डॉ. सागर मुंदडा, एमबीबीएस, एम.डी, मनोचिकित्सक
घटस्फोट होण्याचं प्रमाण अलीकडे वाढतंय, असं अनेक सर्वेक्षणातून दिसून येतं. विलग होण्याच्या प्रक्रियेमुळे जोडप्यांना मानसिक ताणतणावाला सामोरं जावं लागतं. भावनांमधील चढ-उतार, नकारात्मक विचार या सगळ्याला कसं तोंड द्यावं, कठीण काळात लहान मुलांची मानसिकता कशी सांभाळावी याविषयी...
घटस्फोट घेणं हा सर्वसाधारणपणे दोघांचा निर्णय असतो. काही कारणास्तव, विचार करुन हे टोकाचं पाऊल उचललं जातं. हा कठोर निर्णय दाम्पत्याने एकमताने किंवा सर्व बाजूंचा विचार करुन घेतलेला असतो, तर मग याचा मानसिकतेशी काय संबंध? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. विभक्त होण्याचे घाव त्या दोघांच्या मनावर आणि परिणामी त्यांच्या मुलांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विभक्त होण्यामागे काहीही कारणं असू शकतात, मात्र त्याचा मनावर परिणाम होतो हे निश्चित. यामुळे त्या दोघांच्या आणि मुलांच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत असते. पण या परिणामांना कसं सामोरं जावं आणि मुलांनाही अशा कठीण प्रसंगी कसं सांभाळावं याची माहिती आपण आजच्या लेखातून घेणार आहोत.
काही वर्षांचा संसार मोडून, जोडीदारापासून विलग होताना मनात अनेक भावनांमधील चढ-उतार होत असते. चिडचिडा स्वभाव, दु:खी, गोंधळून जाणं अशा एक ना अनेक भावनांचा खेळ आपल्या मनात चालू असतो. भविष्याची चिंताही तुम्हाला सतावत असते. पण कालांतराने भावनांची ही चढ-उतार कमी होते.
एक ब्रेक घ्या. विभक्त होण्याचा तो कालावधी पार पडल्यानंतर तुमच्या मनातील तीव्र भावनांना, विचारांना शांत करण्यासाठी ब्रेक जरूर घ्या. या काळात तुम्ही जास्ती कार्यक्षम किंवा इतरांबद्दल विचार करण्यास तयार नसू शकता, पण काहीच हरकत नाही. कोणीच सुपरमॅन किंवा सुपरवुमन नसतं. तुमच्या मनाला ठिक होण्यासाठी वेळ द्या. काही काळाने नव्या उमेदीने, जोमाने आणि नव्या उत्साहाने एक नवी सुरुवात करा.
दरम्यानच्या काळात तुमच्या भावना, समस्या तुमच्या मित्र-मैत्रीणींशी शेअर करा. कुटुंब, मित्र-मैत्रीणी, आप्तेष्ट मंडळी हे सारे तुम्हाला मानसिक द्वंद्वातून बाहेर पडण्यास नक्कीच मदत करतील. अशा वेळी तुम्ही एकलकोंडे बनलात तर त्याच्या परिणामांना तुम्हालाच सामोरं जावं लागेल. जर तुम्हाला यासंबंधित नातलग, मित्र-मैत्रीणींशी बोलायचे नसल्यास मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्या.
या काळात तुमच्या जोडीदाराशी वाद घालणं शक्यतो टाळा. जर तुमच्यात भांडणं होणार असल्याची चिन्ह तुम्हाला जाणवत असतील तर शांतपणे समोरच्याला समजावा किंवा तेव्हा बोलणं टाळा.
शारीरिक आणि मानसिकरित्या स्वत:ला सांभाळा. व्यायाम करा, पौष्टिक अन्न खा आणि पुरेशी विश्रांती घ्या. तुमचा नेहमीचा दिनक्रम तसाच ठेवा, त्यात फारसे काही बदल करु नका. या काळात तुमच्या आयुष्याशी संबंधित मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेणं टाळा. दु:ख कमी करण्यासाठी वाईट व्यसनांच्या आहारी जाऊ नका. यामुळे तुमच्या समस्यांमध्ये वाढ होईल.
तुमच्या दोघांच्या भांडणांपासून मुलांना दूर ठेवा. त्यांना वास्तवाची जाणीव करुन द्या. मुलांसमोर तुमच्या जोडीदाराच्या बाबतीत काहीही नकारात्मक प्रतिक्रिया देणं टाळा.
संकलन - शब्दुली कुलकर्णी
तुम्हाला काही प्रश्न असल्यास sagargs2009@gmail.com यावर इ-मेल करा.
घटस्फोट होण्याचं प्रमाण अलीकडे वाढतंय, असं अनेक सर्वेक्षणातून दिसून येतं. विलग होण्याच्या प्रक्रियेमुळे जोडप्यांना मानसिक ताणतणावाला सामोरं जावं लागतं. भावनांमधील चढ-उतार, नकारात्मक विचार या सगळ्याला कसं तोंड द्यावं, कठीण काळात लहान मुलांची मानसिकता कशी सांभाळावी याविषयी...
घटस्फोट घेणं हा सर्वसाधारणपणे दोघांचा निर्णय असतो. काही कारणास्तव, विचार करुन हे टोकाचं पाऊल उचललं जातं. हा कठोर निर्णय दाम्पत्याने एकमताने किंवा सर्व बाजूंचा विचार करुन घेतलेला असतो, तर मग याचा मानसिकतेशी काय संबंध? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. विभक्त होण्याचे घाव त्या दोघांच्या मनावर आणि परिणामी त्यांच्या मुलांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विभक्त होण्यामागे काहीही कारणं असू शकतात, मात्र त्याचा मनावर परिणाम होतो हे निश्चित. यामुळे त्या दोघांच्या आणि मुलांच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत असते. पण या परिणामांना कसं सामोरं जावं आणि मुलांनाही अशा कठीण प्रसंगी कसं सांभाळावं याची माहिती आपण आजच्या लेखातून घेणार आहोत.
काही वर्षांचा संसार मोडून, जोडीदारापासून विलग होताना मनात अनेक भावनांमधील चढ-उतार होत असते. चिडचिडा स्वभाव, दु:खी, गोंधळून जाणं अशा एक ना अनेक भावनांचा खेळ आपल्या मनात चालू असतो. भविष्याची चिंताही तुम्हाला सतावत असते. पण कालांतराने भावनांची ही चढ-उतार कमी होते.
एक ब्रेक घ्या. विभक्त होण्याचा तो कालावधी पार पडल्यानंतर तुमच्या मनातील तीव्र भावनांना, विचारांना शांत करण्यासाठी ब्रेक जरूर घ्या. या काळात तुम्ही जास्ती कार्यक्षम किंवा इतरांबद्दल विचार करण्यास तयार नसू शकता, पण काहीच हरकत नाही. कोणीच सुपरमॅन किंवा सुपरवुमन नसतं. तुमच्या मनाला ठिक होण्यासाठी वेळ द्या. काही काळाने नव्या उमेदीने, जोमाने आणि नव्या उत्साहाने एक नवी सुरुवात करा.
दरम्यानच्या काळात तुमच्या भावना, समस्या तुमच्या मित्र-मैत्रीणींशी शेअर करा. कुटुंब, मित्र-मैत्रीणी, आप्तेष्ट मंडळी हे सारे तुम्हाला मानसिक द्वंद्वातून बाहेर पडण्यास नक्कीच मदत करतील. अशा वेळी तुम्ही एकलकोंडे बनलात तर त्याच्या परिणामांना तुम्हालाच सामोरं जावं लागेल. जर तुम्हाला यासंबंधित नातलग, मित्र-मैत्रीणींशी बोलायचे नसल्यास मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्या.
या काळात तुमच्या जोडीदाराशी वाद घालणं शक्यतो टाळा. जर तुमच्यात भांडणं होणार असल्याची चिन्ह तुम्हाला जाणवत असतील तर शांतपणे समोरच्याला समजावा किंवा तेव्हा बोलणं टाळा.
शारीरिक आणि मानसिकरित्या स्वत:ला सांभाळा. व्यायाम करा, पौष्टिक अन्न खा आणि पुरेशी विश्रांती घ्या. तुमचा नेहमीचा दिनक्रम तसाच ठेवा, त्यात फारसे काही बदल करु नका. या काळात तुमच्या आयुष्याशी संबंधित मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेणं टाळा. दु:ख कमी करण्यासाठी वाईट व्यसनांच्या आहारी जाऊ नका. यामुळे तुमच्या समस्यांमध्ये वाढ होईल.
तुमच्या दोघांच्या भांडणांपासून मुलांना दूर ठेवा. त्यांना वास्तवाची जाणीव करुन द्या. मुलांसमोर तुमच्या जोडीदाराच्या बाबतीत काहीही नकारात्मक प्रतिक्रिया देणं टाळा.
संकलन - शब्दुली कुलकर्णी
तुम्हाला काही प्रश्न असल्यास sagargs2009@gmail.com यावर इ-मेल करा.