वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
भारताने अवकाशात उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्यानंतर निर्माण झालेल्या अवकाश कचऱ्याबद्दल 'नासा'ने टीका केली होती. मात्र, अमेरिकी सरकारने या टीकेला महत्त्व दिलेले नाही. भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश अवकाश क्षेत्रातील सहकार्य जोपासणार असून, यामध्ये अवकाशातील सुरक्षेचाही समावेश आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.
भारताने अवकाशातील उपग्रह पाडल्यानंतर त्याचे ४०० तुकडे तयार झाले असून, अवकाशात तयार झालेला हा कचरा भयावह बाब आहे, असे अमेरिकी अवकाश संशोधन संस्था नासाने म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रॉबर्ट पॅलाडिनो म्हणाले, 'अवकाशातील कचरा हा अमेरिकेच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. अवकाश कचऱ्याचा प्रश्न ध्यानात घेऊन अवकाशातील ही चाचणीची रचना करण्यात आली होती, असे भारताने सांगितले आहे. ते आम्ही विचारात घेतले आहे.'
'गेल्या आठवड्यात याबद्दल आम्ही काही प्रमाणात बोललो होतो. मात्र, आम्ही पूर्वी सांगितल्याप्रमाणे भारतासोबत आमची मजबूत भागीदारी आहे. दोन्ही देश अवकाश क्षेत्रातील संबंध कायम ठेवतील, तसेच भारतासोबतचे वैज्ञानिक आणि तांत्रिक कायम राहील. यामध्ये अवकाशातील सुरक्षितता आणि सुरक्षेचा समावेश आहे,' असेही पॅलाडिनो यांनी सांगितले.
भारताने नुकतीच 'लो अर्थ ऑर्बिट'मधील उपग्रह क्षेपणास्त्राद्वारे पाडण्याची चाचणी घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चाचणीची माहिती देशवासीयांना दिली होती. दरम्यान, भारताच्या या चाचणीनंतर निर्माण झालेले अवकाश कचऱ्याच्या ६० तुकड्यांचा माग आतापर्यंत काढण्यात आला असून, त्यापैकी २४ तुकडे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या शिरोबिंदूच्या वर गेले आहेत, असे 'नासा'चे व्यवस्थापक जिम ब्रायडेन्स्टाइन यांनी सांगितले होते. ही अत्यंत भयानक बाब असल्याचा दावा त्यांनी केला होता.
'इस्रो'ने घेतली पुरेशी काळजी
अहमदाबाद : 'मिशन शक्ती'च्या चाचणीमुळे अंतराळात निर्माण झालेला कचरा पुढील सहा महिन्यात जळून नष्ट होईल, अशी माहिती 'इस्रो'च्या अध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार तपन मिश्रा यांनी दिली. 'बऱ्याचदा लग्नात आपले काही खास मित्रही जेवणाला नावं ठेवतात. आपण जेव्हा काही वेगळे काम करतो तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला हार घातले जात नाहीत. हा जीवनाचा भागच आहे,' अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली. भारताने अंतराळात ३०० किमी उंचीवर चाचणी केली. तिथे हवेचा दाब खूपच कमी असतो. परंतु, तो कचरा जाळून नष्ट करण्यास पुरेसा आहे, असे त्यांनी नमूद केले. तपन मिश्रा अहमदाबादमधील स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटरचे माजी संचालक आहेत. 'नासा'ने दिलेल्या इशाऱ्याबाबत नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधील एका विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न विचारला होता. त्या वेळी त्यांनी 'मिशन शक्ती'चे यश उलगडून सांगितले. चीनने ८०० किलोमीटर उंचीवर हीच चाचणी केली होती. तिथे हवेचा दाब जवळपास नसतोच. त्यामुळे या चाचणीनंतर निर्माण झालेला कचरा, पाडलेल्या उपग्रहाचे ३००० तुकडे अजूनही अंतराळात तरंगत आहेत. तसा प्रकार होऊ नये यादृष्टीने भारताने पूर्ण काळजी घेतल्याचे 'इस्रो'ने स्पष्ट केले आहे.
भारताने अवकाशात उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्यानंतर निर्माण झालेल्या अवकाश कचऱ्याबद्दल 'नासा'ने टीका केली होती. मात्र, अमेरिकी सरकारने या टीकेला महत्त्व दिलेले नाही. भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश अवकाश क्षेत्रातील सहकार्य जोपासणार असून, यामध्ये अवकाशातील सुरक्षेचाही समावेश आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.
भारताने अवकाशातील उपग्रह पाडल्यानंतर त्याचे ४०० तुकडे तयार झाले असून, अवकाशात तयार झालेला हा कचरा भयावह बाब आहे, असे अमेरिकी अवकाश संशोधन संस्था नासाने म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रॉबर्ट पॅलाडिनो म्हणाले, 'अवकाशातील कचरा हा अमेरिकेच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. अवकाश कचऱ्याचा प्रश्न ध्यानात घेऊन अवकाशातील ही चाचणीची रचना करण्यात आली होती, असे भारताने सांगितले आहे. ते आम्ही विचारात घेतले आहे.'
'गेल्या आठवड्यात याबद्दल आम्ही काही प्रमाणात बोललो होतो. मात्र, आम्ही पूर्वी सांगितल्याप्रमाणे भारतासोबत आमची मजबूत भागीदारी आहे. दोन्ही देश अवकाश क्षेत्रातील संबंध कायम ठेवतील, तसेच भारतासोबतचे वैज्ञानिक आणि तांत्रिक कायम राहील. यामध्ये अवकाशातील सुरक्षितता आणि सुरक्षेचा समावेश आहे,' असेही पॅलाडिनो यांनी सांगितले.
भारताने नुकतीच 'लो अर्थ ऑर्बिट'मधील उपग्रह क्षेपणास्त्राद्वारे पाडण्याची चाचणी घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चाचणीची माहिती देशवासीयांना दिली होती. दरम्यान, भारताच्या या चाचणीनंतर निर्माण झालेले अवकाश कचऱ्याच्या ६० तुकड्यांचा माग आतापर्यंत काढण्यात आला असून, त्यापैकी २४ तुकडे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या शिरोबिंदूच्या वर गेले आहेत, असे 'नासा'चे व्यवस्थापक जिम ब्रायडेन्स्टाइन यांनी सांगितले होते. ही अत्यंत भयानक बाब असल्याचा दावा त्यांनी केला होता.
'इस्रो'ने घेतली पुरेशी काळजी
अहमदाबाद : 'मिशन शक्ती'च्या चाचणीमुळे अंतराळात निर्माण झालेला कचरा पुढील सहा महिन्यात जळून नष्ट होईल, अशी माहिती 'इस्रो'च्या अध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार तपन मिश्रा यांनी दिली. 'बऱ्याचदा लग्नात आपले काही खास मित्रही जेवणाला नावं ठेवतात. आपण जेव्हा काही वेगळे काम करतो तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला हार घातले जात नाहीत. हा जीवनाचा भागच आहे,' अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली. भारताने अंतराळात ३०० किमी उंचीवर चाचणी केली. तिथे हवेचा दाब खूपच कमी असतो. परंतु, तो कचरा जाळून नष्ट करण्यास पुरेसा आहे, असे त्यांनी नमूद केले. तपन मिश्रा अहमदाबादमधील स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटरचे माजी संचालक आहेत. 'नासा'ने दिलेल्या इशाऱ्याबाबत नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधील एका विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न विचारला होता. त्या वेळी त्यांनी 'मिशन शक्ती'चे यश उलगडून सांगितले. चीनने ८०० किलोमीटर उंचीवर हीच चाचणी केली होती. तिथे हवेचा दाब जवळपास नसतोच. त्यामुळे या चाचणीनंतर निर्माण झालेला कचरा, पाडलेल्या उपग्रहाचे ३००० तुकडे अजूनही अंतराळात तरंगत आहेत. तसा प्रकार होऊ नये यादृष्टीने भारताने पूर्ण काळजी घेतल्याचे 'इस्रो'ने स्पष्ट केले आहे.