Mustafa.Attar@timesgroup.com
पुणेः परवा आमचा राजा सहज बोलता बोलता म्हणाला ‘यार, ‘अॅसिडिटी’ खूप झालीय... चहा बंद केला पाहिजे.’ त्यावर ‘तू हे कर... तू ते कर’ असे सल्ले त्याला देण्यात आले. पण ‘अॅसिडिटी म्हणजे नेमके काय रे भाऊ ?’ असाही प्रश्न कट्ट्यावर एकाने सहज विचारला. त्यावर चर्चा रंगली आणि अॅसिडिटी कशामुळे होते आणि कशामुळे होत नाही, या संदर्भात अनेकजण आपल्या अकलेचे तारे तोडू लागले. पण एक जाणवले, की लहानपणी काका, आजोबा, अथवा वडिलांना होणारे अॅसिडिटी आमच्या पिढीत पंचविशी तिशीत होऊ लागले आहे.
अॅसिडिटी म्हणजे काय?
छातीत जळजळ करणे अथवा अॅसिडिटीचा त्रास. सुरुवातीला ही जळजळ कशामुळे तरी होते असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु, हा निष्काळजीपणा भविष्यात घातक ठरू शकतो, हे नक्की. अॅसिडिटी म्हणजे जठरामध्ये जमा होणारे अॅसिड. त्याचे प्रमाण वाढल्याने जठराच्या स्नायूंना इजा होते. त्याला ‘अॅसिड सेप्टिक डीसीज’ असे म्हटले जाते. हाच द्रव जठराकडून अन्न नलिकेडे येते. जठरातून पिवळसर रंगाचा द्रव येतो तर जठराच्या वरच्या भागातून हिरव्या रंगाचे द्रव येते. त्यालाच अॅसिडिटी असे म्हटले जाते.
अॅसिडिटी होण्याचे कारण
अॅसिडिटी हा आजार तसे पाहिले तर अनुवंशिक आहे, असे म्हणता येत नाही. पण, आजोबा, वडील जे खातात तेच त्यांची मुले खातात. अथवा त्यांच्या पुढच्या पिढीत तीच खाद्यसंस्कृती रुजत जाते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयीदेखील त्याच पुढे कायम राहतात. रात्री-अपरात्री, वेळी-अवेळी खाणे, व्यायामाचा अभाव, फास्टफूड खाणे, रात्रभर जागणे या गोष्टी नव्या पिढीत पाहायला मिळतात. त्याशिवाय, बदलती जीवनशैली, ताणतणाव, खाण्याच्या चुकीच्या पद्धती, तेलकट खाणे, मसालेदार पदार्थ, पटपट खाणे, शिळे पदार्थ खाणे यामुळेदेखील अॅसिडिटी होते. त्यामुळे पित्ताचा आजार वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकतज्ज्ञ नोंदवितात. त्याला अंशतः दारू, सिगारेट यांसारखी व्यसनेदेखील कारणीभूत ठरत आहेत. एका पिढीची ‘फॅमिली टेंडसी’ अथवा लाइफस्टाइल आपोआप दुसऱ्या पिढीकडे सहज जात असल्याने पित्ताचा आजार दुसऱ्या पिढीत झाल्याचे दिसून येते.
अॅसिडिटीचे परिणाम
वर्षानुवर्षे शरीरात ‘गॅस्ट्रिक’ ज्यूसचे प्रमाण वाढल्याने अॅसिडिटीचा आजार उद्भवतो. अॅसिडिटीचा आजार वाढला, की तो जठरासह अन्ननलिकेचा कॅन्सर होण्यापर्यंत नाढतो. पूर्वीच्या पिढ्यांमध्ये अॅसिडिटीचा आजार फारसा दिसून येत नव्हता. पण, आता हा विकार नव्या पिढीत अर्थात पंचवीस-तिशीत दिसून येत आहे. पूर्वीच्या पिढीत पन्नाशीनंतर दिसत होता. स्पर्धात्मक युग, आव्हाने पूर्ण करण्यासाठी सुरू असलेली धावपळ या सर्वांचा परिपाक म्हणजेच अॅसिडिटी अर्थात अॅसिडिटी वाढणे असे निरीक्षण नोंदविले जाते. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांसह रात्रभर काम करणाऱ्या कार्यालयातील नोकरदारांमध्ये अॅसिडिटी वाढल्याने अॅसिडिटीचा त्रास जाणवतो. अॅसिडिटी वाढल्याने शरीरातील त्या भागात अल्सर होतो. अल्सरमुळे आतडे फुटू शकते. पोटामध्ये रक्तस्राव होऊ शकतो. अॅसिडिटीमुळे खाण्यावर परिणाम होतो. भूक असली, तरी खाण्याची इच्छा होत नाही.
अॅसिडिटीचे निदान कसे होणार ?
अॅसिडिटी झाल्यास त्याची लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे त्याचे निदान करणे सोपे आहे. गॅस्ट्रोस्कोपीने अॅसिडिटीचे निदान करणे शक्य आहे. पूर्वीपेक्षा आता उपचार स्वस्त झाल्याने विविध चाचण्या करणे शक्य आहे. दुर्बिणीतून अॅसिडिटीच्या आजाराचे निदान केले जाते. नेमका आजार काय होतो, याचे निदान केले जाते. ‘बायोप्सी’ करून ‘एच पायलरी’ नावाच्या आजाराचे देखील निदान केले जाते. ‘गॅस्ट्रोस्कोपी’ने ‘अल्सर’ आहे का कॅन्सर याचे निदान करणे शक्य आहे. वर्षानुवर्षे अॅसिडिटी झाल्याने त्याचा परिणाम होऊन अन्न नलिकेसह जठराचे कॅन्सर होण्याची शक्यता असते. अॅसिडिटीमुळे कॅन्सर होण्याचे प्रमाण फारसे नाही. जपान तसेच भारताबाहेरील देशांमध्ये अॅसिडिटीचा आजार आढळतो. खाण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे हा आजार मोठ्या प्रमाणात दिसतो. आजाराचे उपचार स्वस्त असल्याने वारंवार चाचण्या करणे शक्य आहे. त्याच्या आधारावर आजार नियंत्रणात ठेऊ शकतो. खर्चामुळे नागरिकांमध्ये भीती असते. त्यामुळे फारसे उपचार करून घेत नाहीत. पण, स्वस्तातील उपचारामुळे आजाराचे उपचार करून घेता येणे शक्य आहे.
अॅसिडिटी आणि पित्ताशयातील खडे
अॅसिडिटी वाढली, तरी त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. काही होत नाही, असे समजून त्याचे उपचार घेणे टाळतो. परंतु, अॅसिडिटी साचल्याने पित्ताशयातील पिशवीत पित्ताचे खडे तयार होतात. त्यामुळे पित्तासारखे जळजळ होणे, उलट्या होणे, पोटात दुखणे, खाल्ल्यानंतरही दुखणे यासारखी लक्षणे दिसून येतात. अॅसिडिटी म्हणून दुर्लक्ष करणे हे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे पित्ताशयात खडे तयार होतात.
वेळीअवेळी खाणे, व्यायामाचा अभाव, ताणतणावामुळे अॅसिडिटी डोके वर काढू लागते. पूर्वीच्या पिढ्यांमध्ये अॅसिडिटी पन्नाशीत होत होती. आता नव्या पिढीत पंचवीस-तिशीत हा आजार होत आहे. यावरूनच अॅसिडिटीचा आजारदेखील आता ‘तरुण’ होत आहे अशीच भावना डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे.
अॅसिडिटी होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. हे आता प्रत्येकाने ओळखले पाहिजे. अॅसिडिटी होत असल्यास म्हणजेच तुमची लाइफस्टाइल बदलत आहे. जागरण, वेळी अवेळी खाण्याचे प्रमाण वाढत असल्याचे प्रत्येकाने ओळखले पाहिजे. वेळीच आजाराचे निदान करून घेतले तर उपचार स्वस्त आहेत.
- डॉ. अभिजित कर्वे, सर्जन, जोशी हॉस्पिटल
पुणेः परवा आमचा राजा सहज बोलता बोलता म्हणाला ‘यार, ‘अॅसिडिटी’ खूप झालीय... चहा बंद केला पाहिजे.’ त्यावर ‘तू हे कर... तू ते कर’ असे सल्ले त्याला देण्यात आले. पण ‘अॅसिडिटी म्हणजे नेमके काय रे भाऊ ?’ असाही प्रश्न कट्ट्यावर एकाने सहज विचारला. त्यावर चर्चा रंगली आणि अॅसिडिटी कशामुळे होते आणि कशामुळे होत नाही, या संदर्भात अनेकजण आपल्या अकलेचे तारे तोडू लागले. पण एक जाणवले, की लहानपणी काका, आजोबा, अथवा वडिलांना होणारे अॅसिडिटी आमच्या पिढीत पंचविशी तिशीत होऊ लागले आहे.
अॅसिडिटी म्हणजे काय?
छातीत जळजळ करणे अथवा अॅसिडिटीचा त्रास. सुरुवातीला ही जळजळ कशामुळे तरी होते असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु, हा निष्काळजीपणा भविष्यात घातक ठरू शकतो, हे नक्की. अॅसिडिटी म्हणजे जठरामध्ये जमा होणारे अॅसिड. त्याचे प्रमाण वाढल्याने जठराच्या स्नायूंना इजा होते. त्याला ‘अॅसिड सेप्टिक डीसीज’ असे म्हटले जाते. हाच द्रव जठराकडून अन्न नलिकेडे येते. जठरातून पिवळसर रंगाचा द्रव येतो तर जठराच्या वरच्या भागातून हिरव्या रंगाचे द्रव येते. त्यालाच अॅसिडिटी असे म्हटले जाते.
अॅसिडिटी होण्याचे कारण
अॅसिडिटी हा आजार तसे पाहिले तर अनुवंशिक आहे, असे म्हणता येत नाही. पण, आजोबा, वडील जे खातात तेच त्यांची मुले खातात. अथवा त्यांच्या पुढच्या पिढीत तीच खाद्यसंस्कृती रुजत जाते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयीदेखील त्याच पुढे कायम राहतात. रात्री-अपरात्री, वेळी-अवेळी खाणे, व्यायामाचा अभाव, फास्टफूड खाणे, रात्रभर जागणे या गोष्टी नव्या पिढीत पाहायला मिळतात. त्याशिवाय, बदलती जीवनशैली, ताणतणाव, खाण्याच्या चुकीच्या पद्धती, तेलकट खाणे, मसालेदार पदार्थ, पटपट खाणे, शिळे पदार्थ खाणे यामुळेदेखील अॅसिडिटी होते. त्यामुळे पित्ताचा आजार वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकतज्ज्ञ नोंदवितात. त्याला अंशतः दारू, सिगारेट यांसारखी व्यसनेदेखील कारणीभूत ठरत आहेत. एका पिढीची ‘फॅमिली टेंडसी’ अथवा लाइफस्टाइल आपोआप दुसऱ्या पिढीकडे सहज जात असल्याने पित्ताचा आजार दुसऱ्या पिढीत झाल्याचे दिसून येते.
अॅसिडिटीचे परिणाम
वर्षानुवर्षे शरीरात ‘गॅस्ट्रिक’ ज्यूसचे प्रमाण वाढल्याने अॅसिडिटीचा आजार उद्भवतो. अॅसिडिटीचा आजार वाढला, की तो जठरासह अन्ननलिकेचा कॅन्सर होण्यापर्यंत नाढतो. पूर्वीच्या पिढ्यांमध्ये अॅसिडिटीचा आजार फारसा दिसून येत नव्हता. पण, आता हा विकार नव्या पिढीत अर्थात पंचवीस-तिशीत दिसून येत आहे. पूर्वीच्या पिढीत पन्नाशीनंतर दिसत होता. स्पर्धात्मक युग, आव्हाने पूर्ण करण्यासाठी सुरू असलेली धावपळ या सर्वांचा परिपाक म्हणजेच अॅसिडिटी अर्थात अॅसिडिटी वाढणे असे निरीक्षण नोंदविले जाते. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांसह रात्रभर काम करणाऱ्या कार्यालयातील नोकरदारांमध्ये अॅसिडिटी वाढल्याने अॅसिडिटीचा त्रास जाणवतो. अॅसिडिटी वाढल्याने शरीरातील त्या भागात अल्सर होतो. अल्सरमुळे आतडे फुटू शकते. पोटामध्ये रक्तस्राव होऊ शकतो. अॅसिडिटीमुळे खाण्यावर परिणाम होतो. भूक असली, तरी खाण्याची इच्छा होत नाही.
अॅसिडिटीचे निदान कसे होणार ?
अॅसिडिटी झाल्यास त्याची लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे त्याचे निदान करणे सोपे आहे. गॅस्ट्रोस्कोपीने अॅसिडिटीचे निदान करणे शक्य आहे. पूर्वीपेक्षा आता उपचार स्वस्त झाल्याने विविध चाचण्या करणे शक्य आहे. दुर्बिणीतून अॅसिडिटीच्या आजाराचे निदान केले जाते. नेमका आजार काय होतो, याचे निदान केले जाते. ‘बायोप्सी’ करून ‘एच पायलरी’ नावाच्या आजाराचे देखील निदान केले जाते. ‘गॅस्ट्रोस्कोपी’ने ‘अल्सर’ आहे का कॅन्सर याचे निदान करणे शक्य आहे. वर्षानुवर्षे अॅसिडिटी झाल्याने त्याचा परिणाम होऊन अन्न नलिकेसह जठराचे कॅन्सर होण्याची शक्यता असते. अॅसिडिटीमुळे कॅन्सर होण्याचे प्रमाण फारसे नाही. जपान तसेच भारताबाहेरील देशांमध्ये अॅसिडिटीचा आजार आढळतो. खाण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे हा आजार मोठ्या प्रमाणात दिसतो. आजाराचे उपचार स्वस्त असल्याने वारंवार चाचण्या करणे शक्य आहे. त्याच्या आधारावर आजार नियंत्रणात ठेऊ शकतो. खर्चामुळे नागरिकांमध्ये भीती असते. त्यामुळे फारसे उपचार करून घेत नाहीत. पण, स्वस्तातील उपचारामुळे आजाराचे उपचार करून घेता येणे शक्य आहे.
अॅसिडिटी आणि पित्ताशयातील खडे
अॅसिडिटी वाढली, तरी त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. काही होत नाही, असे समजून त्याचे उपचार घेणे टाळतो. परंतु, अॅसिडिटी साचल्याने पित्ताशयातील पिशवीत पित्ताचे खडे तयार होतात. त्यामुळे पित्तासारखे जळजळ होणे, उलट्या होणे, पोटात दुखणे, खाल्ल्यानंतरही दुखणे यासारखी लक्षणे दिसून येतात. अॅसिडिटी म्हणून दुर्लक्ष करणे हे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे पित्ताशयात खडे तयार होतात.
वेळीअवेळी खाणे, व्यायामाचा अभाव, ताणतणावामुळे अॅसिडिटी डोके वर काढू लागते. पूर्वीच्या पिढ्यांमध्ये अॅसिडिटी पन्नाशीत होत होती. आता नव्या पिढीत पंचवीस-तिशीत हा आजार होत आहे. यावरूनच अॅसिडिटीचा आजारदेखील आता ‘तरुण’ होत आहे अशीच भावना डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे.
अॅसिडिटी होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. हे आता प्रत्येकाने ओळखले पाहिजे. अॅसिडिटी होत असल्यास म्हणजेच तुमची लाइफस्टाइल बदलत आहे. जागरण, वेळी अवेळी खाण्याचे प्रमाण वाढत असल्याचे प्रत्येकाने ओळखले पाहिजे. वेळीच आजाराचे निदान करून घेतले तर उपचार स्वस्त आहेत.
- डॉ. अभिजित कर्वे, सर्जन, जोशी हॉस्पिटल