यावेळी तुम्ही तुमच्या शरीराला इंधन न दिल्यास, तुमचे शरीर चयापचय दर (metabolic rate) राखण्यास सक्षम राहत नाही. जसजसा दिवस पुढे सरतो तसतसे चयापचय क्रिया मंदावते, त्यामुळे पचन सहजरित्या होण्यासाठी रात्रीचे जेवण 8 वाजेपर्यंत किंवा त्याआधीच घेण्याचा सल्ला दिला जातो. रात्री उशिरा जेवण केल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते, जी नियंत्रित करणे देखील कठीण होते. अलीकडेच एका नवीन अभ्यासाने पुष्टी केली आहे की चुकीच्या वेळी खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचते.
रात्री-अपरात्री खाण्याची इच्छा टाळण्यासाठी काय करावं?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आपण आपल्या अन्नाचे व्यवस्थापन अशा प्रकारे केले पाहिजे की आपल्याला रात्री-अपरात्री काहीही खाण्याची इच्छा झाली नाही पाहिजे. ते सुचवतात की फक्त दिवसाचे जेवण कसे असावे याचे नियोजन करण्याचा काहीतरी प्लान आखला पाहिजे. कारण रात्रीच्या जेवणाचे नियोजन करण्याचा सोपा मार्ग म्हणजे हलका-फुलका आणि निरोगी आहार किंवा नाश्ता घेणे हा एकदम आहे. शिवाय रात्रीचा आहार असा असावा ज्यात अजिबात कॅलरीज नसाव्यात.
अभ्यासात काय दिसून आलं?
जेवणाच्या वेळेचा आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी तज्ञांनी सहभागींना दोन गटात विभागले. एका गटातील लोकांना दुपारचे जेवण देण्यात आले, तर दुसऱ्या गटातील लोकांना रात्रीचे जेवण देण्यात आले. निकालात असे दिसून आले की ज्यांनी रात्रीचे जेवण खाल्ले त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण 6.4 टक्क्यांनी वाढले होते. जे लोक रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात त्यांच्यासाठी या अभ्यासाचे परिणाम अधिक महत्त्वाचे होते.
(वाचा :- Papaya Side effects : सावधान, ‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नये पपई, नाहीतर जीव येऊ शकतो भयंकर धोक्यात!)
जेवणाबाबत वेळ किती महत्त्वाची ठरते
योग्य वेळी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते. सकाळी ८ वाजता नाश्ता केल्याने इन्सुलिन संवेदनशीलतेचा धोका कसा कमी होतो हे मागील अनेक अभ्यासांत सिद्ध झाले आहे. सायन्स अॅडव्हान्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की रात्रीचे जेवण केल्याने केवळ रक्तातील साखरेची पातळीच वाढत नाही, तर हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका देखील कैक पटीने वाढतो.
रात्रीची भूक शांत करण्याची पद्धत
तज्ज्ञांच्या मते, रात्रीची भूक कमी करण्यासाठी किंवा शांत करण्यासाठी तुम्ही ड्राय फ्रुट्स, हंगामी फळे, भाज्यांचे रस, उकडलेली अंडी, सॅलड्स, ग्रीक दही, स्प्राउट्स, पनीर यासारखे हेल्दी आणि कमी कॅलरीज असलेले पर्याय निवडू शकता. त्यामुळे तुम्हालाही दिवसा किंवा रात्री उशिरा व कोणत्याही वेळी खाण्याची सवय असेल, तर ती लवकरात लवकर सोडून द्या. कारण इच्छा नसतानाही तुमच्या या सवयीमुळे रक्तातील साखरेच्या पातळीसोबतच हृदयविकारांचा आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
रात्री कॅलरीज बर्न करणं असतं कठीण
रात्री उशिरा खाणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे तज्ज्ञांनी उघड केले आहे. यावेळी इच्छा नसतानाही तुम्ही जास्त कॅलरी, साखर आणि मीठ असलेले अतिप्रक्रिया केलेले पदार्थ खाताच. नुसते पोटभर अन्न खाणे पुरेसे नाही, तर जेवणाच्या वेळेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते, पण हे आपल्याला समजतच नाही. आणखी वाईट गोष्ट म्हणजे त्या कॅलरीज जाळण्याची संधी आपल्याला कधीच मिळत नाही.