संयुक्त राष्ट्रे: अफगाणिस्तानमधून अमेरिकेचा शेवटचा सैनिक माघारी गेल्यानंतर भारताच्या अध्यक्षेत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने एक प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रस्तावानुसार, तालिबानला अफगाणिस्तानमधील सरकार सांभाळण्यासाठी सशर्त मंजुरी देण्यात आली आहे. UNSC च्या प्रस्तावानुसार, अफगाणिस्तानमध्ये तालिबान अस्थायी सरकारप्रमाणे काम करत आहे. त्यामुळे अफगाणिस्तान हे दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थळ होऊ नये याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. चीन आणि रशियाने या प्रस्तावावर तटस्थ भूमिका घेतली.
सुरक्षा समितीतील फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेसह १३ सदस्यांनी या ठरावाच्या बाजूने मतदान केले. या विरोधात कोणीही विरोधात मतदान केले नसले, तरी कायम सदस्य असलेल्या आणि व्हेटोचा अधिकार असलेल्या रशिया आणि चीनने यावेळी तटस्थ राहणे पसंत केले.
तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळविल्यानंतर तेथे उद्भवलेल्या परिस्थितीवर १५ देशांच्या सुरक्षा समितीने संमत केलेला हा पहिला ठराव आहे. काबूलमधील विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. तर, अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफील्ड यांनी रशिया आणि चीनची तटस्थ भूमिका निराशाजनक असल्याचे नमूद केले.
अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर हा कोणत्याही देशाला धमकावण्यासाठी अथवा दहशतवाद्यांचे आश्रयस्थान होऊ नये, असा ठराव भारताच्या अध्यक्षतेखालील संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीने सोमवारी मंजूर केला. अफगाणी आणि सर्व परदेशी नागरिकांना सुरक्षित देशाबाहेर पडू दिले जाईल, हे आश्वासन तालिबान्यांनी पाळावे, अशी अपेक्षाही या ठरावात व्यक्त करण्यात आली. भारताच्या अध्यक्षपदाच्या शेवटच्या दिवशीच हा ठराव संमत झाला.
सुरक्षा समितीतील फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेसह १३ सदस्यांनी या ठरावाच्या बाजूने मतदान केले. या विरोधात कोणीही विरोधात मतदान केले नसले, तरी कायम सदस्य असलेल्या आणि व्हेटोचा अधिकार असलेल्या रशिया आणि चीनने यावेळी तटस्थ राहणे पसंत केले.
तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळविल्यानंतर तेथे उद्भवलेल्या परिस्थितीवर १५ देशांच्या सुरक्षा समितीने संमत केलेला हा पहिला ठराव आहे. काबूलमधील विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. तर, अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफील्ड यांनी रशिया आणि चीनची तटस्थ भूमिका निराशाजनक असल्याचे नमूद केले.
अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर हा कोणत्याही देशाला धमकावण्यासाठी अथवा दहशतवाद्यांचे आश्रयस्थान होऊ नये, असा ठराव भारताच्या अध्यक्षतेखालील संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीने सोमवारी मंजूर केला. अफगाणी आणि सर्व परदेशी नागरिकांना सुरक्षित देशाबाहेर पडू दिले जाईल, हे आश्वासन तालिबान्यांनी पाळावे, अशी अपेक्षाही या ठरावात व्यक्त करण्यात आली. भारताच्या अध्यक्षपदाच्या शेवटच्या दिवशीच हा ठराव संमत झाला.