वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थीचा मुद्दा चर्चेत नाही आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:च स्पष्ट केले आहे, असे भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्षवर्धन शृंगला यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या गेल्या महिन्यातील दौऱ्यामध्ये ट्रम्प यांनी मध्यस्थीचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर, दुसऱ्या आठवड्यामध्येही त्यांनी पुन्हा इच्छा व्यक्त केली होती. मात्र, भारताने त्याला ठाम शब्दांमध्ये नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर, हर्षवर्धन शृंगला यांनी वरील भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, 'काश्मीर मुद्द्यावर भारत व पाकिस्तान यांनी परस्पर सामंजस्यानेच तोडगा काढावा, अशी अमेरिकेची आतापर्यंतची भूमिका आहे. त्यात तटस्थतेचा मुद्दाच नाही. दोन्ही देशांना मान्य असेल, तरच मध्यस्थी करू असे ट्रम्प यांनीही म्हटले आहे. भारताने हा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे, हा मुद्दा चर्चेलाच असू शकत नाही.'
मोदींच्या सभेसाठी ४० हजारांची नोंदणी
ह्यूस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसाठी जामार असून, त्या वेळी ह्युस्टनमध्ये त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी आतापर्यंत ४० हजार भारतीय-अमेरिकन नागरिकांनी नोंदणी केली आहे. या सभेला ५० हजारांपेक्षा जास्त जण उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. फुटबॉल मैदानावर ही सभा होणार आहे.
अमेरिकन लोकप्रतिनिधीची दिलगिरी
वॉशिंग्टन : जम्मू-काश्मीरमधील घडामोडींवर चिंता व्यक्त करणारे पत्र परराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ यांना लिहिताना, भारतीय अमेरिकन नागरिकांशी चर्चा न केल्याबद्दल अमेरिकेच्या एका वरिष्ठ लोकप्रतिनिधीने दिलगिरी व्यक्त केली आहे. टॉम सुओझी असे या लोकप्रतिनिधीचे नाव असून, त्यांनी नऊ ऑगस्ट रोजी पत्र लिहिले होते. भारत सरकार काश्मीरमध्ये सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले होते.
काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थीचा मुद्दा चर्चेत नाही आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:च स्पष्ट केले आहे, असे भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्षवर्धन शृंगला यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या गेल्या महिन्यातील दौऱ्यामध्ये ट्रम्प यांनी मध्यस्थीचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर, दुसऱ्या आठवड्यामध्येही त्यांनी पुन्हा इच्छा व्यक्त केली होती. मात्र, भारताने त्याला ठाम शब्दांमध्ये नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर, हर्षवर्धन शृंगला यांनी वरील भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, 'काश्मीर मुद्द्यावर भारत व पाकिस्तान यांनी परस्पर सामंजस्यानेच तोडगा काढावा, अशी अमेरिकेची आतापर्यंतची भूमिका आहे. त्यात तटस्थतेचा मुद्दाच नाही. दोन्ही देशांना मान्य असेल, तरच मध्यस्थी करू असे ट्रम्प यांनीही म्हटले आहे. भारताने हा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे, हा मुद्दा चर्चेलाच असू शकत नाही.'
मोदींच्या सभेसाठी ४० हजारांची नोंदणी
ह्यूस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसाठी जामार असून, त्या वेळी ह्युस्टनमध्ये त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी आतापर्यंत ४० हजार भारतीय-अमेरिकन नागरिकांनी नोंदणी केली आहे. या सभेला ५० हजारांपेक्षा जास्त जण उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. फुटबॉल मैदानावर ही सभा होणार आहे.
अमेरिकन लोकप्रतिनिधीची दिलगिरी
वॉशिंग्टन : जम्मू-काश्मीरमधील घडामोडींवर चिंता व्यक्त करणारे पत्र परराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ यांना लिहिताना, भारतीय अमेरिकन नागरिकांशी चर्चा न केल्याबद्दल अमेरिकेच्या एका वरिष्ठ लोकप्रतिनिधीने दिलगिरी व्यक्त केली आहे. टॉम सुओझी असे या लोकप्रतिनिधीचे नाव असून, त्यांनी नऊ ऑगस्ट रोजी पत्र लिहिले होते. भारत सरकार काश्मीरमध्ये सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले होते.