आयुर्वेदात दिलेल्या माहितीनुसार आपले शरीर वात, पित्त आणि कफ या तीन गोंष्टीपासून बनलेले असते. या तिन्ही दोषांसह जो माणूस आपले आयुष्य उत्तम जगतो अशा माणसाला फिट मानले जाते. पण सध्याचे जीवनमान पाहता आपल किती टेंन्शनमध्ये जगतोय या गोष्टींचं कोणालाच भान राहिले नाही आहे. पण तुमचे शरीर तुम्हाला होणाऱ्या प्रत्येक आजाराचे संकेत देत असते. चला तर मग जाणून घेऊयात याबद्दल आधिक माहिती.
योग्य पचन प्रणाली
आयुर्वेदानुसार, जर तुम्ही जे अन्नपदार्थ खाता ते खाल्लानंतर जर तुम्हाला हलके आणि फ्रेश वाटत असेल तर तुमचा आहार आणि जीवनशैली परिपू्र्ण आहे असे मानले जाते. पण अन्न खाल्लानंतर जर तुमच्या पोटात गॅस, छातीत जळजळ किंवा सुस्ती जाणवू लागली तर लगेच सावध व्हा !, या लक्षणांवरुन एकतर तुम्ही कोणत्या तरी आजाराने त्रस्त आहात किंवा तुम्ही अन्नपदार्थ खूप चुकीच्या वेळात खात आहात हे सिद्ध होते. हे लक्षण उच्च रक्तदाबाचे देखील असू शकते. त्यामुळे तुम्ही जे अन्नपदार्थ खाताय त्याकडे लक्ष द्या.
(वाचा :- कपिवा आयुर्वेद अकादमीकडून खुलासा, १० पैकी ७ ग्राहकांनी वजन केले नियंत्रित)
पाच ज्ञानेंद्रियांच्या क्रिया
माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. आपल्या आजूबाजूला होणाऱ्या गोष्टींचे योग्य आकलन होण्यासाठी आल्यामध्ये ज्ञानेंद्रिये देण्यात आली आहेत. जर तुमची पाचही ज्ञानेंद्रिये व्यवस्थीत काम करत असतील तर तुम्ही स्वत:ला निरोगी समजू शकता. जेव्हा आपल्याला एखादा आजार होते तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या ज्ञानेंद्रियांवर होतो. म्हणूनच की काय करोना झालेल्या रुग्णांना पहिले लक्षण वास, किंवा चव जाणे हे होते. जेव्हा आपल्याला सर्दी किंवा साधा ताप येतो तेव्हा देखील आपल्याला याच गोष्टीची प्रचिती येते. जर तुम्ही जास्त टेंन्शन घेतले असेल तरी त्याच्या परिणाम ज्ञानेंद्रियांच्या क्रियेवर दिसून येतो.
(वाचा :-Blood Pressure : उच्च रक्तदाबाविषयी असलेले 9 गैरसमज, आजच दूर करा)
अशांत मन
तुमचा स्वभाव जितका शांत तितके तुम्ही तंदुरुस्त आणि सुदृढ अशी मान्याता आहे. अनेकदा असे दिसून आले आहे की शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्रास असलेल्या लोकांना जास्त राग येतो. तुमचे शरीर जितके निरोगी असेल तितका तुमचा राग कमी होईल. तुमचे शरीर एका इलेक्ट्रॉनिक गॅजेट प्रमाणे काम करत असते. ते जेवढे थंड राहील ते तेवढेच उत्तम चालते.रागाचा तुमच्या रक्तदाबावरतीसुद्धा परिणाम होतो. त्यामुळे जास्तवेळ शांत राहण्याचा प्रयत्न करा.
पचनात बिघाड
अन्नाची पचनाची क्रिया देखील उत्तम असावी. एक म्हणजे खाल्लेले अन्न लवकर पचले पाहिजे आणि दुसरे म्हणजे, तुम्ही दिवसातून किती वेळा अन्न खावे ही सक्ती नसावी. या गोष्टीसाठी तुम्ही एक घास खूप वेळा चावू शकता. त्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली होईल.
अपुरी झोप
चांगल्या आरोग्याचे पहिले लक्षण म्हणजे चांगली झोप. जर तुम्हाला बेडवर पडल्या पडल्या झोप येत असेल तर तुम्ही निरोगी आहेत असे समजू शकता. जर झोप चांगली असेल तर तुमचे शरीरच नव्हे तर मानसिक आरोग्यही चांगले राहते. जर तुम्हाला शांत झोप लागत असेल तर तुम्ही उच्च रक्तदाबापासून लांबच राहता. त्यामुळे झोप पूर्ण घ्या.