अ‍ॅपशहर

Origin Of Ayurveda: आयुर्वेदासंदर्भात पंतप्रधान मोदींची तरुणांसोबत ‘मन की बात’, म्हणाले...

करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग वाईटरित्या प्रभावित झालं आहे. या प्राणघातक व्हायरसवर लस शोधण्यासाठी वैज्ञानिक संशोधन देखील करत आहेत. जगभरातील देश करोनाविरोधात आपापल्या पद्धतीनं कठोर लढा देत आहेत. दरम्यान,आयुर्वेदामध्ये असे काही नैसर्गिक औषधोपचार आहेत जे आपल्याला धोकादायक व्हायरस आणि त्यांचा संसर्ग होण्यापासून दूर ठेवण्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. पौराणिक कथांनुसार, देव आणि असुरांमध्ये युद्ध होत. यामध्ये शरीराचे नुकसान आणि वेदना देखील सहन कराव्या लागत असत. हा त्रास दूर करण्यासाठी आयुर्वेदाची रचना करण्यात आली, असं म्हटलं जातं. सध्या लोक देखील मोठ्या प्रमाणात आयुर्वेदातील नियमांचं पालन करत असल्याचं दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की कार्यक्रमाद्वारे देशातील युवा पिढीला आयुर्वेदाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी आणि प्राचीन विज्ञानास नवीन स्वरुपात लोकांसमोर आणण्याचे आवाहन केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Apr 2020, 11:24 am
करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग वाईटरित्या प्रभावित झालं आहे. या प्राणघातक व्हायरसवर लस शोधण्यासाठी वैज्ञानिक संशोधन देखील करत आहेत. जगभरातील देश करोनाविरोधात आपापल्या पद्धतीनं कठोर लढा देत आहेत. दरम्यान,आयुर्वेदामध्ये असे काही नैसर्गिक औषधोपचार आहेत जे आपल्याला धोकादायक व्हायरस आणि त्यांचा संसर्ग होण्यापासून दूर ठेवण्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. पौराणिक कथांनुसार, देव आणि असुरांमध्ये युद्ध होत. यामध्ये शरीराचे नुकसान आणि वेदना देखील सहन कराव्या लागत असत. हा त्रास दूर करण्यासाठी आयुर्वेदाची रचना करण्यात आली, असं म्हटलं जातं. सध्या लोक देखील मोठ्या प्रमाणात आयुर्वेदातील नियमांचं पालन करत असल्याचं दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की कार्यक्रमाद्वारे देशातील युवा पिढीला आयुर्वेदाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी आणि प्राचीन विज्ञानास नवीन स्वरुपात लोकांसमोर आणण्याचे आवाहन केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम health tips pm narendra modi mann ki baat on origin and development of ayurveda in marathi
Origin Of Ayurveda: आयुर्वेदासंदर्भात पंतप्रधान मोदींची तरुणांसोबत ‘मन की बात’, म्हणाले...



​पंतप्रधानांची तरुणांसोबत ‘मन की बात’, दिली ही जबाबदारी

‘आयुर्वेदातील औषधे आणि जीवनशैलीशी संबंधित माहिती आपल्याकडे गेल्या कित्येक शतकांपासून आहे. पण या सत्यावर विश्वास ठेवण्यासाठीही आपण परदेशातील प्रयोगशाळांवर अवलंबून आहोत’, असे पंतप्रधान मोदींनी अतिशय जड अंतकरणानं म्हटलं.

परदेशांकडून शिक्कामोर्तब मिळण्याची प्रतीक्षा का?

- जेव्हा परदेशातील प्रयोगशाळा किंवा संशोधन अशी एखादी गोष्टी स्वीकारते जी प्रभावी आहे. तेव्हा आपण अभिमानानं म्हणतो की ही बाब तर आमच्या आयुर्वेदातही नमुद करण्यात आली आहे.

- आपण अनेकदा आपल्या शक्तींना मानण्यास नकार देतो. पण जेव्हा इतर देश याबाबत संशोधन करण्याची गोष्ट करतात, तेव्हा आपण त्या मानण्यास सुरुवात करतो. देशाच्या तरुण पिढीला या आव्हानाचा स्वीकार करावा लागेल. ज्या पद्धतीनं जगानं योग स्वीकारले आहे त्याचप्रमाणे जगाला आयुर्वेदाचाही स्वीकार करावा लागेल, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

- आयुर्वेद ही केवळ एक वैद्यकीय पद्धती नाही तर जीवनशैली आहे. जाणून घेऊया आयुर्वेदाचा उदय कसा झाला.

(वाचा : New Symptoms Of Coronavirus : सतर्क राहा! ही आहेत करोना व्हायरसची ६ नवीन लक्षणे)

​आयुर्वेदाचे जनक कोण?

- आयुर्वेदाचे जनक कोण? या प्रश्नामुळे कायम संभ्रम निर्माण होतो. काही जण म्हणतात की आयुर्वेदाचे जनक अश्विन कुमार आहेत तर काहींच्या मते देव धन्वंतरी. पण असे काहीही नाही.

- आयुर्वेदाचे जनक देखील विश्वाचे निर्माते ब्रह्मदेवच आहेत. ब्रह्मदेवाचे १० मानसपुत्र होते. यापैकी एक होते प्रजापती. ब्रह्मदेवानं आयुर्वेदाची माहिती सर्वप्रथम प्रजापति यांना दिली होती.

-अश्विनी कुमार यांना आयुर्वेदाचे ज्ञान प्रजापतिंकडून मिळाले. अश्विनी कुमार हे देवलोकातील वैद्य. यानंतर इंद्रदेवानं अश्विनी कुमारांकडून आयुर्वेदाचे ज्ञान घेतले आणि त्यांच्याकडून महर्षि भारद्वाज यांना आयुर्वेदाची माहिती प्राप्त झाली.

(वाचा : Back Pain: प्रत्येक ८ वर्षांनंतर बदला पलंगाची गादी, कंबर दुखीचा त्रास असल्यास करू नका दुर्लक्ष)

​आयुर्वेदाचा उदय

- समुद्र मंथनादरम्यान पृथ्वीला आयुर्वेद मिळाल्याचे म्हटलं जाते. ही बाब अंशतः सत्य आहे. हे देखील खरे आहे की जेव्हा सर्वात पहिला रोग पसरला होता तेव्हा पृथ्वीवर आयुर्वेदाची आवश्यकता भासली होती.

- ऋषि भारद्वाज यांनी आयुर्वेद (Ayurved) स्वर्गातून पृथ्वीवर आणण्याचे कार्य केले. कारण ऋषि भारद्वाज त्या युगातील महान तपस्वी होते, जे आपल्या शरीराच्या जोरावर स्वर्गात जाऊन तेथून ज्ञानप्राप्ती करून पुन्हा येऊ शकत होते.

(वाचा : Weight Loss : वजन कमी करायचंय? फॉलो करा आयुर्वेदिक लाइफ स्टाइल)

​अशा पद्धतीनं झाला आयुर्वेदाचा प्रसार

ऋषि भारद्वाज आयुर्वेदाची माहिती पृथ्वीवर घेऊन आल्यानंतर त्यांचे वंशज पुनर्वसु आत्रेय यांनीही आयुर्वेदाचे ज्ञान त्यांच्याकडून घेतले. यानंतर पुनर्वसु आत्रेय यांचे सहा शिष्य होते. ज्यांची नावे खालील प्रमाणे आहेत :

-अग्निवेश

-भेड़

-जतूकर्ण

-पराशर

-हारीत

-क्षारपाणी

यांनी लिहिली तंत्र आणि संहिता

- पुनर्वसु आत्रेय यांनी आपल्या शिष्यांना आयुर्वेदाचे संपूर्ण ज्ञान दिले. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुनर्वसु यांनी शिष्यांना आपापल्या आवडीनुसार आयुर्वेदातील वेगवेगळ्या तंत्रावर माहिती लिहिण्याचे आदेश दिले. जेणेकरून मानव समाजाचं कल्याण होण्यास मदत होईल.

-आयुर्वेदाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अग्निवेश यांनी मानवी आरोग्यावर आधारित अग्निवेश तंत्र रचले. अन्य सर्व शिष्यांनी पृथ्वी, वनस्पती, पाणी इत्यादी उपचार आणि तत्त्वांवर आपापले लेखन पूर्ण केले.

- कारण आयुर्वेदामध्ये केवळ मनुष्याच्या आयुष्याची माहिती नाहीय, तर संपूर्ण विश्वाला व्यापणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी संबंधित असे हे विज्ञान आहे. उदाहरणार्थ मनुष्याच्या प्रत्येक अवयवांशी संबंधित आजारांसाठी वेगवेगळे तज्ज्ञ असतात.

(वाचा : Benefits Of Chutney : ‘या’ चवदार चटण्या आहेत आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर)

​चरक संहितेची कथा

- ऋषि पुर्नवसु आत्रेय यांचे शिष्य अग्निवेश यांनी अग्नितंत्राची रचना केल्यानंतर ऋषि दृढ़बल यांनी त्यामध्ये काही नवीन अध्याय जोडले आणि तंत्र पूर्ण केले.

-यानंतर महर्षि चरक यांनीही या तंत्रामध्ये काही अध्याय जोडले. यामुळेच अग्निवेश तंत्र नंतर चरक संहिता या नावाने ओळखले जाऊ लागले.चरक संहितेमध्ये आयुर्वेदाचे सविस्तर ज्ञान आहे.

काय आहे भगवान धन्वंतरी यांची भूमिका?

- आयुर्वेदाच्या या पूर्ण प्रवासामध्ये भगवान धन्वंतरी यांची नेमकी भूमिका काय होती? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असावा.

-तर जेव्हा भगवान धन्वंतरी समुद्र मंथनावेळी हातात आयुर्वेद ग्रंथ घेऊन प्रकट झाले होते. त्यापूर्वी आयुर्वेदाचे ज्ञान गुरु-शिष्य परंपरेद्वारे तोंडी स्वरुपात पिढ्यांकडे पोहोचवले जात होते.

-धन्वंतरी देवानं आयुर्वेदास लिखित स्वरुपात आणि संग्रहित वैद्यकीय सराव म्हणून मानवजातीला दिले. म्हणूनच आयुर्वेदाचे जनक म्हणून त्याची पूजा केली जाते, असे म्हटलं जातं.

(वाचा : Colon Infection: इरफान खान 'या' आजारानं होता ग्रस्त, जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज