वृत्तसंस्था, इस्लामाबाद
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अचानक शांततेचे उमाळे आले आहेत. ‘भारत आणि पाकिस्तानदरम्यान मैत्रीपूर्ण आणि चांगल्या शेजाराचे संबंध असावेत, त्यांनी एकमेकांविरोधात कट कारस्थान रचणे टाळावे,’ असे वक्तव्य शरीफ यांनी केले आहे. त्याच वेळी काश्मीर मुद्द्यावर मात्र त्यांनी आडमुठी भूमिका कायम ठेवली आहे. काश्मीर प्रश्नावर पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी तुर्कीचे आभार मानले.
शरीफ तुर्कीच्या दौऱ्यावर गेले आहेत. तेथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘आपल्या पक्षाचे भारतविरोधाचे धोरण नाही. ती प्रतिकूल परंपरा आपण संपविली आहे,’ असे शरीफ या वेळी म्हणाले. ते म्हणाले, ‘गेल्या वर्षभरापासून उभय देशांदरम्यानचे संबंध ताणलेले आहेत. विशेषतः भारतातील उरी येथील लष्करी तळावर दहशतवादी हल्ला झाल्यावर या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल हल्ले करण्यात आले, त्या वेळी ते अधिक ताणले गेले.’
दरम्यान, अणुपुरवठादार गटात समावेश व्हावा, यासाठी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या तथाकथित प्रयत्नांना मदत केल्याबद्दलही त्यांनी तुर्कीचे आभार मानले. पाकिस्तानमध्ये अलीकडेच झालेल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर, ‘पाकिस्तानच्या प्रगतीवर काही घटक नाराज आहेत,’ असे ते म्हणाले. ‘कोणत्याही स्थितीत दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे,’ असेही त्यांनी सांगितले. दहशतवादी घटनांमध्ये परकीय हात असल्याची शक्यताही त्यांनी नाकारली नाही.
लाहोर स्फोट गॅस गळतीमुळे‘लाहोर येथे झालेला स्फोट हे दहशतवादी कृत्य नसून, हा स्फोट गॅस गळतीमुळे झाला आहे,’ असे पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या सरकारने स्पष्ट केले. या स्फोटात दहा जण ठार आणि ३० जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट असल्याचे स्थानिक पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या पूर्वी सांगितले होते. मात्र, न्यायवैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या तपासानुसार घटनास्थळी कोणत्याही प्रकारची स्फोटके आढळली नाहीत. तो केवळ एक अपघात होता आणि तो गॅस गळतीमुळे झाला होता, असे पंजाबचे कायदा मंत्री राणा सनाउल्लाह यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अचानक शांततेचे उमाळे आले आहेत. ‘भारत आणि पाकिस्तानदरम्यान मैत्रीपूर्ण आणि चांगल्या शेजाराचे संबंध असावेत, त्यांनी एकमेकांविरोधात कट कारस्थान रचणे टाळावे,’ असे वक्तव्य शरीफ यांनी केले आहे. त्याच वेळी काश्मीर मुद्द्यावर मात्र त्यांनी आडमुठी भूमिका कायम ठेवली आहे. काश्मीर प्रश्नावर पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी तुर्कीचे आभार मानले.
शरीफ तुर्कीच्या दौऱ्यावर गेले आहेत. तेथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘आपल्या पक्षाचे भारतविरोधाचे धोरण नाही. ती प्रतिकूल परंपरा आपण संपविली आहे,’ असे शरीफ या वेळी म्हणाले. ते म्हणाले, ‘गेल्या वर्षभरापासून उभय देशांदरम्यानचे संबंध ताणलेले आहेत. विशेषतः भारतातील उरी येथील लष्करी तळावर दहशतवादी हल्ला झाल्यावर या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल हल्ले करण्यात आले, त्या वेळी ते अधिक ताणले गेले.’
दरम्यान, अणुपुरवठादार गटात समावेश व्हावा, यासाठी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या तथाकथित प्रयत्नांना मदत केल्याबद्दलही त्यांनी तुर्कीचे आभार मानले. पाकिस्तानमध्ये अलीकडेच झालेल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर, ‘पाकिस्तानच्या प्रगतीवर काही घटक नाराज आहेत,’ असे ते म्हणाले. ‘कोणत्याही स्थितीत दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे,’ असेही त्यांनी सांगितले. दहशतवादी घटनांमध्ये परकीय हात असल्याची शक्यताही त्यांनी नाकारली नाही.
लाहोर स्फोट गॅस गळतीमुळे‘लाहोर येथे झालेला स्फोट हे दहशतवादी कृत्य नसून, हा स्फोट गॅस गळतीमुळे झाला आहे,’ असे पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या सरकारने स्पष्ट केले. या स्फोटात दहा जण ठार आणि ३० जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट असल्याचे स्थानिक पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या पूर्वी सांगितले होते. मात्र, न्यायवैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या तपासानुसार घटनास्थळी कोणत्याही प्रकारची स्फोटके आढळली नाहीत. तो केवळ एक अपघात होता आणि तो गॅस गळतीमुळे झाला होता, असे पंजाबचे कायदा मंत्री राणा सनाउल्लाह यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.