यासोबतच सांध्यांच्या आरोग्याची काळजी घेते. मणका आणि इतर संवेदनशील ऊतकांचे संरक्षण करते. शिवाय लघवी, घाम आणि संडासावाटे शरीरातील कचरा काढून टाकण्याचे कार्य करते. आयुर्वेद एक्सपर्ट्स डॉ नितिका कोहलीने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर आरोग्यदायी पद्धतीने पाणी पिण्याची माहिती शेअर केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे हेल्दी आहे का असे विचाराल तर मी म्हणेन की, तांब्याचे पाणी त्याच्या अनेक आरोग्य फायद्यांसाठी ओळखले जाते. फक्त लक्षात ठेवा की तांब्याचे भांडे खरे असण्यासोबतच स्वच्छ असले पाहिजे. थायरॉईड, त्वचारोग, संधिवात, सांधेदुखी यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी अशाप्रकारे पाण्याचे सेवन करणे चांगले आहे.
थायरॉइड ग्रंथीच्या कार्यात सुधार
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कॉपरच्या कमतरतेमुळे थायरॉईड ग्रंथी खराब होतात. अशावेळी तांब्याच्या भांड्यातील पाणी थायरॉईड ग्रंथीची अकार्यक्षमता संतुलित करते. तुम्हालाही थायरॉइडची समस्या असल्यास तांब्याच्या भांड्यात रोज पाणी पिणे तुमच्यासाठी एक आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो.
सांधे आणि संधिवातातील सूज कमी करते
तांब्याचे पाणी हाडांना मजबूत बनवून आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हे संधिवातासाठी एक उत्कृष्ट उपचार करते. तांब्याचा अँटीइन्फ्लमेट्री प्रभाव संधिवात असलेल्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरतो. यामुळे सांधेदुखीची समस्याही कमी होते.
हृदयप्रणाली राखते सुरक्षित
तांब्याचे पाणी रक्ताभिसरण प्रक्रिया (blood circulation) वाढवते आणि रक्तवाहिन्या जाड बनवते. अशाप्रकारे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
पचनक्रिया सुधारते
तांब्याचे पाणी प्रदूषक आणि हानिकारक जंतू काढून टाकते. यासोबत ते पोटातील जळजळ कमी करते आणि चयापचय वाढवते आणि पचन सुधारते.
वेटलॉससाठी फायदेशीर
शरीरातील कॉपरचे योग्य प्रमाण तुमचे चयापचय वाढवण्याचे काम करते. हे चरबी जाळून निरोगी मार्गाने वजन कमी करण्यास देखील मदत करते.
(वाचा :- या मराठमोळ्या तरूणाने ही 1 ट्रिक वापरून फक्त 5 महिन्यात घटवलं तब्बल 20 किलो वजन, फोटो बघून व्हाल हैराण..!)
हार्ट स्ट्रोकचा रोखते
तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी ऑक्सिडंट्सना जलद किंवा चांगले काम करण्यापासून प्रतिबंधित करते, ज्यामुळे हार्ट स्ट्रोकचा धोका कमी होतो.
वय वाढण्याची समस्या दूर करते
आयुर्वेद एक्सपर्ट्स म्हणतात की तांब्याच्या पाण्याच्या फायद्यांमध्ये फ्री रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावांशी लढा देणे समाविष्ट आहे. त्यामुळे वृद्धत्वाची किंवा वय वाढण्याची समस्या कमी होते.
कॉपरचे पाणी हिमोग्लोबिन वाढवते
तांबे हे महत्त्वाचे खनिज आहे. हिमोग्लोबिनशी संबंधित विकार टाळण्यासाठी शरीराला योग्य स्तरावर त्याची आवश्यकता असते.
संक्रमणापासून होतो बचाव
तज्ञांच्या मते, तांब्यामध्ये नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात ज्यामुळे संक्रमण कमी होते. अशा परिस्थितीत पावसात तांब्याच्या भांड्यात पाणी साठवून ते प्यायल्याने या ऋतूत पसरणाऱ्या संसर्गापासून बचाव होऊ शकतो.
टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.