अतुल गाडगीळ
'लक्ष्य' या २००४ साली प्रदर्शित झालेल्या सिनेमातील 'कितनी बाते याद आती है' हे सुरेल आणि अर्थपूर्ण गीत माझ्या आवडत्या गीतांपैकी एक आहे. हरिहरन आणि साधना सरगम यांनी गायलेलं हे गीत शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलंय. करण शेरगील (हृतिक रोशन) हा आयुष्यात ध्येय नसलेला तरुण असतो. सैन्यात भरती व्हायचं खूळ करणच्या डोक्यात येतं; पण खरोखर सैन्याचं खडतर प्रशिक्षण सुरू होतं, तेव्हा मात्र करण तिथून पळ काढतो. ही गोष्ट त्याची प्रेयसी रोमीला (प्रीती झिंटा) सहन होत नाही. यामुळे ती करण सोबतचे नातेसंबंध तोडते आणि पुढं कधीच करणचं तोंड बघायचं नाही, असं ठरवते. तेव्हा करणचे डोळे उघडतात. त्याला त्याच्या आयुष्याचं लक्ष्य सापडतं. तो पुन्हा एकदा सैन्यात दाखल होतो. प्रशिक्षण घेऊन लष्करातील एक उमदा अधिकारी बनतो.
पुढं त्याला कारगिलच्या युद्धात एक महत्त्वाची जबाबदारी निभावायची असते, तेव्हा रोमी तिकडे एक पत्रकार म्हणून वार्तांकन करायला आली असते. पुन्हा एकदा दोघांची भेट होते. दोघांच्याही मनात खूप काही असतं; पण कसं बोलावं आणि काय बोलावं, हे त्यांना कळत नाही. अशा पार्श्वभूमीवर हे गीत सुरू होतं. या गीतातून दोघांची अवस्था खूप सुंदर पद्धतीनं दाखवण्यात आली आहे. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्या लेखणीतून हे गीत उतरलं आहे.
कितनी बातें याद आती हैं
तस्वीरें सी बन जाती हैं
मैं कैसे इन्हें भूलू
दिल को क्या समझावू?
तुझ्या कितीतरी आठवणी मनात येतात आणि तस्वीर होऊन जातात. त्यामुळे मी त्या कशा विसरू? हृदयाला कसं समजावू?
कितनी बातें कहने की हैं
होठों पर जो सहमी सी हैं
इक रोज इन्हें सुन लो
क्यू ऐसे गुमसूम हो...
कितीतरी गोष्टी तुझ्यासोबत बोलायच्या आहेत. ओंठापर्यंत येतात; पण तिथंच थांबतात. कधीतरी त्या माझ्या गोष्टीही ऐक. अशी का अबोल आहेस?
या गाण्यात सोपे हिंदी शब्द वापरले असल्यानं गाणं सहजासहजी लक्षात राहतं. या सोप्या शब्दांतून त्याचा अर्थही मनाला भिडतो. खरं तर, जावेद अख्तर यांच्या गीतलेखनाची हीच खासियत आहे. साधे, सोपे शब्द आणि त्याच आशय.
क्यो पूरी हो ना पाई दास्तान
कैसे आई हैं ऐसी दूरियाँ
दोनो के दिलों में सवाल हैं
फिर भी हैं खामोशी
तो कौन हैं किसका दोषी
कोई क्या कहे...
कैसी उलझनों के यह जाल है
जिन में उलझे है दिल
अब होना है क्या हासिल
कोई क्या कहे
दिल की हैं कैसी मजबूरियाँ
खोये थे कैसे राहों के निशान
कैसे आई हैं ऐसी दूरिया
काय ही आपली अवस्था आहे? आणि, त्यासोबत हृदयाचीही. मार्गावरील सगळे निशाण पुसले गेले. कसा आला आपल्यात का दुरावा?
दोनो के दिलों में छुपा है
जो इक अंजाना सा गम
क्या हो पायेगा वो कम
कोई क्या कहे
दोनों ने कभी जिंदगी के
इक मोड पे थी जो पाई
हैं कैसी वो तनहाई
कोई क्या कहे
कितना वीरान हैं ये समा
सासों में जैसे घुलता है धुवाँ
कैसे आई हैं ऐसी दूरिया...