भाज्यांच्या फायद्यांबाबत अलीकडेच करण्यात आलेल्या संशोधनानंतर तुम्ही परत एकदा रोजच्या जेवणात पालेभाजीला नक्कीच स्थान द्याल.
अमेरिकेतल्या रुश विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार रोजच्या जेवणात एक मोठी वाटी हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने मेंदू ११ वर्षांनी तरुण राहू शकतो. तसेच रोज हिरव्या भाज्या खाणाऱ्या लोकांचा मेंदू अधिक तल्लख आणि विचार क्षमताही वेगवान असते.
‘रोजच्या जेवणात हिरव्या भाज्यांच्या समावेश करणे मेंदू तजेलदार ठेवण्याचा सर्वांत सोपा मार्ग आहे. वयाबरोबर स्मृतिभ्रंश होण्याचे प्रमाणही गेल्या काही वर्षांमध्ये वागाने वाढते आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी काही ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे,’ असे रुश विद्यापीठातील शास्त्रज्ञ मोर्था क्लेर मोरिस यांनी सांगितले.
या संशोधनामध्ये सुमारे ८१ वर्षांच्या स्मृतिभ्रंशाचा त्रास नसलेल्या ९६० जणांना समाविष्ट करून घेण्यात आले होते. संशोधनादरम्यान सर्व सहभागींना एक प्रश्नावली देण्यात आली. त्यामध्ये त्यांच्या रोजच्या जेवणाबाबत, त्यातील हिरव्या भाज्यांच्या समावेशाबाबत प्रश्न विचारण्यात आले. सहभागींचे पाच समूह करून त्यांच्या दहा वर्षांतील जेवणाच्या सवयींचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.
या भाज्या खाच!
प्रत्येक पालेभाजीचे स्वतःचे काही गुणधर्म आहेत. मात्र पालक, लेट्यूस आणि कोबीमधील जीनवसत्वे प्रत्येक वयोगटासाठी आवश्यक आहे.
रोजच्या जेवणात पालेभाज्यांच्या समावेश असावा, असे अन्नशास्त्रमध्ये कायम सांगितले जाते. मात्र बदलती जीवनशैली आणि जेवणाच्या सवयींमुळे ताटातल्या पालेभाज्यांची जागा कमी कमी होते आहे. पण आता हिरव्या भाज्यांच्या फायद्यांबाबत अलीकडेच करण्यात आलेल्या संशोधनानंतर तुम्ही परत एकदा रोजच्या जेवणात पालेभाजीला नक्कीच स्थान द्याल.
अमेरिकेतल्या रुश विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार रोजच्या जेवणात एक मोठी वाटी हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने मेंदू ११ वर्षांनी तरुण राहू शकतो. तसेच रोज हिरव्या भाज्या खाणाऱ्या लोकांचा मेंदू अधिक तल्लख आणि विचार क्षमताही वेगवान असते.
‘रोजच्या जेवणात हिरव्या भाज्यांच्या समावेश करणे मेंदू तजेलदार ठेवण्याचा सर्वांत सोपा मार्ग आहे. वयाबरोबर स्मृतिभ्रंश होण्याचे प्रमाणही गेल्या काही वर्षांमध्ये वागाने वाढते आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी काही ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे,’ असे रुश विद्यापीठातील शास्त्रज्ञ मोर्था क्लेर मोरिस यांनी सांगितले.
या संशोधनामध्ये सुमारे ८१ वर्षांच्या स्मृतिभ्रंशाचा त्रास नसलेल्या ९६० जणांना समाविष्ट करून घेण्यात आले होते. संशोधनादरम्यान सर्व सहभागींना एक प्रश्नावली देण्यात आली. त्यामध्ये त्यांच्या रोजच्या जेवणाबाबत, त्यातील हिरव्या भाज्यांच्या समावेशाबाबत प्रश्न विचारण्यात आले. सहभागींचे पाच समूह करून त्यांच्या दहा वर्षांतील जेवणाच्या सवयींचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.
या भाज्या खाच!
प्रत्येक पालेभाजीचे स्वतःचे काही गुणधर्म आहेत. मात्र पालक, लेट्यूस आणि कोबीमधील जीनवसत्वे प्रत्येक वयोगटासाठी आवश्यक आहे.