अ‍ॅपशहर

रिव्हॅल्युएशनचीही ‘परीक्षा’

विलंब झालेल्या निकालांचा अद्याप पत्ता नसतानाच विद्यापीठाच्या पुनर्मूल्यांकनाचे (रिव्हॅल्युएशन) निकालही रखडले आहेत. याबाबत ‘मुंबई टाइम्स’ एकूणच सातत्यानं पाठपुरावा करतोय. आता रिव्हल्युएशनचे निकाल तरी वेळेवर लागावेत यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या नवनियुक्त संचालकांची परीक्षा असणार आहे…

Maharashtra Times 18 Aug 2017, 3:28 am
अजय उभारे, कॉलेज क्लब रिपोर्टर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai university results
रिव्हॅल्युएशनचीही ‘परीक्षा’


विलंब झालेल्या निकालांचा अद्याप पत्ता नसतानाच विद्यापीठाच्या पुनर्मूल्यांकनाचे (रिव्हॅल्युएशन) निकालही रखडले आहेत. याबाबत ‘मुंबई टाइम्स’ एकूणच सातत्यानं पाठपुरावा करतोय. आता रिव्हल्युएशनचे निकाल तरी वेळेवर लागावेत यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या नवनियुक्त संचालकांची परीक्षा असणार आहे…

मुंबई विद्यापीठाच्या निकालांना झालेला विलंब अद्यापही संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. १५ ऑगस्टची नवी मुदतही उलटली असतानाच आता पुनर्मूल्यांकनाच्या (रिव्हॅल्युएशन) निकालांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पुनर्मूल्यांकनाच्या शुल्कामध्ये कपात करून विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा देण्यात आला खरा. पण एकूणच या निकालांचा इतिहास पाहता, ते वेळेवर लावण्याची अवघड कसोटी नव्या संचालकांना पार पाडावी लागणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक घडामोडींना वेग आला आहे. विद्यार्थ्यांमधून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होतेय. राज्यपालांच्या आदेशानुसार विद्यापीठाचा कारभार सुधारण्यासाठी अनेक नवे बदल करण्यात आले. आता रिव्हॅल्युएशनचे रखडलेला निकाल लवकरात लवकर लागावेत यासाठी विद्यापीठात नवीन परीक्षा व मूल्यमापन संचालक आले आहेत. त्याआधी रिव्हॅल्युएशनचा फीमध्ये कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. परंतु हे निकाल वेळेत लागतील याबाबत संचालकांनी ठोस उपाययोजना करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.

कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सुरू केलेल्या ऑनलाइन असेसमेंटमुळे विद्यापीठाच्या टीवाय आणि रिव्हॅल्युएशनच्या निकालांना बराच उशीर झाला. त्यामुळे अद्याप काही अभ्यासक्रमांसोबत रिव्हॅल्युएशनचे निकाल लावण्यात विद्यापीठला अपयश आलं आहे. या सगळ्याचा फटका मात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याला बसत असल्यानं नवनियुक्त परीक्षा आणि मूल्यमापन संचालकांनी यात प्राधान्यानं लक्ष घालावं आणि लवकरात लवकर निकाल लावावेत, अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करत आहेत.

स्पेशल टास्क फोर्स नेमा
हे निकाल रखडण्याची काही कारणं असल्याचं विद्यार्थी सांगतात. मुळात पेपर तपासणी अजूनही पूर्ण झालेली नाही. कारण पेपर तपासायला पुरेसे प्राध्यापक नाहीत. तसंच आतापर्यंत पेपरतपासणीमध्ये जे चित्र दिसलंय ते पाहता पुनर्मूल्यांकनाचे (रिव्हल्युएशन) पेपर तपासण्यासाठी प्राध्यापक येतील असं वाटत नाही, असं विद्यार्थी म्हणताहेत. कारण तपासणीबरोबरच त्यांना कॉलेजमध्ये शिकवणंही पूर्ण करायचं आहे. म्हणूनच या कामासाठी कॉलेजांची मदत घ्यावी लागणार आहे. वेळ पडल्यास स्पेशल टास्क फोर्स नेमावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज