अ‍ॅपशहर

भारतीय संघ चोकर्स आहे का? पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला...

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडकडून पराभूत व्हावं लागल्यानंतर भारतीय संघावर चोहोबाजूंनी टीका होत होती. अनेकांनी विराट कोहलीच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. भारतीय संघ खरंच चोकर्स आहे का...

Lipi 25 Jul 2021, 9:56 pm
नवी दिल्ली : 2011 चा एकदिवसीय विश्वचषक आणि त्यानंतर झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय संघाला (Team India) अशी कामगिरी पुन्हा करता आलेली नाही. त्यानंतर झालेल्या आयसीसीच्या (ICC) सर्व महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये भारताला पराभवास सामोरे जावे लागले. आयसीसीच्या प्रत्येक स्पर्धेत अंतिम सामन्यात किंवा उपांत्य फेरीत अपयशी ठरणाऱ्या भारतीय संघाबद्दल पाकिस्तानच्या एका खेळाडूने महत्त्वाची प्रतिक्रिया नोंदवली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम it is not right to call indian team chokers in icc tournaments says salman butt
भारतीय संघ चोकर्स आहे का? पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला...

गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघ आयसीसीची कोणतीही स्पर्धा जिंकू शकला नाही. 2013 मध्ये भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून प्रत्येक स्पर्धेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारताने निश्चितच उपांत्य फेरी किंवा अंतिम सामन्यात धडक मारली, पण विजेतेपद जिंकता आले नाही. नुकत्याच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडविरूद्धही पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे ही अनेकांची टीकेची झोड उठवली होती.

पाकचा माजी सलामीवीर सलमान बट्टने (Salman Butt) भारताच्या अपयशाबद्दल त्याचे मत नोंदवले आहे. भारत अद्याप आयसीसीच्या इतक्या स्पर्धा हरलेला नाही, ज्यामुळे त्यांना चोकर्स म्हणावे लागेल.

भारतीय संघाच्या एकूण कामगिरीबद्दल बोलताना सलमान बट त्याच्या यू-ट्यूब चॅनेलवरून म्हणाला की, असं नाही की भारत बर्‍याच दिवसांपासून आयसीसीची स्पर्धा जिंकला नाही. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्याशिवाय 2007चा टी-20 आणि 2011चा एकदिवसीय विश्वचषक भारताने जिंकला आहे. 2019 विश्वचषकाचा उपांत्य सामना आणि नुकतीच झालेली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत चांगली कामगिरी केली होती.

जवळपास प्रत्येक स्पर्धेत भारतीय संघ पहिल्या दोन संघात स्थान मिळवत आहे, त्यांना पराभूत व्हावे लागत आहे पण ती संख्या इतकी मोठी नाही. त्यामुळे त्यांना चोकर्स म्हणता येणार नाही.

दुसरीकडे न्यूझीलंड संघाने बाद फेरीत वारंवार पराभवाचा सामना केला, पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकत सर्व अपयश धुऊन टाकले. न्यूझीलंडने अनेकदा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. 2015 आणि 2019च्या विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला, पण त्यांना कुणी चोकर्स म्हटलं नाही. दक्षिण आफ्रिका वारंवार महत्त्वाचे सामने गमावते, त्यामुळे त्यांना चोकर्स म्हटले जाते. भारतीय संघाबरोबर असे घडलेले नाही, असंही बटने स्पष्ट केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज