अ‍ॅपशहर

पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गांपासून तसंच आजारांपासून करा संरक्षण

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसानं पाण्यावाटे होणाऱ्या आजारांना बळ दिलं आहे. लेप्टोस्पारोसीस, गॅस्ट्रो, हेपिटायटिस तसंच टायफाइड सारखे आजार पावसाळ्यात प्रचंड वाढतात.

महाराष्ट्र टाइम्स 21 Aug 2019, 4:11 pm
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसानं पाण्यावाटे होणाऱ्या आजारांना बळ दिलं आहे. लेप्टोस्पारोसीस, गॅस्ट्रो, हेपिटायटिस तसंच टायफाइड सारखे आजार पावसाळ्यात प्रचंड वाढतात. एकट्या लेप्टोस्पारोसीस या आजारानं अनेकांना घेरलं असून, दवाखान्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या सर्व आजारांविषयी जागरूकता वाढवणं अत्यंत गरजेचं झालंय. आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणं तसंच डॉक्सिसायक्लीनच्या गोळ्यांचं सेवन वेळीच केल्यास पूरग्रस्त भागांत लेप्टोस्पारोसीस या आजारावर नियंत्रण ठेवता येतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम protect against rains and diseases
पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गांपासून तसंच आजारांपासून करा संरक्षण

लेप्टोस्पारोसीस हा आजार डॉक्टरांच्या सल्ल्यानं विशिष्ट अँटिबायोटिक्स घेऊन बरा होऊ शकतो; पण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की या आजारासाठी काही विशिष्ट लसीकरण उपलब्ध नाही. या भयंकर आजारासाठी प्रतिबंधित उपाय जसं, की ज्यातून संसर्ग होऊ शकतो अशा बाबींपासून अंतर ठेवणं, डॉक्सिसायक्लीन प्रोफेलेक्सिसचा वेळीच वापर करणं हा आहे. स्वच्छता कामगार, कचरापेटी स्वच्छ करणारे कामगार तसंच अस्वच्छ परिसरांमध्ये राहणाऱ्या लोकसंख्येला या आजाराचा जास्त धोका असतो.
या संदर्भात आणखी माहिती देताना डॉ. मंगेश तिवस्कर, सरचिटणीस, 'असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडिया' (एपीआय) म्हणाले, की लेप्टोस्पारोसीसचा प्रसार हा पुरामध्ये जास्तीत जास्त पसरतो. पुरामध्ये पाणी जास्त गढूळ होत असल्यानं हा आजार जास्त प्रमाणात पसरतो. उंदरांचं मल तसंच लघवी गढूळ पाण्यात मिसळून लेप्टोस्पारोसीसचा प्रसार होतो. कॉर्क स्क्रू सारखा दिसणारा हा किडा माणसाच्या शरीरात प्रवेश करू शकतो. पूरग्रस्त लोकांना हा आजार डोळ्याद्वारे, नाकाद्वारेही होऊ शकतो. पूरग्रस्त भागांतील लोक गढूळ पाण्याच्या संपर्कात आले, म्हणजे ज्यात उंदराचं मल आणि लघवी असेल किंवा अशा मातीच्या संपर्कात आले, तर त्यांना हा आजार व्हायची शक्यता जास्तीत जास्त असते.
लेप्टोस्पारोसीस या आजारामुळे किडनी निकामी होऊ शकते तसंच मेनिंनजायटिस (ज्यात मेंदूच्या भोवताल असणाऱ्या आवरणावर सूज येते)सुद्धा होऊ शकतो. लिव्हर निकामी होणं, श्वसनाचे आजार आणि काही गंभीर परिस्थितीत माणसाचा मृत्यूही होऊ शकतो. आसाम, ओरिसा, बिहार, महाराष्ट्र आणि पुणे-मुंबई यांसारख्या राज्यांत मुसळधार पाऊस आणि पूर पाहता, पुढील खबरदारी घेतली पाहिजे.
१. पाणी पिण्याआधी ते पाणी क्लोरीन आणि आयोडिनचा वापर करून स्वच्छ करून घ्या.
२. पुराच्या पाण्यानं खराब झालेले खाद्यपदार्थ नष्ट करून टाका.
३. पुरामध्ये उत्पन्न होणारे किडे आणि डासांपासून सुरक्षित राहा.
४. सांडपाणी, पिण्याचं पाणी एकत्र होत नाही याची काळजी घ्या.
५. सांडपाणी उघड्यावर वाहत असल्यास प्रशासनाला कळवा.
६. डासांपासून वाचण्यासाठी पूर्ण बाहीचे कपडे घाला.
७. कचराकुंडी उघडी ठेऊ नका, कचरा रस्त्यावर टाकू नका.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज