विद्यापीठाने कमीत-कमी चुका कराव्यात व मुलांना योग्य तो न्याय मिळावा असं मनोगत एका विद्यार्थिनीनं पत्राच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलाय.
प्रिय मुंबई विद्यापीठ,
प्रिय मुद्दाम म्हटलं...कारण तुझी चर्चा आम्ही सतत करत असतो. तसं तुझं आणि माझं जवळचं नातं! इतकं जवळचं नातं की प्रश्न पडले की उत्तरं शोधण्यासाठीही तुझ्याकडेच यायला लागतं. पण गेले काही दिवस एक अढी आपल्या नात्यात निर्माण झाली आहे. कदाचित आपला एकमेकांशी पुरेसा आणि नीट संवादच होत नाहीये, म्हणून असेल किंवा तुझ्याबद्दलच्या माझ्या सातत्याने असणाऱ्या तक्रारी हे ही कारण असेल. मला माहितीये, तुला आणि तुझ्या इथे काम करणाऱ्यांना खूप काम असतं. म्हणून काही चुका घडतातही. पण चुका करण्याला आणि त्या चुका माफ करण्यालाही एक सीमा असते. तू केलेल्या चुकांचा फटका उगाचच मला बसतो आणि मग नकळत पणे आमचा तुझ्याबद्दलचा आदर कमी होतो.
तुझ्या उशीरा संपणाऱ्या परीक्षा, परीक्षांचे विचित्र वेळापत्रक, वेळेवर न लागणारे निकाल, उशीरा मिळणाऱ्या गुणपत्रिका, मार्कशीट्स आणि हॉलतिकीटमध्ये आढळणाऱ्या असंख्य चुका! किती आणि काय काय तक्रारी सांगू तुला तुझ्याबद्दलच्या आणि किती वेळा सांगू? माझं असं म्हणणं नाही की आमच्या म्हणण्याप्रमाणे तू चालावंस पण माझ्या मतांचा, विचारांचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या वेळेचा आदर तरी कर. कारण माझ्या तक्रारी असल्या तरी तुझं आणि माझं जवळचं नातं आहे आणि बाहेरच्या माणसांनी येऊन चुका दाखवण्यापेक्षा जवळच्या माणसांनी दाखवल्या तर त्याचा त्रास होत नाही. मी तक्रारी करते मग त्यावर तू मार्ग काढतोस. थोडक्यात काय तर तुला आणि मला डबल त्रास. त्यापेक्षा जर विचार करून आणि योग्य प्लॅनिंग करून कामं केली तर दोघांचा त्रास वाचेल आणि माझ्या मनातला तुझ्या बद्दलचा आदर वाढेल.
आज तुझं मुंबईतच नाही तर देशात नाव आहे. देशभरातून आम्ही विद्यार्थी तुझ्या इथे शिकायला येतो. त्यामुळे आमचा भ्रमनिरास करू नकोस. तुझा हा मान देशात असाच टिकून राहावा, असं आम्हालाही वाटतं. आज न राहून तुला हे सगळं सांगावसं वाटलं म्हणून हे ओपन लेटर. तू चुका केल्यास तर मी त्या सांभाळून घेऊही किंबहुना घेतोच. पण या चुकांचा, वारंवार होणाऱ्या तक्रारारींचा मला कंटाळा आलाय. तुझं माझं नातं असंच दृढ होण्यासाठी मी तर एक पाऊल पुढे टाकलंय ते म्हणजे 'तुझ्या चुका समजून घेण्याचं'. आता गरज आहे तू 'वारंवार होणाऱ्या चुका टाळण्याची' जेणेकरून तुझं नाव मला असंच अभिमानाने घेता येईल.
- तुझीच एक विद्यार्थिनी
प्रिय मुंबई विद्यापीठ,
प्रिय मुद्दाम म्हटलं...कारण तुझी चर्चा आम्ही सतत करत असतो. तसं तुझं आणि माझं जवळचं नातं! इतकं जवळचं नातं की प्रश्न पडले की उत्तरं शोधण्यासाठीही तुझ्याकडेच यायला लागतं. पण गेले काही दिवस एक अढी आपल्या नात्यात निर्माण झाली आहे. कदाचित आपला एकमेकांशी पुरेसा आणि नीट संवादच होत नाहीये, म्हणून असेल किंवा तुझ्याबद्दलच्या माझ्या सातत्याने असणाऱ्या तक्रारी हे ही कारण असेल. मला माहितीये, तुला आणि तुझ्या इथे काम करणाऱ्यांना खूप काम असतं. म्हणून काही चुका घडतातही. पण चुका करण्याला आणि त्या चुका माफ करण्यालाही एक सीमा असते. तू केलेल्या चुकांचा फटका उगाचच मला बसतो आणि मग नकळत पणे आमचा तुझ्याबद्दलचा आदर कमी होतो.
तुझ्या उशीरा संपणाऱ्या परीक्षा, परीक्षांचे विचित्र वेळापत्रक, वेळेवर न लागणारे निकाल, उशीरा मिळणाऱ्या गुणपत्रिका, मार्कशीट्स आणि हॉलतिकीटमध्ये आढळणाऱ्या असंख्य चुका! किती आणि काय काय तक्रारी सांगू तुला तुझ्याबद्दलच्या आणि किती वेळा सांगू? माझं असं म्हणणं नाही की आमच्या म्हणण्याप्रमाणे तू चालावंस पण माझ्या मतांचा, विचारांचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या वेळेचा आदर तरी कर. कारण माझ्या तक्रारी असल्या तरी तुझं आणि माझं जवळचं नातं आहे आणि बाहेरच्या माणसांनी येऊन चुका दाखवण्यापेक्षा जवळच्या माणसांनी दाखवल्या तर त्याचा त्रास होत नाही. मी तक्रारी करते मग त्यावर तू मार्ग काढतोस. थोडक्यात काय तर तुला आणि मला डबल त्रास. त्यापेक्षा जर विचार करून आणि योग्य प्लॅनिंग करून कामं केली तर दोघांचा त्रास वाचेल आणि माझ्या मनातला तुझ्या बद्दलचा आदर वाढेल.
आज तुझं मुंबईतच नाही तर देशात नाव आहे. देशभरातून आम्ही विद्यार्थी तुझ्या इथे शिकायला येतो. त्यामुळे आमचा भ्रमनिरास करू नकोस. तुझा हा मान देशात असाच टिकून राहावा, असं आम्हालाही वाटतं. आज न राहून तुला हे सगळं सांगावसं वाटलं म्हणून हे ओपन लेटर. तू चुका केल्यास तर मी त्या सांभाळून घेऊही किंबहुना घेतोच. पण या चुकांचा, वारंवार होणाऱ्या तक्रारारींचा मला कंटाळा आलाय. तुझं माझं नातं असंच दृढ होण्यासाठी मी तर एक पाऊल पुढे टाकलंय ते म्हणजे 'तुझ्या चुका समजून घेण्याचं'. आता गरज आहे तू 'वारंवार होणाऱ्या चुका टाळण्याची' जेणेकरून तुझं नाव मला असंच अभिमानाने घेता येईल.
- तुझीच एक विद्यार्थिनी