अ‍ॅपशहर

बंधू भाग ले!

रक्षाबंधन म्हंटलं की पोरांची वर्दळ कॅम्पसमध्ये आपसूकच कमी होते. कधी कोण आपल्याला बंधू बनवून जाईल याच काय गॅरंटी? असं म्हणत अनेकजण कॉलेजमधूनच कल्टी मारतात. कॅम्पसच्या कट्ट्यावर रक्षाबंधनाचे तर एक सो एक फेमस किस्से ऐकायला मिळतात.

Maharashtra Times 18 Aug 2016, 7:27 am
रक्षाबंधन म्हंटलं की पोरांची वर्दळ कॅम्पसमध्ये आपसूकच कमी होते. कधी कोण आपल्याला बंधू बनवून जाईल याच काय गॅरंटी? असं म्हणत अनेकजण कॉलेजमधूनच कल्टी मारतात. कॅम्पसच्या कट्ट्यावर रक्षाबंधनाचे तर एक सो एक फेमस किस्से ऐकायला मिळतात. कॅम्पसमधल्या काहीशा गमतीशीर रक्षाबंधनाची ही एक झलक….
महाराष्ट्र टाइम्स.कॉम campus rakshabandhan
बंधू भाग ले!


फ्रेंडशिप डे म्हणजे तुम्हा कॉलेजिअन्सची जान. आवडत्या मुलीकडून फ्रेंडशिप बँड बांधून घेण्यासाठी मुलं आतुर असतात. पण तीच मुलं काही दिवसांनंतर येणाऱ्या रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधून घेण्याच्या भीतीनं गायब होतात. म्हणजे त्यांच्या मनात एक भीती असते, की जी मुलगी आवडते तिनंच चुकूनमाकून राखी बांधली तर? आता तुम्हीच विचार करा ना, कुणाला आवडेल जबरदस्तीचा भाऊराया व्हायला? त्यामुळे रक्षाबंधनच्या २-४ दिवस आधीपासून आणि नंतर कॉलेज कॅम्पसमध्ये मुलं दिसेनाशीच होतात. अशी कित्येक उदाहरणं कॉलेजमध्ये पाहायला मिळतात. एका मुलाने तर पहिल्या वर्षानंतर कॉलेजच सोडलं, कारण त्याच्या गर्लफ्रेंडनं त्याला या दिवशी राखी बांधून बॉयफ्रेंडऐवजी त्याचा भाऊ करून टाकला. मग मित्र चिडवायला लागले, ‘जिसको बनाके रखा था अपने दिल की राणी, तीच म्हणाली आज रक्षाबंधन, दादा बांधून घे राखी.’ एका हँडसम मुलाला तर त्याच्या गर्लफ्रेंडने धमकीच दिली होती, ज्या-ज्या मुली तुझ्यावर लाइन मारतात त्या सगळ्यांना तुझ्या बहिणी बनवून घे. मग काय बिचारा 'जोरु का गुलाम'! राख्यांनी सगळा हात भरून गेला बिचाऱ्याचा.
मुलींच्या बाबतीत सांगायचं, तर त्याही कधी कुणाला बनवतील सांगता यायचं नाही. एकीने असंच केलं. आपली मैत्रीण आपल्या भावाबद्दल ‘वेगळा’ विचार करू लागलीय हे तिला कळलं. मग काय, आई-बाबांसमोर मुद्दामच तिनं ‘अगं तू पण बांध नं दादाला राखी, त्यालाही अजून एक प्रेमळ बहीण मिळेल’, असं बोलून वहिनी होऊ पाहणारीची ताईच करून टाकली.
खरं तर काहीजण या राखीच्या सणाचा पोरखेळ करून टाकतात. कोणत्याही मुलाने आपल्या भावना तिच्याकडे व्यक्त केल्या की मुली जणू आपल्या संरक्षणासाठी राखी हा पर्याय निवडतात. त्यामुळे मुलांची गोची होऊन जाते. मुलांच्या आपल्याबाबत असलेल्या भावना जाणून घेतल्याशिवाय उगाच त्यांना राखीच्या बंधनात बांधणं हे चुकीचंच आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. राखी बांधून टाकणं ही मोठी गोष्ट नाही. पण राखीचं महत्व निभावणारा भाऊ तो होऊ शकेल का याचा विचार त्या मुलीनं करायला हवं.

संकलन : प्रांजली शेणॉय, पूजा जाधव.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज