अ‍ॅपशहर

अन् जयंत पाटलांनी भरसभेत तोंडावरचा मास्क काढला

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची चुरस वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रचारसभा आयोजित केली होती.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Lipi 4 Apr 2021, 3:13 pm
सोलापूर: एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कडक लॉकडाऊनची भाषा करत असताना त्यांच्याच मंत्रिमंडळातील जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जनतेला बुचकळ्यात टाकणारं वक्तव्य केलंय. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पाटील यांनी हे वक्तव्य केलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jayant patil remove face mask in election campaign
अन् जयंत पाटलांनी भरसभेत तोंडावरचा मास्क काढला


वाचाः पंढरपूर पोटनिवडणूक: भावनिक मुद्द्यांवर होणार लढत?

पंढरपूर तालुक्यातील रांझणीच्या सभेत बोलताना जयंत पाटील यांनी,"तुमचे सर्वांचे चेहरे पाहून जगात करोना नाही, असं मला वाटतंय म्हणून मी पण मास्क काढून बोलतो" असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळं करोनासारख्या गंभीर प्रश्नावर राज्य मंत्रीमंडळातीलच मंत्री असं विधान करत असल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

वाचाः पंढरपूर पोटनिवडणूक: भाऊबंदकीच्या आव्हानामुळं भाजपच्या वाटेत काटे

करोनाचा फैलाव हाताबाहेर जात आहे. औषध आणि रुग्णांसाठी बेड्सची अपुरी व्यवस्था अश्या समस्यांचा सामना खुद्द सोलापूर जिल्ह्यात आणि शहरात जाणवत आहे. त्याच जिल्ह्यात पंढरपूर विधानसभा पोटनिवणुकीच्या निमित्ताने आलेल्या जयंत पाटील यांनी करोनाविषयी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं असून सरकारच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

वाचाः पंढरपुर पोटनिवडणुक: भाजपला धक्का; आणखी एक नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?
विशेष म्हणजे या सभेतील व्यासपीठावरील दिग्गज आणि समोरील गर्दीच्या चेहऱ्यावरही मास्क नव्हते त्यामुळं ही पोटनिवडणूक पंढरपूर तालुक्यातील जनतेला करोनाच्या वरातीत सामील करणार, अशी चर्चा आता सुरु झालीय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज