अ‍ॅपशहर

...त्यांना गरज प्रेमाची!

तंत्रज्ञानाने प्रगती साधली तरी आपल्या समाजाच्या मानसिकतेत आणि दृष्टिकोनात अजूनही प्रगल्भता आलेली नाही. कारण मनोविकार किंवा मनोरुग्णाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेला नाही. आपला समाजात मनोविकाराबाबत गैरसमजूती आहेत. समाजमनात असलेल्या गैरसमजूती आणि सत्य याविषयी...

Maharashtra Times 16 Nov 2016, 12:59 am
तंत्रज्ञानाने प्रगती साधली तरी आपल्या समाजाच्या मानसिकतेत आणि दृष्टिकोनात अजूनही प्रगल्भता आलेली नाही. कारण मनोविकार किंवा मनोरुग्णाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेला नाही. आपला समाजात मनोविकाराबाबत गैरसमजूती आहेत. समाजमनात असलेल्या गैरसमजूती आणि सत्य याविषयी...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम myths regarding mental illness
...त्यांना गरज प्रेमाची!

डॉ. सागर मुंदडा, मानसोपचारतज्ज्ञ, केइएम हॉस्पिटल
आजही आपल्या समाजात मानसिक आजार आणि रुग्णाविषयी तितकीशी जागरुकता पाहायला मिळत नाही. एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केली असली तरी मानसिकतेत आधुनिकता आलेली नाही. समाजाचा मनोरुग्णाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही बदलेला आढळत नाही. अगदी खेड्यापाड्यात मनोरुग्णावर उपचार करण्याऐवजी त्याला वाळीत टाकणं, त्याची थट्टा करणं असे प्रकार पाहायला मिळातात. त्या रुग्णाच्या मनोबलाचं आणखीनच खच्चीकरण केलं जातं. परिणामी, तो मनोरुग्ण त्या आजारातून बाहेर येण्याऐवजी अधिकच मनोविकाराच्या दरीत ढकलला जातो. हीच मानसिकता आणि दृष्टिकोन बदलण्याची नितांत गरज आहे. आपल्या समाजात मनोविकार आणि मनोरुग्णाविषयी असलेले गैरसमज आणि सत्य काय आहे हे आज जाणून घेऊयात...
गैरसमज- मनोरुग्ण हे हिंसक असतात.
तथ्य- आपल्या समाजात ही गैरसमजूत अधिक प्रमाणात दृढ आहे. मनोरुग्ण कधी हिंसक पवित्रा घेतील हे सांगता येत नाही. त्यामुळे त्याच्यापासून दूर राहणं पसंत केलं जातं. यामुळे आपल्यात काहीतरी कमतरता असल्याचं सारखं त्या रुग्णाला भासवलं जातं. मानसिक आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण हिंसक वृत्तीचे नसतात. गंभीर स्वरुपाचे मानसिक आजार असल्यास ते रुग्ण हिंसक होतात. मात्र याचं प्रमाण ३ % ते ५% एवढंच असतं.
गैरसमज- व्यक्तीमत्त्वातील दोष आणि वागण्यातील त्रुटी ही मानसिक आजाराची लक्षणं आहेत.
तथ्य- मानसिक आजार आणि व्यक्तीमत्वातील किंवा वागण्यातील त्रुटी यांचा प्रत्येक वेळी संबंध असतोच असं नाही. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती आळशी असेल किंवा शारीरिकदृष्ट्या अशक्त असेल तर त्याचा मानसिक आजाराशी संबंध नाही. जनुकीय दोष, एखादा अपघात, ताण किंवा एखादी दुर्घटना ज्याचे मनावर गंभीर परिणाम झालेत, ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात.
गैरसमज- मानसिक आजारावर प्रतिबंधात्मक उपाय नसतो.
तथ्य- ताणतणावातून येणारं नैराश्य यासारख्या आजाराबाबत समाजात जागरुकता निर्माण करुन प्रतिबंधात्मक उपाय करता येऊ शकतात. तसंच जीवनशैलीत महत्त्वपूर्ण बदल केल्यास मनोविकारही टाळता येतात.
संकलन- शब्दुली कुलकर्णी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज