अ‍ॅपशहर

पाक दहशतवाद निर्माण करणारा देश: स्वराज

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करताना पाकिस्तानला खडे बोल सुनावले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसोबत शांतीचे संबंध प्रस्थापित व्हावेत, तसेच दोन्ही देशांदरम्यान मैत्रीपूर्ण संबंध तयार व्हावेत यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. परंतु, पाकिस्तानने काय तयार केले? पाकिस्तानने दहशतवादी संघटना तयार केल्या.

Maharashtra Times 24 Sep 2017, 1:03 am
मटा ऑनलाइन वृत्त। न्यूयॉर्क
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sushma swaraj slams pakistan in united nations general assembly
पाक दहशतवाद निर्माण करणारा देश: स्वराज


परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करताना पाकिस्तानला खडे बोल सुनावले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसोबत शांतीचे संबंध प्रस्थापित व्हावेत, तसेच दोन्ही देशांदरम्यान मैत्रीपूर्ण संबंध तयार व्हावेत यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. परंतु, पाकिस्तानने काय तयार केले? पाकिस्तानने दहशतवादी संघटना तयार केल्या. निरपराध माणसांचे रक्त सांडवणारा पाकिस्तान आम्हाला मानवी हक्क काय असतात हे सांगत आहे', अशा शब्दांत सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत संबोधित करताना पाकिस्तानचे कान पिरगाळले.

जेव्हा ते बोलत होते (पाकिस्तानचे पंतप्रधान) तेव्हा ऐकणारे, 'लूक हू इज टॉकिंग', असे म्हणत होते, अशा शब्दात स्वराज यांनी पाकिस्तानची खिल्लीही उडवली. आपल्या २२ मिनिटांच्या भाषणात सुषमा स्वराज पाकिस्तानवर ६ मिनिटे बोलल्या. त्या पुढे म्हणाल्या की, पाकिस्तानने आता आपल्या देशाच्या विकासासाठी पैसा खर्च करावा.

आज संपूर्ण जगाला अनेक संकटांनी ग्रासून टाकले आहे. आज संपूर्ण जग हे दहशतवाद आणि सायबर सुरक्षेशी संबंधित धोक्याशी टक्कर देत आहे याकडेही स्वराज यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दहशतवादाचा निषेध करणे हा केवळ एक सोपस्कार झाला आहे, दहशतवाद नेमका ओळखून त्याच्याविरोधात लढणे अत्यंत गरजेचे आहे याकडेही त्यांनी उपस्थित जगभरातील प्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेऊन भ्रष्टाचारावर हल्ला केला असल्याचेही त्या म्हणाल्या. बेरोजगारी गरिबीला जन्म देते. हे लक्षात घेऊन आम्ही आपल्या योजनांच्या माध्यमातून लोकांना रोजगारासाठी सक्षम बनविण्याचे काम करत आहोत. भारत सरकारने रोजगारासाठी 'स्किल इंडिया'सारखी योजना सुरू केली असल्याचेही त्या म्हणाल्या. आम्ही गरिबीशी लढत आहोत आणि पाकिस्तान मात्र आमच्याशी लढत आहे असा टोलाही स्वराज यांनी पाकिस्तानला लगावला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज