अ‍ॅपशहर

रिकाम्या पोटी नकोच

सकाळी न्याहारीत तुम्ही कोणताही पदार्थ खात असाल, तर तुम्ही तुमच्या पोटावर अन्याय करत आहात. कोणता पदार्थ केव्हा खाल्ला पाहिजे याचं भान प्रत्येकानं ठेवायलाच पाहिजे. दही, कच्चे टोमॅटो, केळी असे पदार्थ रिकाम्या पोटी खाणं योग्य नाही. सकाळी रिकाम्या पोटी मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात अॅसिड तयार होतं.

Maharashtra Times 15 Feb 2017, 9:08 am
कोल्हापूर टाइम्स टीम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम empty stomach avoid this
रिकाम्या पोटी नकोच


सकाळी न्याहारीत तुम्ही कोणताही पदार्थ खात असाल, तर तुम्ही तुमच्या पोटावर अन्याय करत आहात. कोणता पदार्थ केव्हा खाल्ला पाहिजे याचं भान प्रत्येकानं ठेवायलाच पाहिजे. दही, कच्चे टोमॅटो, केळी असे पदार्थ रिकाम्या पोटी खाणं योग्य नाही. सकाळी रिकाम्या पोटी मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात अॅसिड तयार होतं.
इतकंच नव्हे, तर पोटाशी संबंधित अन्य आजारही बळावतात. त्यामुळे जाणून घ्या, की उपाशी पोटी कोणते पदार्थ टाळले पाहिजेत.

पेस्ट्री, केकः ज्या पदार्थांमध्ये यीस्टची मात्रा अधिक आहे, ते सकाळी खाल्ल्यास दिवसभर पोट फुगल्यासारखं वाटेल.

दहीः रिकाम्या पोटी दही खाल्ल्यानं हायड्रोक्लोरिक अॅसिड तयार होतं. त्यामुळे बॅक्टेरियल यंत्रणेचं मोठं नुकसान होतं.

पीअर फळः यात कच्चे फायबर असतात. त्यामुळे रिकाम्या पोटी ते खाल्ल्यामुळे पोटाला नुकसान होतं.

टोमॅटोः टोमॅटोत मोठ्या प्रमाणावर टॅनिक अॅसिड असतं. रिकाम्या पोटी ते खाल्ल्यामुळे पचनक्रियेला त्रास होतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज