संयुक्त राष्ट्र: भारत आणि चीनमध्ये मागील काही दिवसांमध्ये सीमा प्रश्नावरून तणाव निर्माण झाला होता. तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारत आणि चीनमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता. भारत आण चीन या दोन संबंधित देशांनी मध्यस्थ हवाय कि नको हा निर्णय घ्यायचा असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने स्पष्ट केले आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या महासचिवांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी सांगितले की, सीमा प्रश्नाबाबत मध्यस्थाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आमचा नसून त्या संबंधित दोन देशांना याचा निर्णय घ्यायचा आहे. आम्ही सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. परिस्थिती आणखी तणावपूर्ण होईल असे कोणतेही पाऊल कोणत्याही देशांनी उचलू नये, असे आवाहन आम्ही करत असल्याचे त्यांनी सांगितले.